शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

शेकडो एकरांवरील उभ्या सोयाबीनला फुटू लागले मोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST

खंडाळी : अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परिसरात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह अन्य पिके पाण्यात गेली आहेत. दरम्यान, ...

खंडाळी : अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परिसरात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह अन्य पिके पाण्यात गेली आहेत. दरम्यान, शेतातील उभ्या सोयाबीनला मोड फुटत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई व पीकविमा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परिसरात यंदा मृगात पाऊस झाल्याने खरिपाच्या वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. पिकेही चांगली बहरली होती. त्यामुळे चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा होती. परंतु, सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून सतत पाऊस होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस होत असल्याने काढणीस आलेल्या सोयाबीनला फटका बसला आहे.

खंडाळी व परिसरातील नागझरी, उजना, ढाळेगाव, धसवाडी, सुमठाना, नाईकनगर, मावलगाव, आदी गावांतील सोयाबीन काढणीसाठी आले आहे. परंतु, पिकांत पाणी असल्याने काढणीसाठी मजूर धजावत नाहीत. अशा परिस्थितीत उभ्या सोयाबीनला मोड फुटत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सततच्या पावसामुळे सोयाबीन काढणीला ब्रेक लागला आहे. तसेच कापसाची बोंडे गळत आहेत. तुरीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.