शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेकडो एकरांवरील उभ्या सोयाबीनला फुटू लागले मोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST

खंडाळी : अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परिसरात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह अन्य पिके पाण्यात गेली आहेत. दरम्यान, ...

खंडाळी : अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परिसरात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह अन्य पिके पाण्यात गेली आहेत. दरम्यान, शेतातील उभ्या सोयाबीनला मोड फुटत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई व पीकविमा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परिसरात यंदा मृगात पाऊस झाल्याने खरिपाच्या वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. पिकेही चांगली बहरली होती. त्यामुळे चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा होती. परंतु, सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून सतत पाऊस होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस होत असल्याने काढणीस आलेल्या सोयाबीनला फटका बसला आहे.

खंडाळी व परिसरातील नागझरी, उजना, ढाळेगाव, धसवाडी, सुमठाना, नाईकनगर, मावलगाव, आदी गावांतील सोयाबीन काढणीसाठी आले आहे. परंतु, पिकांत पाणी असल्याने काढणीसाठी मजूर धजावत नाहीत. अशा परिस्थितीत उभ्या सोयाबीनला मोड फुटत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सततच्या पावसामुळे सोयाबीन काढणीला ब्रेक लागला आहे. तसेच कापसाची बोंडे गळत आहेत. तुरीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.