शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

वलांडीचे विश्रामगृह मद्यपींसाठी बनले आश्रयस्थान, झाडे- झुडुपे वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST

वलांडी : लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी देवणी तालुक्यातील वलांडी येथे जवळपास ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. ...

वलांडी : लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी देवणी तालुक्यातील वलांडी येथे जवळपास ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. विश्रामगृह परिसरात झाडे- झुडुपे वाढली असून, विघ्नसंतोषींनी टेबल- खुर्चींची मोडतोड केली आहे. विशेष म्हणजे, हे गृह मद्यपींसाठी आश्रयस्थान बनले आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

देवणी तालुक्याच्या निर्मितीअगोदर उदगीर तालुका होता. त्या कालावधीत उदगीर- निलंगा राज्यमार्गावरील वलांडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व सुविधांनीयुक्त शासकीय विश्रामगृह उभारण्यात आले. तत्कालिन आमदार धर्माजी सोनकवडे यांच्या प्रयत्नातून १९९० च्या दरम्यान ही वास्तू उभारण्यात आली. या इमारतीसाठी भूसंपादन करण्यात येऊन बांधकाम करण्यात आले. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला. या शासकीय विश्रामगृहामुळे या भागात आलेले लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची सोय होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे थोडासा वेळ थांबण्यासाठी अथवा मुक्कामाची सोय झाली.

वलांडीच्या शासकीय विश्रामगृहात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असल्याने सुरुवातीच्या काळात या इमारतीचा वापर होत होता. त्यानंतर मात्र इमारतीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. दरम्यान, या इमारतीच्या देखभालीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारीही सेवानिवृत्त झाले. त्यामुळे इमारतीची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली. सध्या या इमारतीच्या परिसरात झाडे- झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे जनावरांचा वावर होत आहे. परिसरातील काही नागरिक इमारतीच्या परिसरात शौचास जात आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

विशेष म्हणजे, काही मद्यपी या विश्रामगृहाचा आधार घेत आहेत. त्यामुळे विश्रामगृहाबरोबरच परिसरात बाटल्यांचा खच पडल्याचे पहावयास मिळत आहे. याशिवाय, काही विघ्नसंतोषींनी इमारतीतील दारे, खिडक्या, टेबल, खुर्चींची मोडतोड केली आहे. इमारतीच्या दरवाज्यास कुलूप नसल्याने कोणीही कधीही ये-जा करीत असते. त्यामुळे इमारतीचा विविध कारणांसाठीही उपयोग होत असल्याचे पहावयास मिळत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन डागडुजी करून देखभालीसाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

बाटल्यांचा पडला खच...

विश्रामगृहाच्या इमारतीस कुलूप नसल्याने दारे सतत उघडी आहेत. त्यामुळे कोणीही कधीही ये- जा करीत असते. देखभालीसाठी कर्मचारी नसल्याने इमारतीच्या स्वच्छतागृहात बाटल्यांचा खच पडला आहे. तसेच फर्निचर अस्ताव्यस्त पडल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दुरवस्था वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

कर्मचारी नियुक्तीची मागणी...

वलांडीतील शासकीय विश्रामगृहास कर्मचारी नसल्याने देखभाल होत नाही. त्यामुळे ते सध्या बंद आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती देण्यात येऊन कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे देवणीचे प्रभारी उपविभागीय अभियंता पुजारी यांनी सांगितले.