शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वलांडीचे विश्रामगृह मद्यपींसाठी बनले आश्रयस्थान, झाडे- झुडुपे वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST

वलांडी : लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी देवणी तालुक्यातील वलांडी येथे जवळपास ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. ...

वलांडी : लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी देवणी तालुक्यातील वलांडी येथे जवळपास ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. विश्रामगृह परिसरात झाडे- झुडुपे वाढली असून, विघ्नसंतोषींनी टेबल- खुर्चींची मोडतोड केली आहे. विशेष म्हणजे, हे गृह मद्यपींसाठी आश्रयस्थान बनले आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

देवणी तालुक्याच्या निर्मितीअगोदर उदगीर तालुका होता. त्या कालावधीत उदगीर- निलंगा राज्यमार्गावरील वलांडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व सुविधांनीयुक्त शासकीय विश्रामगृह उभारण्यात आले. तत्कालिन आमदार धर्माजी सोनकवडे यांच्या प्रयत्नातून १९९० च्या दरम्यान ही वास्तू उभारण्यात आली. या इमारतीसाठी भूसंपादन करण्यात येऊन बांधकाम करण्यात आले. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला. या शासकीय विश्रामगृहामुळे या भागात आलेले लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची सोय होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे थोडासा वेळ थांबण्यासाठी अथवा मुक्कामाची सोय झाली.

वलांडीच्या शासकीय विश्रामगृहात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असल्याने सुरुवातीच्या काळात या इमारतीचा वापर होत होता. त्यानंतर मात्र इमारतीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. दरम्यान, या इमारतीच्या देखभालीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारीही सेवानिवृत्त झाले. त्यामुळे इमारतीची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली. सध्या या इमारतीच्या परिसरात झाडे- झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे जनावरांचा वावर होत आहे. परिसरातील काही नागरिक इमारतीच्या परिसरात शौचास जात आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

विशेष म्हणजे, काही मद्यपी या विश्रामगृहाचा आधार घेत आहेत. त्यामुळे विश्रामगृहाबरोबरच परिसरात बाटल्यांचा खच पडल्याचे पहावयास मिळत आहे. याशिवाय, काही विघ्नसंतोषींनी इमारतीतील दारे, खिडक्या, टेबल, खुर्चींची मोडतोड केली आहे. इमारतीच्या दरवाज्यास कुलूप नसल्याने कोणीही कधीही ये-जा करीत असते. त्यामुळे इमारतीचा विविध कारणांसाठीही उपयोग होत असल्याचे पहावयास मिळत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन डागडुजी करून देखभालीसाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

बाटल्यांचा पडला खच...

विश्रामगृहाच्या इमारतीस कुलूप नसल्याने दारे सतत उघडी आहेत. त्यामुळे कोणीही कधीही ये- जा करीत असते. देखभालीसाठी कर्मचारी नसल्याने इमारतीच्या स्वच्छतागृहात बाटल्यांचा खच पडला आहे. तसेच फर्निचर अस्ताव्यस्त पडल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दुरवस्था वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

कर्मचारी नियुक्तीची मागणी...

वलांडीतील शासकीय विश्रामगृहास कर्मचारी नसल्याने देखभाल होत नाही. त्यामुळे ते सध्या बंद आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती देण्यात येऊन कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे देवणीचे प्रभारी उपविभागीय अभियंता पुजारी यांनी सांगितले.