शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

सडलेले अन्न, भाजीपाल्यापासून खत निर्मितीसाठी काळी सैनिकी माशीचा वापर!

By हरी मोकाशे | Updated: December 13, 2023 19:49 IST

लातुरातील कृषी महाविद्यालयात तीन महिन्यांपासून प्रयोग

लातूर : सडलेला भाजीपाला, घर- हॉटेलमधील शिल्लक अन् टाकाऊ अन्नाची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच त्यापासून दर्जेदार खत निर्मितीचा प्रयोग तीन महिन्यांपासून लातूरच्या कृषी महाविद्यालयात करण्यात येत आहे. त्यासाठी काळी सैनिकी माशीचा वापर करण्यात येत आहे. हा प्रयोग जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरणारा आहे.

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गतच्या लातुरातील कृषी महाविद्यालयातील किटकशास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी विविध खाद्यांचा काळी सैनिकी माशीच्या जीवनक्रमावरील परिणाम यावर संशोधन करीत आहेत. काळी सैनिकी माशीच्या वापरासंदर्भात विभागप्रमुख डॉ. विजय भामरे म्हणाले, स्वयंपाकगृहातील हिरवा, ओला कचरा, बाजारपेठेत सडलेली फळे, भाजीपाला तसेच घर, हॉटेल, रेस्टॉरंटमधील शिल्लक राहिलेल्या अन्नाचे व्यवस्थापन करण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. या जैविक कचऱ्यामुळे उग्र वास येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. या जैविक कचऱ्याच्या विघटनासाठी शाश्वत उपाय म्हणून काळी सैनिकी माशीचा उपयोग करण्यासंदर्भात संशोधन करण्यात येत आहे. या किटकाची अळी केवळ ४० दिवसांत जैविक कचऱ्याचे विघटन करते. त्यातून दर्जेदार खत निर्मिती होते. विशेष म्हणजे, गांडूळ खताला हा पर्याय आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

संशोधन केंद्राची सहआयुक्तांकडून पाहणी...या संशोधन प्रकल्पास जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त रामदास कोकरे यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विभागप्रमुख डॉ. विजय भामरे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. दयानंद मारेे, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर आदी उपस्थित होते. या प्रकल्पावर कृष्णा मोरे, कृष्णा देशमुख हे संशोधन करीत आहेत.

हॉटेलमधील शिळ्या अन्नाचे लवकर विघटन...कृषी महाविद्यालयातील किटकशास्त्र विभागातील पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी सडलेली फळे- भाजीपाला, गोठ्यातील शेण, पोल्ट्रीमधील टाऊन ओला कचरा आणि हॉटेलमधील शिळ्या अन्नावर काळी सैनिकी माशी सोडली. तेव्हा सर्वाधिक लवकर विघटन हॉटेलमधील टाकाऊ अन्नावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या माशीमुळे ओल्या कचऱ्याची समस्या संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.

ओल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी मदत...प्रत्येक घर, कॉलनी, हॉटेल परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी ओल्या कचऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या भागात काळी सैनिकी माशांचे प्रमाण वाढविल्यास कचऱ्याची समस्या सुटण्याबरोबरच चांगले खत निर्मिती होईल. शिवाय, या माशींच्या अळ्यांचा वापर पोल्ट्री, वराह पालन, मत्स पालनासाठी खाद्यासाठी होऊ शकतो.- डॉ. विजय भामरे, किटकशास्त्र विभागप्रमुख.

 

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र