शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सडलेले अन्न, भाजीपाल्यापासून खत निर्मितीसाठी काळी सैनिकी माशीचा वापर!

By हरी मोकाशे | Updated: December 13, 2023 19:49 IST

लातुरातील कृषी महाविद्यालयात तीन महिन्यांपासून प्रयोग

लातूर : सडलेला भाजीपाला, घर- हॉटेलमधील शिल्लक अन् टाकाऊ अन्नाची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच त्यापासून दर्जेदार खत निर्मितीचा प्रयोग तीन महिन्यांपासून लातूरच्या कृषी महाविद्यालयात करण्यात येत आहे. त्यासाठी काळी सैनिकी माशीचा वापर करण्यात येत आहे. हा प्रयोग जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरणारा आहे.

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गतच्या लातुरातील कृषी महाविद्यालयातील किटकशास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी विविध खाद्यांचा काळी सैनिकी माशीच्या जीवनक्रमावरील परिणाम यावर संशोधन करीत आहेत. काळी सैनिकी माशीच्या वापरासंदर्भात विभागप्रमुख डॉ. विजय भामरे म्हणाले, स्वयंपाकगृहातील हिरवा, ओला कचरा, बाजारपेठेत सडलेली फळे, भाजीपाला तसेच घर, हॉटेल, रेस्टॉरंटमधील शिल्लक राहिलेल्या अन्नाचे व्यवस्थापन करण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. या जैविक कचऱ्यामुळे उग्र वास येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. या जैविक कचऱ्याच्या विघटनासाठी शाश्वत उपाय म्हणून काळी सैनिकी माशीचा उपयोग करण्यासंदर्भात संशोधन करण्यात येत आहे. या किटकाची अळी केवळ ४० दिवसांत जैविक कचऱ्याचे विघटन करते. त्यातून दर्जेदार खत निर्मिती होते. विशेष म्हणजे, गांडूळ खताला हा पर्याय आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

संशोधन केंद्राची सहआयुक्तांकडून पाहणी...या संशोधन प्रकल्पास जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त रामदास कोकरे यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विभागप्रमुख डॉ. विजय भामरे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. दयानंद मारेे, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर आदी उपस्थित होते. या प्रकल्पावर कृष्णा मोरे, कृष्णा देशमुख हे संशोधन करीत आहेत.

हॉटेलमधील शिळ्या अन्नाचे लवकर विघटन...कृषी महाविद्यालयातील किटकशास्त्र विभागातील पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी सडलेली फळे- भाजीपाला, गोठ्यातील शेण, पोल्ट्रीमधील टाऊन ओला कचरा आणि हॉटेलमधील शिळ्या अन्नावर काळी सैनिकी माशी सोडली. तेव्हा सर्वाधिक लवकर विघटन हॉटेलमधील टाकाऊ अन्नावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या माशीमुळे ओल्या कचऱ्याची समस्या संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.

ओल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी मदत...प्रत्येक घर, कॉलनी, हॉटेल परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी ओल्या कचऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या भागात काळी सैनिकी माशांचे प्रमाण वाढविल्यास कचऱ्याची समस्या सुटण्याबरोबरच चांगले खत निर्मिती होईल. शिवाय, या माशींच्या अळ्यांचा वापर पोल्ट्री, वराह पालन, मत्स पालनासाठी खाद्यासाठी होऊ शकतो.- डॉ. विजय भामरे, किटकशास्त्र विभागप्रमुख.

 

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र