शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

अवकाळी पावसाचा रबी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:16 IST

देवणी तालुक्यात बुधवारी वातावरणात बदल होऊन सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रबी हंगामातील ज्वारीसह अन्य पिके भुईसपाट ...

देवणी तालुक्यात बुधवारी वातावरणात बदल होऊन सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रबी हंगामातील ज्वारीसह अन्य पिके भुईसपाट झाली आहे. जवळपास तीन तास पाऊस झाला. वलांडीसह कवठाळ, जवळगा, टाकळी, कोरेवाडी, धनेगाव भागात जोरदार वाऱ्याने ज्वारीचे पिके भुईसपाट झाले. सध्या या भागात ऊसाची तोडणी सुरु असून पावसामुळे शेतात चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे ऊस तोडणीच्या कामात व्यत्यय आला आहे.

तालुक्यात पुरेसा पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांनी टरबुज, खरबुजासह बागायती पिकांची लागवड झाली आहे. या पावसामुळे सरीत पाणी थांबल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. तसेच तुरीची कापणी करुन काही शेतक-यांनी शेतावर टाकली आहे. मात्र, पावसामुळे हे पीक पाण्यात गेले आहे. तसेच हरभ-यात पाणी साचल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टरबुज, खरबुजास फटका...

सध्या मुबलक पाणी असल्याने दोन एकर क्षेत्रावर टरबुज आणि एक एकरवर खरबुजासह केळी, कोंथिबीरची लागवड केली आहे. बुधवारच्या पावसामुळे खरबुजाच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अति पाण्यामुळे या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे, असे येथील शेतकरी सुरेंद्र आंबुलगे यांनी सांगितले.

पुन्हा शेतक-यांवर संकट...

वादळी वा-यासह पाऊस झाल्याने ज्वारी भुईसपाट झाली आहे. तसेच कापणी केलेल्या तुरीच्या पिकात पाणी साचले आहे. हरभ-याच्या पिकात पाणी साचल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतक-यांवर पुन्हा संकट आले आहे, असे बटनपूर येथील शेतकरी संभाजी पाटील यांनी सांगितले.