शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

शेतीकामांसाठी मिळेनात मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST

उदगीर : शेतीकामांसाठी मजुरी कमी अन् तीही वेळेवर नाही. तसेच शेतीतील कामे ही कष्टाची असल्याने ग्रामीण भागासह शहरातील शेतीकामांसाठी ...

उदगीर : शेतीकामांसाठी मजुरी कमी अन् तीही वेळेवर नाही. तसेच शेतीतील कामे ही कष्टाची असल्याने ग्रामीण भागासह शहरातील शेतीकामांसाठी दोन- चार वर्षांपासून मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ऐन राशीच्याच नव्हे, तर इतरवेळीही शेतकऱ्यांना शेतीसाठी मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीसाठी मजूर देता का मजूर अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून गणला जातो. सध्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्यात येत असले तरी शेती निसर्गावर अवलंबून आहे. शेतीकामे ही कष्टाची असल्याने सध्या मजूर ही कामे करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे पर्याय म्हणून शेतीसाठी विविध यंत्रांचा वापर केला जात आहे. त्यामुळे शेतीतील काही कामे सोपी झाली आहेत. परंतु, पिकांच्या काढणीसह अन्य काही कामांसाठी मजुरांची आवश्यकता भासते. त्यामुळे शेतकरी मजुरांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात करतात. मात्र, वेळेवर मजूर न मिळाल्याने शेतीकामे लांबणीवर टाकावी लागत आहेत.

विशेष म्हणजे, मागील काही वर्षांच्या तुलनेत सध्या मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. परंतु, त्यापेक्षा अधिक दर बांधकाम क्षेत्रात मिळत असल्याने मजूर शेतीऐवजी अन्य क्षेत्राकडे वळले आहेत. परिणामी, शेतीकामासाठी येणाऱ्या मजुरांना आता वाहनांची सोयही करून द्यावी लागत आहे.

५ वर्षांपूर्वीचा दर...

पुरुष २५०/- रुपये

महिला १५०/- रुपये

यंदाचा दर...

पुरुष ४५० रुपये

महिला ३०० रुपये

यंत्राने होणारी कामे...

नांगरणी, कोळपणी, पेरणी, काढणी, रास

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा...

ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, कोळपणी, पेरणी केली जाते. तसेच आता ऊसतोडणीसाठीही यंत्र आले आहे. दिवसभरात जवळपास ६ एकरवरील उसाची तोडणी होते. सोयाबीन, तूर, हरभरा काढणी यंत्रेही उपलब्ध झाली आहेत. तसेच यंत्रावरच राशी केल्या जातात.

यंत्राद्वारे वेळेत बचत मात्र परवडत नाही...

सध्या निसर्गाचा समतोल बिघडत आहे. अवेळी वादळ, पाऊस होतो. अशावेळी यंत्राच्या सहाय्याने काढणी करणे शक्य होत नाही. ऐन काढणीवेळी सर्वच शेतकऱ्यांची धावपळ होते. तेव्हा मजूर मिळत नाहीत. अधिक दर देऊनही मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान होते. यंत्राने कामे करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडते.

- भास्कर कुंडगीर, शेतकरी, इस्मालपूर.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत आणि यंत्राने शेती करणे परवडत नाही. कमी उत्पादन व वाढत्याच्या शेती खर्चामुळे ताळमेळ बसत नाही. त्यामुळे अनेकदा मेहनतही वाया जाते. परंतु, आगामी हंगाम पदरी पडेल, अशी शेतकऱ्यांची आशा असते.

- अनंत मुळे, शेतकरी, वाढवणा बु.

दिवसेंदिवस निसर्गाचे चक्र बिघडत असून शेतकऱ्यांना नेहमीच संकटाला सामोरे जावे लागते. त्यातच जनावरांसाठीच्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने बैलबारदाणा ठेवणे शेतकऱ्यांना परवडणासे झाले आहे. ऐनवेळी मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अधिक दर द्यावा लागतो. पेरणीपासून ते राशीपर्यंतची कामे यंत्राने करावी लागत आहेत.

- देवीदास केदार, शेतकरी, देऊळवाडी.