शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

शेतीकामांसाठी मिळेनात मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST

उदगीर : शेतीकामांसाठी मजुरी कमी अन् तीही वेळेवर नाही. तसेच शेतीतील कामे ही कष्टाची असल्याने ग्रामीण भागासह शहरातील शेतीकामांसाठी ...

उदगीर : शेतीकामांसाठी मजुरी कमी अन् तीही वेळेवर नाही. तसेच शेतीतील कामे ही कष्टाची असल्याने ग्रामीण भागासह शहरातील शेतीकामांसाठी दोन- चार वर्षांपासून मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ऐन राशीच्याच नव्हे, तर इतरवेळीही शेतकऱ्यांना शेतीसाठी मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीसाठी मजूर देता का मजूर अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून गणला जातो. सध्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्यात येत असले तरी शेती निसर्गावर अवलंबून आहे. शेतीकामे ही कष्टाची असल्याने सध्या मजूर ही कामे करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे पर्याय म्हणून शेतीसाठी विविध यंत्रांचा वापर केला जात आहे. त्यामुळे शेतीतील काही कामे सोपी झाली आहेत. परंतु, पिकांच्या काढणीसह अन्य काही कामांसाठी मजुरांची आवश्यकता भासते. त्यामुळे शेतकरी मजुरांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात करतात. मात्र, वेळेवर मजूर न मिळाल्याने शेतीकामे लांबणीवर टाकावी लागत आहेत.

विशेष म्हणजे, मागील काही वर्षांच्या तुलनेत सध्या मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. परंतु, त्यापेक्षा अधिक दर बांधकाम क्षेत्रात मिळत असल्याने मजूर शेतीऐवजी अन्य क्षेत्राकडे वळले आहेत. परिणामी, शेतीकामासाठी येणाऱ्या मजुरांना आता वाहनांची सोयही करून द्यावी लागत आहे.

५ वर्षांपूर्वीचा दर...

पुरुष २५०/- रुपये

महिला १५०/- रुपये

यंदाचा दर...

पुरुष ४५० रुपये

महिला ३०० रुपये

यंत्राने होणारी कामे...

नांगरणी, कोळपणी, पेरणी, काढणी, रास

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा...

ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, कोळपणी, पेरणी केली जाते. तसेच आता ऊसतोडणीसाठीही यंत्र आले आहे. दिवसभरात जवळपास ६ एकरवरील उसाची तोडणी होते. सोयाबीन, तूर, हरभरा काढणी यंत्रेही उपलब्ध झाली आहेत. तसेच यंत्रावरच राशी केल्या जातात.

यंत्राद्वारे वेळेत बचत मात्र परवडत नाही...

सध्या निसर्गाचा समतोल बिघडत आहे. अवेळी वादळ, पाऊस होतो. अशावेळी यंत्राच्या सहाय्याने काढणी करणे शक्य होत नाही. ऐन काढणीवेळी सर्वच शेतकऱ्यांची धावपळ होते. तेव्हा मजूर मिळत नाहीत. अधिक दर देऊनही मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान होते. यंत्राने कामे करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडते.

- भास्कर कुंडगीर, शेतकरी, इस्मालपूर.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत आणि यंत्राने शेती करणे परवडत नाही. कमी उत्पादन व वाढत्याच्या शेती खर्चामुळे ताळमेळ बसत नाही. त्यामुळे अनेकदा मेहनतही वाया जाते. परंतु, आगामी हंगाम पदरी पडेल, अशी शेतकऱ्यांची आशा असते.

- अनंत मुळे, शेतकरी, वाढवणा बु.

दिवसेंदिवस निसर्गाचे चक्र बिघडत असून शेतकऱ्यांना नेहमीच संकटाला सामोरे जावे लागते. त्यातच जनावरांसाठीच्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने बैलबारदाणा ठेवणे शेतकऱ्यांना परवडणासे झाले आहे. ऐनवेळी मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अधिक दर द्यावा लागतो. पेरणीपासून ते राशीपर्यंतची कामे यंत्राने करावी लागत आहेत.

- देवीदास केदार, शेतकरी, देऊळवाडी.