शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीकामांसाठी मिळेनात मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST

उदगीर : शेतीकामांसाठी मजुरी कमी अन् तीही वेळेवर नाही. तसेच शेतीतील कामे ही कष्टाची असल्याने ग्रामीण भागासह शहरातील शेतीकामांसाठी ...

उदगीर : शेतीकामांसाठी मजुरी कमी अन् तीही वेळेवर नाही. तसेच शेतीतील कामे ही कष्टाची असल्याने ग्रामीण भागासह शहरातील शेतीकामांसाठी दोन- चार वर्षांपासून मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ऐन राशीच्याच नव्हे, तर इतरवेळीही शेतकऱ्यांना शेतीसाठी मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीसाठी मजूर देता का मजूर अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून गणला जातो. सध्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्यात येत असले तरी शेती निसर्गावर अवलंबून आहे. शेतीकामे ही कष्टाची असल्याने सध्या मजूर ही कामे करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे पर्याय म्हणून शेतीसाठी विविध यंत्रांचा वापर केला जात आहे. त्यामुळे शेतीतील काही कामे सोपी झाली आहेत. परंतु, पिकांच्या काढणीसह अन्य काही कामांसाठी मजुरांची आवश्यकता भासते. त्यामुळे शेतकरी मजुरांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात करतात. मात्र, वेळेवर मजूर न मिळाल्याने शेतीकामे लांबणीवर टाकावी लागत आहेत.

विशेष म्हणजे, मागील काही वर्षांच्या तुलनेत सध्या मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. परंतु, त्यापेक्षा अधिक दर बांधकाम क्षेत्रात मिळत असल्याने मजूर शेतीऐवजी अन्य क्षेत्राकडे वळले आहेत. परिणामी, शेतीकामासाठी येणाऱ्या मजुरांना आता वाहनांची सोयही करून द्यावी लागत आहे.

५ वर्षांपूर्वीचा दर...

पुरुष २५०/- रुपये

महिला १५०/- रुपये

यंदाचा दर...

पुरुष ४५० रुपये

महिला ३०० रुपये

यंत्राने होणारी कामे...

नांगरणी, कोळपणी, पेरणी, काढणी, रास

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा...

ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, कोळपणी, पेरणी केली जाते. तसेच आता ऊसतोडणीसाठीही यंत्र आले आहे. दिवसभरात जवळपास ६ एकरवरील उसाची तोडणी होते. सोयाबीन, तूर, हरभरा काढणी यंत्रेही उपलब्ध झाली आहेत. तसेच यंत्रावरच राशी केल्या जातात.

यंत्राद्वारे वेळेत बचत मात्र परवडत नाही...

सध्या निसर्गाचा समतोल बिघडत आहे. अवेळी वादळ, पाऊस होतो. अशावेळी यंत्राच्या सहाय्याने काढणी करणे शक्य होत नाही. ऐन काढणीवेळी सर्वच शेतकऱ्यांची धावपळ होते. तेव्हा मजूर मिळत नाहीत. अधिक दर देऊनही मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान होते. यंत्राने कामे करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडते.

- भास्कर कुंडगीर, शेतकरी, इस्मालपूर.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत आणि यंत्राने शेती करणे परवडत नाही. कमी उत्पादन व वाढत्याच्या शेती खर्चामुळे ताळमेळ बसत नाही. त्यामुळे अनेकदा मेहनतही वाया जाते. परंतु, आगामी हंगाम पदरी पडेल, अशी शेतकऱ्यांची आशा असते.

- अनंत मुळे, शेतकरी, वाढवणा बु.

दिवसेंदिवस निसर्गाचे चक्र बिघडत असून शेतकऱ्यांना नेहमीच संकटाला सामोरे जावे लागते. त्यातच जनावरांसाठीच्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने बैलबारदाणा ठेवणे शेतकऱ्यांना परवडणासे झाले आहे. ऐनवेळी मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अधिक दर द्यावा लागतो. पेरणीपासून ते राशीपर्यंतची कामे यंत्राने करावी लागत आहेत.

- देवीदास केदार, शेतकरी, देऊळवाडी.