शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

शेतीकामांसाठी मिळेनात मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST

उदगीर : शेतीकामांसाठी मजुरी कमी अन् तीही वेळेवर नाही. तसेच शेतीतील कामे ही कष्टाची असल्याने ग्रामीण भागासह शहरातील शेतीकामांसाठी ...

उदगीर : शेतीकामांसाठी मजुरी कमी अन् तीही वेळेवर नाही. तसेच शेतीतील कामे ही कष्टाची असल्याने ग्रामीण भागासह शहरातील शेतीकामांसाठी दोन- चार वर्षांपासून मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ऐन राशीच्याच नव्हे, तर इतरवेळीही शेतकऱ्यांना शेतीसाठी मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीसाठी मजूर देता का मजूर अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून गणला जातो. सध्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्यात येत असले तरी शेती निसर्गावर अवलंबून आहे. शेतीकामे ही कष्टाची असल्याने सध्या मजूर ही कामे करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे पर्याय म्हणून शेतीसाठी विविध यंत्रांचा वापर केला जात आहे. त्यामुळे शेतीतील काही कामे सोपी झाली आहेत. परंतु, पिकांच्या काढणीसह अन्य काही कामांसाठी मजुरांची आवश्यकता भासते. त्यामुळे शेतकरी मजुरांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात करतात. मात्र, वेळेवर मजूर न मिळाल्याने शेतीकामे लांबणीवर टाकावी लागत आहेत.

विशेष म्हणजे, मागील काही वर्षांच्या तुलनेत सध्या मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. परंतु, त्यापेक्षा अधिक दर बांधकाम क्षेत्रात मिळत असल्याने मजूर शेतीऐवजी अन्य क्षेत्राकडे वळले आहेत. परिणामी, शेतीकामासाठी येणाऱ्या मजुरांना आता वाहनांची सोयही करून द्यावी लागत आहे.

५ वर्षांपूर्वीचा दर...

पुरुष २५०/- रुपये

महिला १५०/- रुपये

यंदाचा दर...

पुरुष ४५० रुपये

महिला ३०० रुपये

यंत्राने होणारी कामे...

नांगरणी, कोळपणी, पेरणी, काढणी, रास

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा...

ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, कोळपणी, पेरणी केली जाते. तसेच आता ऊसतोडणीसाठीही यंत्र आले आहे. दिवसभरात जवळपास ६ एकरवरील उसाची तोडणी होते. सोयाबीन, तूर, हरभरा काढणी यंत्रेही उपलब्ध झाली आहेत. तसेच यंत्रावरच राशी केल्या जातात.

यंत्राद्वारे वेळेत बचत मात्र परवडत नाही...

सध्या निसर्गाचा समतोल बिघडत आहे. अवेळी वादळ, पाऊस होतो. अशावेळी यंत्राच्या सहाय्याने काढणी करणे शक्य होत नाही. ऐन काढणीवेळी सर्वच शेतकऱ्यांची धावपळ होते. तेव्हा मजूर मिळत नाहीत. अधिक दर देऊनही मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान होते. यंत्राने कामे करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडते.

- भास्कर कुंडगीर, शेतकरी, इस्मालपूर.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत आणि यंत्राने शेती करणे परवडत नाही. कमी उत्पादन व वाढत्याच्या शेती खर्चामुळे ताळमेळ बसत नाही. त्यामुळे अनेकदा मेहनतही वाया जाते. परंतु, आगामी हंगाम पदरी पडेल, अशी शेतकऱ्यांची आशा असते.

- अनंत मुळे, शेतकरी, वाढवणा बु.

दिवसेंदिवस निसर्गाचे चक्र बिघडत असून शेतकऱ्यांना नेहमीच संकटाला सामोरे जावे लागते. त्यातच जनावरांसाठीच्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने बैलबारदाणा ठेवणे शेतकऱ्यांना परवडणासे झाले आहे. ऐनवेळी मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अधिक दर द्यावा लागतो. पेरणीपासून ते राशीपर्यंतची कामे यंत्राने करावी लागत आहेत.

- देवीदास केदार, शेतकरी, देऊळवाडी.