गणेशोत्सवानिमित्त येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी, गोविंदराव केंद्रे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, नगरपालिकेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, जिल्हा परिषद सदस्य बस्वराज पाटील कौळखेडकर, एमआयएमचे ताहेर हुसेन, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, समद शेख, समीर शेख, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे, पालिकेचे उपमुख्याधिकारी आसिफ गोलंदाज, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार, महावितरणचे कार्यकारी अभियंता मठपती, उपकार्यकारी अभियंता (शहर) देशमुख आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले, यावर्षी शासनाने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नियम लागू केले आहेत. त्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कुणीही नियम मोडल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.
प्रा. मल्लेश झुंगा स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी आभार मानले.
कॅप्शन...
उदगीर येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे. यावेळी हिंमत जाधव, प्रवीण मेंगशेट्टी, बस्वराज पाटील नागराळकर, संतोष धाराशिवकर, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, प्रा. मनोहर पटवारी, गोविंदराव केंद्रे.