शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

उदगीरातही सोयाबीनला ६ हजार ४५० रुपयांचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST

यंदा शासनाने ३ हजार ८८० रुपयांचा हमीभाव जाहीर केला हाेता. गत वर्षाच्या हमीभावाच्या तुलनेत १७० रुपयांची वाढ करण्यात ...

यंदा शासनाने ३ हजार ८८० रुपयांचा हमीभाव जाहीर केला हाेता. गत वर्षाच्या हमीभावाच्या तुलनेत १७० रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र, यंदा हमी भावाची केंद्रच बंदच होती. सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांची मागणी वाढती असल्याने हंगामत सोयाबीनचे स्थिनर भाव ४ हजाराच्या आसपास होते. तर टप्याटप्याने वाढत गेले. अंतराष्ट्रीय बाजारातील सोया पेंडीला वाढती मागणी. तसेच खाद्यतेलाचे दर वाढत असल्याने सोयाबीनच्या दरात दिवसेंदिव वाढ होत गेली. वायदे बाजारात सोमवारी एकाच दिवसात तब्बल ३०० रुपयांची वाढ झाल्याने प्रत्यक्ष बाजारात त्याचा परिणाम दिसून आला. उदगीरच्या मार्केट यार्डात सोयाबीनला २०१४ नंतर बुधवारी आतापर्यंतचा उच्चांकी ६ हजार ४५० प्रतिक्विंटलला दर मिळाला आहे.

गत तीन महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या मार्केट यार्डात नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. प्रारंभीला परतीच्या पावसाने सोयाबीनचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, शेतमाल काळसर पडला. मात्र, गत एक महीन्यापासून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची आवक वाढली आहे. आवक मोठ्या प्रमाणात होऊनही सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या स्थानिक आणि बाहेरील कारखानदारांकडून मागणी चांगली होती. त्यातच सोयाबीनच्या तेलालाही उठाव असल्याने कारखानदार, साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जोरदार खरेदी केली. बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ हाेत असल्याने सामान्य ग्राहकांत नाराजी आहे. परिणामी, शासनाने आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात होणाऱ्या खाद्य तेलाच्या किंमतीवरील शुल्कात १० टक्के कपात करण्यात आली आहे. परंतु, त्याचा बाजारावर काहीही परीणाम झाला नाही. उलट सोयाबीनचे दर मागील पंधरा दिवसात झपाट्याने वाढतच गेले. आता शेतकऱ्यांकडील शेतीमाल संपत आला आहे. त्यात कारखानदारांकडून मागणी वाढत चालल्याने दरात येणाऱ्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी बोलून दाखवत आहेत.

आगामी काळात दरवाढ हाेणाऱ्या शक्यता...

यंदा देशात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच आयात होणारे पामतेलाचे दरही वाढत चालले आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत पाहता सोयाबीन तेलाचे भाव वाढत आहेत. यंदा भारतातील सोया पेंड अपेक्षेपेक्षा जास्त निर्यात झाली आहे. शेतकऱ्यांकडील माल संपत आला आहे. आता सोयाबीन व्यापाऱ्यांकडे साठा केलेला आहे. ते व्यापारी आणखी दरवाढ होण्याची वाट पहात आहेत. त्यात वायदे बाजारात दर वाढले आहेत. स्थानीक बाजारात मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने येणाऱ्या कांही दिवसांत आणखी दरवाढ होईल. असे उदगीर येथील सागर महाजन म्हणाले.