शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्याअभावी दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:24 IST

उदगीर (जि. लातूर) : उदगीहून लातूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यात आले नसल्याने नेहमीच अंधाराचे साम्राज्य असते. सतत मागणी करुन ...

उदगीर (जि. लातूर) : उदगीहून लातूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यात आले नसल्याने नेहमीच अंधाराचे साम्राज्य असते. सतत मागणी करुन पालिकेचे तीन वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, सतत छोटे-मोठे अपघात घडत आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन त्याचा जीव गमवावा लागला आहे.

कोट्यवधी रुपये खर्चून उदगीर शहरातून लातूरकडे जाणारा रेल्वे उड्डाणपुल सुरु झाला. परंतु, या उड्डाणपुलावर पथदिवे बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सातत्याने पालिका प्रशासनाकडे मागणी केली. परंतु, पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आतापर्यंत या उड्डाणपुलावर चार जणांना आपला अपघातात जीव गमवावा लागला आहे.

शुक्रवारी पहाटेच्यावेळी एमएच २४, डब्ल्यू ९२१९ क्रमांकाच्या दुचाकीवरुन अंकुश भास्कर मोरे (५०, रा. तलमुड, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) हे उदगीरकडे येत होते. ते रेल्वे उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेल्या वळणावर पोहोचले. परंतु, अंधारात अंदाज न आल्याने ते दुचाकीसह खाली कोसळले असावेत, असा अंदाज तपासिक पोलिसांनी व्यक्त केला. सकाळी या भागातील नागरिकांना ही घटना दिसली असता ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे सदरील व्यक्तीस उपचारासाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.