शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

पथदिव्याअभावी दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:24 IST

उदगीर (जि. लातूर) : उदगीहून लातूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यात आले नसल्याने नेहमीच अंधाराचे साम्राज्य असते. सतत मागणी करुन ...

उदगीर (जि. लातूर) : उदगीहून लातूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यात आले नसल्याने नेहमीच अंधाराचे साम्राज्य असते. सतत मागणी करुन पालिकेचे तीन वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, सतत छोटे-मोठे अपघात घडत आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन त्याचा जीव गमवावा लागला आहे.

कोट्यवधी रुपये खर्चून उदगीर शहरातून लातूरकडे जाणारा रेल्वे उड्डाणपुल सुरु झाला. परंतु, या उड्डाणपुलावर पथदिवे बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सातत्याने पालिका प्रशासनाकडे मागणी केली. परंतु, पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आतापर्यंत या उड्डाणपुलावर चार जणांना आपला अपघातात जीव गमवावा लागला आहे.

शुक्रवारी पहाटेच्यावेळी एमएच २४, डब्ल्यू ९२१९ क्रमांकाच्या दुचाकीवरुन अंकुश भास्कर मोरे (५०, रा. तलमुड, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) हे उदगीरकडे येत होते. ते रेल्वे उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेल्या वळणावर पोहोचले. परंतु, अंधारात अंदाज न आल्याने ते दुचाकीसह खाली कोसळले असावेत, असा अंदाज तपासिक पोलिसांनी व्यक्त केला. सकाळी या भागातील नागरिकांना ही घटना दिसली असता ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे सदरील व्यक्तीस उपचारासाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.