शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

पथदिव्याअभावी दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:24 IST

उदगीर (जि. लातूर) : उदगीहून लातूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यात आले नसल्याने नेहमीच अंधाराचे साम्राज्य असते. सतत मागणी करुन ...

उदगीर (जि. लातूर) : उदगीहून लातूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यात आले नसल्याने नेहमीच अंधाराचे साम्राज्य असते. सतत मागणी करुन पालिकेचे तीन वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, सतत छोटे-मोठे अपघात घडत आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन त्याचा जीव गमवावा लागला आहे.

कोट्यवधी रुपये खर्चून उदगीर शहरातून लातूरकडे जाणारा रेल्वे उड्डाणपुल सुरु झाला. परंतु, या उड्डाणपुलावर पथदिवे बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सातत्याने पालिका प्रशासनाकडे मागणी केली. परंतु, पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आतापर्यंत या उड्डाणपुलावर चार जणांना आपला अपघातात जीव गमवावा लागला आहे.

शुक्रवारी पहाटेच्यावेळी एमएच २४, डब्ल्यू ९२१९ क्रमांकाच्या दुचाकीवरुन अंकुश भास्कर मोरे (५०, रा. तलमुड, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) हे उदगीरकडे येत होते. ते रेल्वे उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेल्या वळणावर पोहोचले. परंतु, अंधारात अंदाज न आल्याने ते दुचाकीसह खाली कोसळले असावेत, असा अंदाज तपासिक पोलिसांनी व्यक्त केला. सकाळी या भागातील नागरिकांना ही घटना दिसली असता ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे सदरील व्यक्तीस उपचारासाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.