शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

पथदिव्याअभावी दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:24 IST

उदगीर (जि. लातूर) : उदगीहून लातूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यात आले नसल्याने नेहमीच अंधाराचे साम्राज्य असते. सतत मागणी करुन ...

उदगीर (जि. लातूर) : उदगीहून लातूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यात आले नसल्याने नेहमीच अंधाराचे साम्राज्य असते. सतत मागणी करुन पालिकेचे तीन वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, सतत छोटे-मोठे अपघात घडत आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन त्याचा जीव गमवावा लागला आहे.

कोट्यवधी रुपये खर्चून उदगीर शहरातून लातूरकडे जाणारा रेल्वे उड्डाणपुल सुरु झाला. परंतु, या उड्डाणपुलावर पथदिवे बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सातत्याने पालिका प्रशासनाकडे मागणी केली. परंतु, पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आतापर्यंत या उड्डाणपुलावर चार जणांना आपला अपघातात जीव गमवावा लागला आहे.

शुक्रवारी पहाटेच्यावेळी एमएच २४, डब्ल्यू ९२१९ क्रमांकाच्या दुचाकीवरुन अंकुश भास्कर मोरे (५०, रा. तलमुड, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) हे उदगीरकडे येत होते. ते रेल्वे उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेल्या वळणावर पोहोचले. परंतु, अंधारात अंदाज न आल्याने ते दुचाकीसह खाली कोसळले असावेत, असा अंदाज तपासिक पोलिसांनी व्यक्त केला. सकाळी या भागातील नागरिकांना ही घटना दिसली असता ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे सदरील व्यक्तीस उपचारासाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.