शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

सीबीएसईचे दोन हजार विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST

संदीप शिंदे, लातूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा रद्द केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दोन हजार ...

संदीप शिंदे,

लातूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा रद्द केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थी परीक्षेविनाच पास होणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला असून, किमान ऑनलाईन पद्धतीने तरी परीक्षा घ्यायला हवी, असा सूर विद्यार्थी, पालकांमधून उमटत आहे.

लातूर जिल्ह्यात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या जवळपास १७ शाळा आहेत. यातील दहावी वर्गात यंदाच्या वर्षात २ हजार विद्यार्थी असून, यामध्ये ११०० मुले, तर ९०० मुलींचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असून, राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र, सीबीएसई बोर्डाने बारावीची परीक्षा पुढे ढकलून दहावीची परीक्षा चक्क रद्दच केली आहे. विद्यार्थ्यांना मूल्यमापनाद्वारे गुणांकन केले जाणार असले तरी त्याची पद्धत कशी असणार, पुढील शैक्षणिक वर्गात प्रवेश कसा घेणार असा सवाल पालक, विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सीबीएसईच्या वतीने वर्षभर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला असून, बोर्डाने किमान ऑनलाईन पद्धतीने तरी परीक्षा घ्यायला हवी होती. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीला न्याय मिळाला असता, असे मत पालकांनी व्यक्त केले.

सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी...

मुले - ११००

मुली - ९००

पालक म्हणतात...

दहावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे असते. राज्य मंडळाने ज्याप्रमाणे परीक्षा पुढे ढकलल्या त्याच धर्तीवर सीबीएसई परीक्षा रद्द न करता पुढे ढकलण्याची गरज होती. विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला असून, ग्रेड कसा ठरवणार, प्रवेश कोणत्या बेसवर देणार हा प्रश्न आहे. या निर्णयामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

- प्रा. भास्कर रेड्डी, पालक

विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे चार बाबींवर मूल्यमापन केले जाते. या बाबी लेखी परीक्षेशी अंतर्भूत असतात. मात्र, परीक्षा रद्दच करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार हा प्रश्न आहे. किमान ऑनलाईन पद्धतीने तरी परीक्षा घ्यायला हवी होती. ज्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेचा अंदाज आला असता. आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे जाण्यासाठी आवश्यक असलेली जिज्ञासा परीक्षेमधून दिसून आली असती. - धोंडिराम सुडे, पालक.

केंद्रीय बोर्डाने विद्यार्थ्यांची दर दोन महिन्याला ऑनलाईन परीक्षा घेतली असती तर मूल्यमापन करण्यास सुलभ गेले असते. त्यामुळे अंतिम निकाल परीक्षा न घेता समाधानकारक देता आला असता. मात्र, परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थी आणि पालकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्गदर्शक सूचना जारी करून केंद्रीय बोर्डाने पालक, विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.- डॉ. मंगेश सेलूकर, पालक.

अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक प्रवेश कसे होणार...

दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला असला तरी मूल्यमापन कसे होणार याबाबत सीबीएसईने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या नाहीत. मूल्यमापन कसे करावे याबाबत लवकरच निर्णय सीबीएसई शाळांना कळविला जाणार आहे. त्यामुळे अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेणे हाच पर्याय असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

गुणदान समपातळीवर कसे आणणार...

सीबीएसईच्या वतीने वर्षभर ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्यात आलेला आहे. शाळांच्या वतीने देण्यात येणाऱ्या २० गुणांची यादी बोर्डाकडे पाठविण्यात आली आहे. ८० मार्कांची लेखी परीक्षा होत असते. मात्र, परीक्षा रद्द झाल्याने ८० मार्क कसे द्यावेत, याबाबत केंद्रीय बोर्डाकडून शाळांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण दान होणार असून, समपातळीवर आणण्यासाठी शाळा आणि सीबीएसई बोर्डाच्या वतीने योग्य खबरदारी घेतली जाणार आहे.

शिक्षणतज्ज्ञ प्रतिक्रिया...

देशभरात जवळपास २२ लाख विद्यार्थी सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा देतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य हित लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभरात शाळा आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण झाली होती. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. त्याचा अवलंब केला असता तर विद्यार्थ्यांना सोयीचे झाले असते. - प्राचार्य बी. ए. मैंदर्गे.