शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईचे दोन हजार विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST

संदीप शिंदे, लातूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा रद्द केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दोन हजार ...

संदीप शिंदे,

लातूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा रद्द केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थी परीक्षेविनाच पास होणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला असून, किमान ऑनलाईन पद्धतीने तरी परीक्षा घ्यायला हवी, असा सूर विद्यार्थी, पालकांमधून उमटत आहे.

लातूर जिल्ह्यात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या जवळपास १७ शाळा आहेत. यातील दहावी वर्गात यंदाच्या वर्षात २ हजार विद्यार्थी असून, यामध्ये ११०० मुले, तर ९०० मुलींचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असून, राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र, सीबीएसई बोर्डाने बारावीची परीक्षा पुढे ढकलून दहावीची परीक्षा चक्क रद्दच केली आहे. विद्यार्थ्यांना मूल्यमापनाद्वारे गुणांकन केले जाणार असले तरी त्याची पद्धत कशी असणार, पुढील शैक्षणिक वर्गात प्रवेश कसा घेणार असा सवाल पालक, विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सीबीएसईच्या वतीने वर्षभर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला असून, बोर्डाने किमान ऑनलाईन पद्धतीने तरी परीक्षा घ्यायला हवी होती. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीला न्याय मिळाला असता, असे मत पालकांनी व्यक्त केले.

सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी...

मुले - ११००

मुली - ९००

पालक म्हणतात...

दहावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे असते. राज्य मंडळाने ज्याप्रमाणे परीक्षा पुढे ढकलल्या त्याच धर्तीवर सीबीएसई परीक्षा रद्द न करता पुढे ढकलण्याची गरज होती. विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला असून, ग्रेड कसा ठरवणार, प्रवेश कोणत्या बेसवर देणार हा प्रश्न आहे. या निर्णयामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

- प्रा. भास्कर रेड्डी, पालक

विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे चार बाबींवर मूल्यमापन केले जाते. या बाबी लेखी परीक्षेशी अंतर्भूत असतात. मात्र, परीक्षा रद्दच करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार हा प्रश्न आहे. किमान ऑनलाईन पद्धतीने तरी परीक्षा घ्यायला हवी होती. ज्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेचा अंदाज आला असता. आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे जाण्यासाठी आवश्यक असलेली जिज्ञासा परीक्षेमधून दिसून आली असती. - धोंडिराम सुडे, पालक.

केंद्रीय बोर्डाने विद्यार्थ्यांची दर दोन महिन्याला ऑनलाईन परीक्षा घेतली असती तर मूल्यमापन करण्यास सुलभ गेले असते. त्यामुळे अंतिम निकाल परीक्षा न घेता समाधानकारक देता आला असता. मात्र, परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थी आणि पालकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्गदर्शक सूचना जारी करून केंद्रीय बोर्डाने पालक, विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.- डॉ. मंगेश सेलूकर, पालक.

अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक प्रवेश कसे होणार...

दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला असला तरी मूल्यमापन कसे होणार याबाबत सीबीएसईने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या नाहीत. मूल्यमापन कसे करावे याबाबत लवकरच निर्णय सीबीएसई शाळांना कळविला जाणार आहे. त्यामुळे अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेणे हाच पर्याय असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

गुणदान समपातळीवर कसे आणणार...

सीबीएसईच्या वतीने वर्षभर ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्यात आलेला आहे. शाळांच्या वतीने देण्यात येणाऱ्या २० गुणांची यादी बोर्डाकडे पाठविण्यात आली आहे. ८० मार्कांची लेखी परीक्षा होत असते. मात्र, परीक्षा रद्द झाल्याने ८० मार्क कसे द्यावेत, याबाबत केंद्रीय बोर्डाकडून शाळांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण दान होणार असून, समपातळीवर आणण्यासाठी शाळा आणि सीबीएसई बोर्डाच्या वतीने योग्य खबरदारी घेतली जाणार आहे.

शिक्षणतज्ज्ञ प्रतिक्रिया...

देशभरात जवळपास २२ लाख विद्यार्थी सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा देतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य हित लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभरात शाळा आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण झाली होती. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. त्याचा अवलंब केला असता तर विद्यार्थ्यांना सोयीचे झाले असते. - प्राचार्य बी. ए. मैंदर्गे.