शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दोन दिवसांत २५ बसेस ४ हजार कि.मी. धावल्या; हाती पडले केवळ २ लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST

लातूर : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवासीसंख्या घटली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन असल्याने प्रवाशांची संख्या नगण्य ...

लातूर : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवासीसंख्या घटली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन असल्याने प्रवाशांची संख्या नगण्य झाली आहे. त्यामुळे महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जिल्ह्याअंतर्गत फेऱ्या बंद ठेवल्या आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांत २५ बसेसच्या केवळ ४२ फेऱ्या झाल्या. ४००० कि.मी. या बसेस धावूनही केवळ दोन लाखांच्या आत उत्पन्न मिळाले आहे.

लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा या पाच आगारांत एकूण ४५० बसेस लाॅकडाऊनपूर्वी धावत होत्या. या बसेसच्या ५५० ते ६०० फेऱ्यांतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत होते; परंतु, नंतर लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर ३०० बसेस धावू लागल्या. दिवसाला ३५ लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र गेल्या शनिवार (दि. ३) पासून लाॅकडाऊन आहे. या लाॅकडाऊनमध्ये एस.टी. प्रवासाची मुभा आहे. परंतु, प्रवासीच नाहीत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत फेऱ्याही बंद झाल्या आहेत. विद्यार्थी बसही बंद झाली आहे.

जिल्ह्यात लाॅकडाऊनपूर्वी ४५० बसेसच्या ६०० फेऱ्या होत्या. त्यातून ७० लाखांच्या पुढे दिवसाला उत्पन्न मिळत होते. मात्र २०२० मध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्याने बसेस बंद होत्या. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर एस.टी. धावू लागली. परंतु, प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. प्रतिसाद वाढताच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन आहे. परिणामी, एस.टी.ला लाखोंचा तोटा सहन करावा लागत आहे.

लातूर आगाराच्या शनिवारी (दि. १०) चार फेऱ्या झाल्या. रविवारी चार फेऱ्या पूर्ण झाल्या आणि पुणे येथे एक बस सोडण्यात आली होती. यातून लातूर आगाराला केवळ १३ हजार रुपये मिळाले.

गेल्या दोन दिवसांमध्ये डिझेलपुरतेही पैसे एस.टी.ला मिळू शकले नाहीत. अनलाॅक झाल्यानंतर एस.टी.ची परिस्थिती सुधारत होती. कोरोनावर मात करीत अधिकारी, कर्मचारी कामाला लागले होते. मात्र मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत गेला आणि कडक निर्बंध लागू झाले. त्यामुळे प्रवासीसंख्या घटली. परिणामी, एस.टी.ला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरापासून एस.टी. तोट्यात आहे.

जिल्ह्यात लाॅकडाऊनपूर्वी ४५० बसेसच्या ६०० फेऱ्या होत्या. त्यातून दिवसाला ७० लाखांच्या पुढे उत्पन्न मिळत होते. मात्र २०२० मध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्याने बसेस बंद होत्या. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर एस.टी. धावू लागली. परंतु, प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. प्रतिसाद वाढताच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन आहे. परिणामी, एस.टी.ला लाखोंचा तोटा सहन करावा लागत आहे.