शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

दोन दिवसांत २५ बसेस ४ हजार कि.मी. धावल्या; हाती पडले केवळ २ लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST

लातूर : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवासीसंख्या घटली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन असल्याने प्रवाशांची संख्या नगण्य ...

लातूर : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवासीसंख्या घटली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन असल्याने प्रवाशांची संख्या नगण्य झाली आहे. त्यामुळे महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जिल्ह्याअंतर्गत फेऱ्या बंद ठेवल्या आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांत २५ बसेसच्या केवळ ४२ फेऱ्या झाल्या. ४००० कि.मी. या बसेस धावूनही केवळ दोन लाखांच्या आत उत्पन्न मिळाले आहे.

लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा या पाच आगारांत एकूण ४५० बसेस लाॅकडाऊनपूर्वी धावत होत्या. या बसेसच्या ५५० ते ६०० फेऱ्यांतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत होते; परंतु, नंतर लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर ३०० बसेस धावू लागल्या. दिवसाला ३५ लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र गेल्या शनिवार (दि. ३) पासून लाॅकडाऊन आहे. या लाॅकडाऊनमध्ये एस.टी. प्रवासाची मुभा आहे. परंतु, प्रवासीच नाहीत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत फेऱ्याही बंद झाल्या आहेत. विद्यार्थी बसही बंद झाली आहे.

जिल्ह्यात लाॅकडाऊनपूर्वी ४५० बसेसच्या ६०० फेऱ्या होत्या. त्यातून ७० लाखांच्या पुढे दिवसाला उत्पन्न मिळत होते. मात्र २०२० मध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्याने बसेस बंद होत्या. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर एस.टी. धावू लागली. परंतु, प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. प्रतिसाद वाढताच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन आहे. परिणामी, एस.टी.ला लाखोंचा तोटा सहन करावा लागत आहे.

लातूर आगाराच्या शनिवारी (दि. १०) चार फेऱ्या झाल्या. रविवारी चार फेऱ्या पूर्ण झाल्या आणि पुणे येथे एक बस सोडण्यात आली होती. यातून लातूर आगाराला केवळ १३ हजार रुपये मिळाले.

गेल्या दोन दिवसांमध्ये डिझेलपुरतेही पैसे एस.टी.ला मिळू शकले नाहीत. अनलाॅक झाल्यानंतर एस.टी.ची परिस्थिती सुधारत होती. कोरोनावर मात करीत अधिकारी, कर्मचारी कामाला लागले होते. मात्र मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत गेला आणि कडक निर्बंध लागू झाले. त्यामुळे प्रवासीसंख्या घटली. परिणामी, एस.टी.ला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरापासून एस.टी. तोट्यात आहे.

जिल्ह्यात लाॅकडाऊनपूर्वी ४५० बसेसच्या ६०० फेऱ्या होत्या. त्यातून दिवसाला ७० लाखांच्या पुढे उत्पन्न मिळत होते. मात्र २०२० मध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्याने बसेस बंद होत्या. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर एस.टी. धावू लागली. परंतु, प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. प्रतिसाद वाढताच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन आहे. परिणामी, एस.टी.ला लाखोंचा तोटा सहन करावा लागत आहे.