शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत २५ बसेस ४ हजार कि.मी. धावल्या; हाती पडले केवळ २ लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST

लातूर : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवासीसंख्या घटली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन असल्याने प्रवाशांची संख्या नगण्य ...

लातूर : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवासीसंख्या घटली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन असल्याने प्रवाशांची संख्या नगण्य झाली आहे. त्यामुळे महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जिल्ह्याअंतर्गत फेऱ्या बंद ठेवल्या आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांत २५ बसेसच्या केवळ ४२ फेऱ्या झाल्या. ४००० कि.मी. या बसेस धावूनही केवळ दोन लाखांच्या आत उत्पन्न मिळाले आहे.

लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा या पाच आगारांत एकूण ४५० बसेस लाॅकडाऊनपूर्वी धावत होत्या. या बसेसच्या ५५० ते ६०० फेऱ्यांतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत होते; परंतु, नंतर लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर ३०० बसेस धावू लागल्या. दिवसाला ३५ लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र गेल्या शनिवार (दि. ३) पासून लाॅकडाऊन आहे. या लाॅकडाऊनमध्ये एस.टी. प्रवासाची मुभा आहे. परंतु, प्रवासीच नाहीत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत फेऱ्याही बंद झाल्या आहेत. विद्यार्थी बसही बंद झाली आहे.

जिल्ह्यात लाॅकडाऊनपूर्वी ४५० बसेसच्या ६०० फेऱ्या होत्या. त्यातून ७० लाखांच्या पुढे दिवसाला उत्पन्न मिळत होते. मात्र २०२० मध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्याने बसेस बंद होत्या. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर एस.टी. धावू लागली. परंतु, प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. प्रतिसाद वाढताच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन आहे. परिणामी, एस.टी.ला लाखोंचा तोटा सहन करावा लागत आहे.

लातूर आगाराच्या शनिवारी (दि. १०) चार फेऱ्या झाल्या. रविवारी चार फेऱ्या पूर्ण झाल्या आणि पुणे येथे एक बस सोडण्यात आली होती. यातून लातूर आगाराला केवळ १३ हजार रुपये मिळाले.

गेल्या दोन दिवसांमध्ये डिझेलपुरतेही पैसे एस.टी.ला मिळू शकले नाहीत. अनलाॅक झाल्यानंतर एस.टी.ची परिस्थिती सुधारत होती. कोरोनावर मात करीत अधिकारी, कर्मचारी कामाला लागले होते. मात्र मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत गेला आणि कडक निर्बंध लागू झाले. त्यामुळे प्रवासीसंख्या घटली. परिणामी, एस.टी.ला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरापासून एस.टी. तोट्यात आहे.

जिल्ह्यात लाॅकडाऊनपूर्वी ४५० बसेसच्या ६०० फेऱ्या होत्या. त्यातून दिवसाला ७० लाखांच्या पुढे उत्पन्न मिळत होते. मात्र २०२० मध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्याने बसेस बंद होत्या. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर एस.टी. धावू लागली. परंतु, प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. प्रतिसाद वाढताच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन आहे. परिणामी, एस.टी.ला लाखोंचा तोटा सहन करावा लागत आहे.