शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

लातुरात काँग्रेस-भाजपात होणार अटीतटीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 19:56 IST

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात स्थानिक नेत्यांवरच भिस्त

लातूर : भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, काँग्रेसने राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या सभेतून वातावरण निर्मिती केली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने बैठकांवर भर दिला असून, भाजपने मात्र पदयात्रांसह मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. 

आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी उस्मानाबादला गुंतले आहेत. काँग्रेसला बऱ्याचदा एकाकी झुंज द्यावी लागत आहे. भाजप-शिवसेना मात्र एकदिलाने काम करीत आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांचे वर्चस्व आहे. २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण असे दोन मतदारसंघ झाले. पूर्वी लोकनेते विलासराव देशमुख यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यांनी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपदही भूषविले. त्यांच्या कार्यकाळात शहराचा झपाट्याने विकास झाला.  त्यामुळे या भागात काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख, धीरज देशमुख हे प्रचार करीत आहेत. बुथ पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर आदी वर्गांच्या बैठका घेऊन काँग्रेसने केलेल्या कामांवर मते मागत आहेत. मनपात सत्ता नसल्याने काँग्रेसला विरोधकांवर टीका करायला संधी मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची टाऊन हॉलवर सभा घेतली. यातून काँग्रेसने वातावरण निर्मिती केली आहे. 

भाजपकडून शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे, स्थायीचे सभापती अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे हे नगरसेवकांना घेऊन प्रचारात सक्रिय झाले आहेत. कॉर्नर बैठका व पदयात्रांवर भर दिला जात आहे. औसा येथे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेमुळे भाजपामध्ये चैतन्य आले असून, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे स्वत: लातूर शहरातील प्रचार यंत्रणेत सक्रिय आहेत. सध्या लातूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. ७० पैकी ३६ सदस्य भाजपचे आहेत. काँग्रेस ३३ व राष्ट्रवादीचा एक सदस्य निवडून आला आहे. काटावर बहुमत असलेल्या भाजपला महापालिकेचा कारभार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रचारात मनपाच्या कामावरही काँग्रेस पदाधिकारी टीका करीत आहेत.

वंचित बहुजन आघाडीने मतांची गोळाबेरीज करीत दलित, मुस्लिम, धनगर आदी समाजाच्या मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. एकंदर, लातूर शहराची जनता कोणाच्या पारड्यात माप टाकते, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019latur-pcलातूर