शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सिंधिकामठ बंधाऱ्याचेे बॅरेजमध्ये हाेणार रूपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST

महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सामंजस्य करारानुसार २००६ मध्ये जलसंपदा विभागाकडून काम पूर्ण झाले. या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात महाराष्ट्र राज्यातील देवणी तालुक्यातील ३५० ...

महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सामंजस्य करारानुसार २००६ मध्ये जलसंपदा विभागाकडून काम पूर्ण झाले. या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात महाराष्ट्र राज्यातील देवणी तालुक्यातील ३५० हेक्टर तर कर्नाटकातील भालकी तालुक्यातील ३४४ हेक्टर असे एकूण ६९४ हेक्टर सिंचनाखाली आहे. या बंधाऱ्यावर दोन्ही राज्यांनी ३ कोटी ३ लाख खर्च सिंचनक्षेत्राप्रमाणे खर्च केला आहे. या बंधाऱ्याला अर्ध्या मीटरचे १९९ दरवाजे मनुष्यबळापर्यंत टाकण्यात येतात, पण हे दरवाजे टाकण्यास पाच ते आठ दिवस लागतात. तोपर्यंत पुराचा येवा संपतो, शिवाय या खाेऱ्यात पडणारा पाऊस अनियमित असल्याने, बऱ्याच वेळा समुद्रकिनारी दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोठ्या पावसाच्या नोंदी आहेत. दरम्यानच्या काळात नदीला पूर आल्यानंतर वेळेवर दारे न काढता आल्याने, माती, शेजारचा भराव वाहून जाताे. यातून बंधाऱ्याचे माेठे नुकसान होते. परिणामी, या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याची सोय होत नाही.

पालकमंत्र्यांचे जलसंपदा विभागाला निवेदन...

या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी निवेदन देऊन जलसंपदा विभागाकडे कोल्हापुरी बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करून स्वयंचलित यांत्रिकी दरवाजे बसविण्यात यावेत. यातून शाश्वत पाणीसाठा आणि सिंचनाची मागणी करण्यात आली आहे. नव्याने बॅरेजमध्ये रूपातंर प्रस्तावित कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यासाठी २२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा बंधारा आंतरराज्य असल्याने, दोन्ही राज्यांनी प्रत्येकी ११ कोटींच्या निधीची तरतूद करणे गरजेचे आहे, तर सदरचे पत्र उपकार्यकारी अभियंता निम्न तेरणा कालवा लातूर यांनी अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाला १६ मार्च रोजी दिले आहे. यासाठी आता लोकप्रतिनिधींनी पाठापुरावा करून प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.