शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सिंधिकामठ बंधाऱ्याचेे बॅरेजमध्ये हाेणार रूपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST

महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सामंजस्य करारानुसार २००६ मध्ये जलसंपदा विभागाकडून काम पूर्ण झाले. या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात महाराष्ट्र राज्यातील देवणी तालुक्यातील ३५० ...

महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सामंजस्य करारानुसार २००६ मध्ये जलसंपदा विभागाकडून काम पूर्ण झाले. या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात महाराष्ट्र राज्यातील देवणी तालुक्यातील ३५० हेक्टर तर कर्नाटकातील भालकी तालुक्यातील ३४४ हेक्टर असे एकूण ६९४ हेक्टर सिंचनाखाली आहे. या बंधाऱ्यावर दोन्ही राज्यांनी ३ कोटी ३ लाख खर्च सिंचनक्षेत्राप्रमाणे खर्च केला आहे. या बंधाऱ्याला अर्ध्या मीटरचे १९९ दरवाजे मनुष्यबळापर्यंत टाकण्यात येतात, पण हे दरवाजे टाकण्यास पाच ते आठ दिवस लागतात. तोपर्यंत पुराचा येवा संपतो, शिवाय या खाेऱ्यात पडणारा पाऊस अनियमित असल्याने, बऱ्याच वेळा समुद्रकिनारी दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोठ्या पावसाच्या नोंदी आहेत. दरम्यानच्या काळात नदीला पूर आल्यानंतर वेळेवर दारे न काढता आल्याने, माती, शेजारचा भराव वाहून जाताे. यातून बंधाऱ्याचे माेठे नुकसान होते. परिणामी, या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याची सोय होत नाही.

पालकमंत्र्यांचे जलसंपदा विभागाला निवेदन...

या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी निवेदन देऊन जलसंपदा विभागाकडे कोल्हापुरी बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करून स्वयंचलित यांत्रिकी दरवाजे बसविण्यात यावेत. यातून शाश्वत पाणीसाठा आणि सिंचनाची मागणी करण्यात आली आहे. नव्याने बॅरेजमध्ये रूपातंर प्रस्तावित कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यासाठी २२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा बंधारा आंतरराज्य असल्याने, दोन्ही राज्यांनी प्रत्येकी ११ कोटींच्या निधीची तरतूद करणे गरजेचे आहे, तर सदरचे पत्र उपकार्यकारी अभियंता निम्न तेरणा कालवा लातूर यांनी अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाला १६ मार्च रोजी दिले आहे. यासाठी आता लोकप्रतिनिधींनी पाठापुरावा करून प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.