शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोचे दर कोसळले, २ रुपये प्रति किलो भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:09 IST

औराद शहाजानी : जिल्ह्यात खरीप, रब्बी या दोन्ही हंगामात शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. परंतु, सध्या दर कोसळले असून २ ...

औराद शहाजानी : जिल्ह्यात खरीप, रब्बी या दोन्ही हंगामात शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. परंतु, सध्या दर कोसळले असून २ ते ३ रुपये प्रति किलो दराने विक्री करावी लागत आहे. बाजारपेठेतील घसरलेल्या दरामुळे शेतकरी शेतातील टोमॅटोही काढण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतात लाल चिखल निर्माण होत आहे.

जिल्ह्यात वडवळ नागनाथ, औराद शहाजानी, किल्लारी, औसा, हेर, जानवळ या भागात टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. रब्बी हंगामातील वैशाली टोमॅटोला देशातील विविध भागात मोठ्या प्रमाणात मागणी असते. जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पन्न थेट सपाट जमिनीवर न घेता बेड तयार करून मल्चिंग पेपरवर घेतले जाते. त्यास दोरी व काठीच्या साह्याने बांधीव उत्पादन घेतल्याने दर्जेदार टोमॅटो उत्पादन तयार होते. त्यामुळे या टोमॅटोला मुंबई, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली,उत्तरप्रदेश, दक्षिण भारतासह परदेशातही मागणी मोठी असते.

यावर्षी पाऊस चांगला झाला. जलसाठे भरले. रब्बी हंगामात जिल्ह्यात जवळपास २० हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. तसेच इतर भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. परंतु, यंदा थंडीचे प्रमाण कमी झाले आणि टोमॅटोचा हंगाम जानेवारीतच सुरू झाला. कारण सतत ढगाळ वातावरण, मध्यंतरी झालेल्या पावसामुळे तीन महिने सतत चालणारा ताेडणीचा हंगाम एक महिन्यावर येऊन ठेपला. परिणामी बाजारपेठेत ज्या शेतकऱ्यांची शंभर कॅरेट आवक होती, तिथे दोन हजार कॅरेटची आवक होऊ लागली. साधारणत: ही आवक तीन ते चार महिने विभागून होत असते. आवक एकाचवेळी होत असल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

एकरी सव्वालाखांचा खर्च...

जिल्ह्यात दररोज २० ते २५ हजार कॅरेट टोमॅटोची आवक होत आहे. बाजारात मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने गत महिन्यात २५० ते ३०० रुपये प्रति कॅरेट मिळणारा दर आता ७० ते १०० रुपयांवर येऊन ठेपला आहे. या दरात टोमॅटोची तोडणी करणेही निघत नाही. टोमॅटोसाठी एकरी साधारणत: एक ते सव्वालाखांपर्यंत खर्च होतो. मात्र, कवडीमोल दराने टोमॅटो विक्री करावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणीही बंद केली आहे.

आवक वाढल्याने दरात घसरण...

शेतकरी देवराव म्हेत्रे म्हणाले, सतत ढगाळ वातावरण, मध्यंतरी झालेला पाऊस, थंडीची तीव्रता कमी झाल्याने लागवड वाढली. तीन महिन्यात होणारी करावी लागणारी टोमॅटोची तोडणी एकाच महिन्यात करावी लागत आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक अनेक पटीने वाढली आहे. त्यामुळे दर कोसळले आहेत. तोडणीचाही खर्च निघत नसल्याने ती बंद केली आहे. प्लॉट सांभाळण्यासाठी फवारणी करावी लागेल. त्याचा खर्च आता परवडत नाही. बाजारात मागणी घटली आणि आवक वाढली आहे. बाजार सुधारण्यास काही कालावधी लागेल, असे व्यापारी वहाब पटेल म्हणाले.