शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

टोमॅटोचे दर कोसळले, २ रुपये प्रति किलो भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:09 IST

औराद शहाजानी : जिल्ह्यात खरीप, रब्बी या दोन्ही हंगामात शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. परंतु, सध्या दर कोसळले असून २ ...

औराद शहाजानी : जिल्ह्यात खरीप, रब्बी या दोन्ही हंगामात शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. परंतु, सध्या दर कोसळले असून २ ते ३ रुपये प्रति किलो दराने विक्री करावी लागत आहे. बाजारपेठेतील घसरलेल्या दरामुळे शेतकरी शेतातील टोमॅटोही काढण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतात लाल चिखल निर्माण होत आहे.

जिल्ह्यात वडवळ नागनाथ, औराद शहाजानी, किल्लारी, औसा, हेर, जानवळ या भागात टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. रब्बी हंगामातील वैशाली टोमॅटोला देशातील विविध भागात मोठ्या प्रमाणात मागणी असते. जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पन्न थेट सपाट जमिनीवर न घेता बेड तयार करून मल्चिंग पेपरवर घेतले जाते. त्यास दोरी व काठीच्या साह्याने बांधीव उत्पादन घेतल्याने दर्जेदार टोमॅटो उत्पादन तयार होते. त्यामुळे या टोमॅटोला मुंबई, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली,उत्तरप्रदेश, दक्षिण भारतासह परदेशातही मागणी मोठी असते.

यावर्षी पाऊस चांगला झाला. जलसाठे भरले. रब्बी हंगामात जिल्ह्यात जवळपास २० हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. तसेच इतर भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. परंतु, यंदा थंडीचे प्रमाण कमी झाले आणि टोमॅटोचा हंगाम जानेवारीतच सुरू झाला. कारण सतत ढगाळ वातावरण, मध्यंतरी झालेल्या पावसामुळे तीन महिने सतत चालणारा ताेडणीचा हंगाम एक महिन्यावर येऊन ठेपला. परिणामी बाजारपेठेत ज्या शेतकऱ्यांची शंभर कॅरेट आवक होती, तिथे दोन हजार कॅरेटची आवक होऊ लागली. साधारणत: ही आवक तीन ते चार महिने विभागून होत असते. आवक एकाचवेळी होत असल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

एकरी सव्वालाखांचा खर्च...

जिल्ह्यात दररोज २० ते २५ हजार कॅरेट टोमॅटोची आवक होत आहे. बाजारात मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने गत महिन्यात २५० ते ३०० रुपये प्रति कॅरेट मिळणारा दर आता ७० ते १०० रुपयांवर येऊन ठेपला आहे. या दरात टोमॅटोची तोडणी करणेही निघत नाही. टोमॅटोसाठी एकरी साधारणत: एक ते सव्वालाखांपर्यंत खर्च होतो. मात्र, कवडीमोल दराने टोमॅटो विक्री करावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणीही बंद केली आहे.

आवक वाढल्याने दरात घसरण...

शेतकरी देवराव म्हेत्रे म्हणाले, सतत ढगाळ वातावरण, मध्यंतरी झालेला पाऊस, थंडीची तीव्रता कमी झाल्याने लागवड वाढली. तीन महिन्यात होणारी करावी लागणारी टोमॅटोची तोडणी एकाच महिन्यात करावी लागत आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक अनेक पटीने वाढली आहे. त्यामुळे दर कोसळले आहेत. तोडणीचाही खर्च निघत नसल्याने ती बंद केली आहे. प्लॉट सांभाळण्यासाठी फवारणी करावी लागेल. त्याचा खर्च आता परवडत नाही. बाजारात मागणी घटली आणि आवक वाढली आहे. बाजार सुधारण्यास काही कालावधी लागेल, असे व्यापारी वहाब पटेल म्हणाले.