शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लांबवले 6 लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2017 15:33 IST

एका व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून, चाकू हल्ला करत त्याच्याकडील सहा लाख रुपये असलेली बॅग दोन जणांनी हिसकावल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 14 -  एका व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून, चाकू हल्ला करत त्याच्याकडील सहा लाख रुपये असलेली बॅग दोन जणांनी हिसकावल्याची घटना समोर आली आहे. शहरातील पापविनाश रोडवरील ही घटना आहेत. सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण आहे. 
 
कापड व्यपारी नरेश रतनलाल जाजू (५०) यांचे दयाराम रोड येथे डिलक्स नावाचे गारमेंटचे मोठे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपले दुकान बंद   घराकडे नोकरासह दुचाकीवरुन निघाले. दरम्यान, १०.३० वाजण्याच्या सुमारास घरासमोरील रस्त्याकडेला आपली दुचाकी पार्क करत असताना, पाठीमागून लाल रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात लुटारुंनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यांच्या हातातील ६ लाख रुपयांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. 
 
यावेळी नोकरासोबत या दोघांची झटापट झाली असता, त्याच्यावर चाकू हल्ला करत त्यांनी ही  बॅग हिसकावत दुचाकीवरुन पळ काढला. काही कळायच्या आतच हे दोन लुटारू दुचाकीवरुन पसार झाले. याप्रकणी व्यापारी नरेश जाजू यांच्या फिर्यादीवरुन गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पाळत ठेवून लुटले...?
व्यापारी नरेश जाजू यांच्यावर पाळत ठेवून त्यांना लुटण्यात आल्याचा अंदाज गांधी चौक पोलिसांनी व्यक्त केला आहे. दिवसभर दुकानात बसून राहणा-या जाजू यांच्यावर दररोज किती वाजता हे घराकडे जातात, कुठल्या मार्गाने जातात आणि कुठल्या दुचाकीवरुन जातात याची माहिती घेऊन, त्यांच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवूनच त्यांना लुटल्याचा अंदाज आहे. लुटारू हे नेहमीचेच सराईत असावेत असाही अंदाज पोलिसांचा आहे.
 
लुटालुटीच्या घटनांत वाढ
दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांकडून दिवसाढवळ्या महिला आणि वयोवृद्घ नागरिकांना लुटण्याच्या घटना अलिकडे मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पोलीस केवळ तक्रार दाखल करण्यापलीकडे काहीच करत नसल्याने, लुटारुंचे मनोधर्य वाढत आहे. चापोलीनजीक चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरच्या महिलांना चालत्या आटोतून लुटल्याची घटनाही यापूर्वी घडली आहे. विशेष म्हणजे दिवसाढवळया लुटण्याच्या घटनांमुळे नागरिकांसह व्यापारी वर्गात दशहत आहे. याकडे पोलिस यंत्रणा मात्र, फारसे  गांभीर्याने पहायला तयार नाही. हे विशेष..!