शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लांबवले 6 लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2017 15:33 IST

एका व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून, चाकू हल्ला करत त्याच्याकडील सहा लाख रुपये असलेली बॅग दोन जणांनी हिसकावल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 14 -  एका व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून, चाकू हल्ला करत त्याच्याकडील सहा लाख रुपये असलेली बॅग दोन जणांनी हिसकावल्याची घटना समोर आली आहे. शहरातील पापविनाश रोडवरील ही घटना आहेत. सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण आहे. 
 
कापड व्यपारी नरेश रतनलाल जाजू (५०) यांचे दयाराम रोड येथे डिलक्स नावाचे गारमेंटचे मोठे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपले दुकान बंद   घराकडे नोकरासह दुचाकीवरुन निघाले. दरम्यान, १०.३० वाजण्याच्या सुमारास घरासमोरील रस्त्याकडेला आपली दुचाकी पार्क करत असताना, पाठीमागून लाल रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात लुटारुंनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यांच्या हातातील ६ लाख रुपयांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. 
 
यावेळी नोकरासोबत या दोघांची झटापट झाली असता, त्याच्यावर चाकू हल्ला करत त्यांनी ही  बॅग हिसकावत दुचाकीवरुन पळ काढला. काही कळायच्या आतच हे दोन लुटारू दुचाकीवरुन पसार झाले. याप्रकणी व्यापारी नरेश जाजू यांच्या फिर्यादीवरुन गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पाळत ठेवून लुटले...?
व्यापारी नरेश जाजू यांच्यावर पाळत ठेवून त्यांना लुटण्यात आल्याचा अंदाज गांधी चौक पोलिसांनी व्यक्त केला आहे. दिवसभर दुकानात बसून राहणा-या जाजू यांच्यावर दररोज किती वाजता हे घराकडे जातात, कुठल्या मार्गाने जातात आणि कुठल्या दुचाकीवरुन जातात याची माहिती घेऊन, त्यांच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवूनच त्यांना लुटल्याचा अंदाज आहे. लुटारू हे नेहमीचेच सराईत असावेत असाही अंदाज पोलिसांचा आहे.
 
लुटालुटीच्या घटनांत वाढ
दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांकडून दिवसाढवळ्या महिला आणि वयोवृद्घ नागरिकांना लुटण्याच्या घटना अलिकडे मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पोलीस केवळ तक्रार दाखल करण्यापलीकडे काहीच करत नसल्याने, लुटारुंचे मनोधर्य वाढत आहे. चापोलीनजीक चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरच्या महिलांना चालत्या आटोतून लुटल्याची घटनाही यापूर्वी घडली आहे. विशेष म्हणजे दिवसाढवळया लुटण्याच्या घटनांमुळे नागरिकांसह व्यापारी वर्गात दशहत आहे. याकडे पोलिस यंत्रणा मात्र, फारसे  गांभीर्याने पहायला तयार नाही. हे विशेष..!