शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजारांत घरगाडा चालतो का हो ? राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 12:50 IST

उत्पन्नाचा निकष लावल्याने कर्मचा-यांंच्या पदरी पडणारे वेतन २ हजारांपासून ५ हजारांपर्यंत आहे. तेही चारचार महिने मिळतही नाही.

- आशपाक पठाण लातूर : कामाची वेळ नाही, कधीही उठायचे. सरपंच, ग्रामसेवक सांगेल ते काम करायचे. शिवाय दिवाबत्ती, पाणीपुरवठा हे तर नित्याचे काम. महिनाकाठी पदरी काय पडते, तर दोन ते पाच हजार. २०२० च्या किमान वेतनाची अंमलबजावणी होण्यापूर्वीच राहणीमानभत्ता कमी करण्यात आला. अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे अपेक्षेपोटी सेवा बजावणा-या राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या पदरी पोटाची खळगी भरेल, इतकेही वेतन मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

२०१३ च्या किमान वेतनानुसार ५ हजार १०० ते ७ हजार १०० रुपये वेतन लागू झालेले आहे. दर पाच वर्षांनी वाढ अपेक्षित असताना आजही तेच वेतन दिले जात आहे. त्यात वसुली, उत्पन्नाचा निकष लावल्याने कर्मचा-यांंच्या पदरी पडणारे वेतन २ हजारांपासून ५ हजारांपर्यंत आहे. तेही चारचार महिने मिळतही नाही. मासिक पगाराच्या अपेक्षेवर केलेली उसनवारी वेळेवर परत जात नसल्याने काही कर्मचा-यांची तर पतही घसरली आहे. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून गावस्तरावर प्रामाणिकपणे काम केले. अपेक्षा एवढीच की, किमान कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी यातून भागेल. मात्र, राज्य शासन कर्मचा-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना कर्मचा-यांत निर्माण झाली आहे. कामगार विभागाने १ ऑगस्ट २०२० रोजी नवीन किमान वेतन ११ हजार ६२५ ते १४ हजार १२५ रूपये घोषित केले. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रशासकीय बैठक झाली. एक महिन्यात वेतन लागू करण्याचा निर्णय झाला. वर्षे लोटली तरी अद्याप अंमलबजावणी झाली नाही. सध्या उत्पन्न, वसुलीची अट घातल्याने अनेकांना ७० रुपयेही रोजगार पडत नाही. यातून दोनवेळच्या जेवणाचाही प्रश्न सुटत नाही. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कुठून करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यात जवळपास १६ हजार, तर लातूर जिल्ह्यात १४८५ कर्मचारी आहेत. त्यात शिपाई, लिपिक, दिवाबत्ती, पाणीपुरवठा कर्मचारी अशी वर्गवारी आहे.

तीन हजारांत घरगाडा चालतो का हो...वसुली आणि उत्पन्नाची अट रद्द करून नवीन किमान वेतन सुरू करणे आवश्यक आहे. सध्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेतनातून कपात होते. ग्रामपंचायतीचा वाटा वेळेवर भरला जात नाही. शासनाने नवीन किमान वेतन वाढविण्यापूर्वीच राहणीमानभत्ता कमी केला. आता मासिक पदरी पडणारी रक्कम ही २ ते ५ हजारांच्या घरात आहे. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम केले. आमचा साधा विमासुद्धा काढला गेला नाही, अशी खंत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे मराठवाडा अध्यक्ष दयानंद येरंडे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :laturलातूरState Governmentराज्य सरकार