शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजारांत घरगाडा चालतो का हो ? राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 12:50 IST

उत्पन्नाचा निकष लावल्याने कर्मचा-यांंच्या पदरी पडणारे वेतन २ हजारांपासून ५ हजारांपर्यंत आहे. तेही चारचार महिने मिळतही नाही.

- आशपाक पठाण लातूर : कामाची वेळ नाही, कधीही उठायचे. सरपंच, ग्रामसेवक सांगेल ते काम करायचे. शिवाय दिवाबत्ती, पाणीपुरवठा हे तर नित्याचे काम. महिनाकाठी पदरी काय पडते, तर दोन ते पाच हजार. २०२० च्या किमान वेतनाची अंमलबजावणी होण्यापूर्वीच राहणीमानभत्ता कमी करण्यात आला. अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे अपेक्षेपोटी सेवा बजावणा-या राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या पदरी पोटाची खळगी भरेल, इतकेही वेतन मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

२०१३ च्या किमान वेतनानुसार ५ हजार १०० ते ७ हजार १०० रुपये वेतन लागू झालेले आहे. दर पाच वर्षांनी वाढ अपेक्षित असताना आजही तेच वेतन दिले जात आहे. त्यात वसुली, उत्पन्नाचा निकष लावल्याने कर्मचा-यांंच्या पदरी पडणारे वेतन २ हजारांपासून ५ हजारांपर्यंत आहे. तेही चारचार महिने मिळतही नाही. मासिक पगाराच्या अपेक्षेवर केलेली उसनवारी वेळेवर परत जात नसल्याने काही कर्मचा-यांची तर पतही घसरली आहे. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून गावस्तरावर प्रामाणिकपणे काम केले. अपेक्षा एवढीच की, किमान कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी यातून भागेल. मात्र, राज्य शासन कर्मचा-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना कर्मचा-यांत निर्माण झाली आहे. कामगार विभागाने १ ऑगस्ट २०२० रोजी नवीन किमान वेतन ११ हजार ६२५ ते १४ हजार १२५ रूपये घोषित केले. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रशासकीय बैठक झाली. एक महिन्यात वेतन लागू करण्याचा निर्णय झाला. वर्षे लोटली तरी अद्याप अंमलबजावणी झाली नाही. सध्या उत्पन्न, वसुलीची अट घातल्याने अनेकांना ७० रुपयेही रोजगार पडत नाही. यातून दोनवेळच्या जेवणाचाही प्रश्न सुटत नाही. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कुठून करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यात जवळपास १६ हजार, तर लातूर जिल्ह्यात १४८५ कर्मचारी आहेत. त्यात शिपाई, लिपिक, दिवाबत्ती, पाणीपुरवठा कर्मचारी अशी वर्गवारी आहे.

तीन हजारांत घरगाडा चालतो का हो...वसुली आणि उत्पन्नाची अट रद्द करून नवीन किमान वेतन सुरू करणे आवश्यक आहे. सध्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेतनातून कपात होते. ग्रामपंचायतीचा वाटा वेळेवर भरला जात नाही. शासनाने नवीन किमान वेतन वाढविण्यापूर्वीच राहणीमानभत्ता कमी केला. आता मासिक पदरी पडणारी रक्कम ही २ ते ५ हजारांच्या घरात आहे. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम केले. आमचा साधा विमासुद्धा काढला गेला नाही, अशी खंत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे मराठवाडा अध्यक्ष दयानंद येरंडे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :laturलातूरState Governmentराज्य सरकार