शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

औराद शहाजानी परिसरातील तीन उच्चस्तरीय बंधारे काेरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST

गत दोन आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा घसरला हाेता. मात्र, पुन्हा ढगाळ ...

गत दोन आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा घसरला हाेता. मात्र, पुन्हा ढगाळ वातावरण कमी झाल्यानंतर तापमानाचा पारा पुन्हा ४० अंशाच्या घरात गेला आहे. आता गत चार दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात वाढ हाेत आहे. सकाळी दहानंतर रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. सायंकाळी ५ पर्यंत वातावरणातील उकाडा कायम राहत आहे. सायंकाळी सहानंतरच नागरिक घराबाहेर पडणे पसंत करत आहेत. सध्याला वाढत्या उन्हाच्या चटक्याने शेतकरीही आपली शेतीतील उन्हाळी कामेही सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात करत आहेत. सध्याला शेत-शिवारात माेठ्या प्रमाणावर शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. रविवार, २८ मार्च राेजी औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर या परिसरातील तपामान ४० अंशावर पाेहाेचला असल्याची नाेंद आहे. गत आठवड्यात हेच तापमान ३८ अंशाच्या घरात हाेते. गत चार दिवसांपासून वाढणाऱ्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून, दुपारी रस्ते निर्मनुष्य दिसून येत आहेत. नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या सावलीचा आधार घेत आहेत. शुक्रवारी कमाल तापमान ३८ अंश, शनिवारी कमाल तापमान ३८.५ तर रविवारी कमाल तापमान ४० अंशावर गेल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. तर किमान तापमानही २४.५ पोहोचल्याने रात्री उकाडा जाणवत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घसरत आहे. बाष्पीभवनाचा दर सात मिलिमीटर इतका वर पोहोचल्याने पाणी पातळीत घट होत आहे.

बंधाऱ्यातील जलसाठा घसरला...

औराद शहाजानी जलसिंचन शाखेंतर्गत असलेल्या तेरणा नदीपात्रावर एकूण सात बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये औराद शहाजानी, वांजरखेडा, तगरखेडा, गुंजरगा, साेनखेड, मदनसुरी, लिंबाळा, किल्लारी -१ आणि किल्लारी -२ यांचा समावेश आहे. सध्याला वाढत्या तापमानामुळे या सातही बंधाऱ्यातील जलसाठ्यावर माेठा परिणाम झाला आहे. दिवसेंदिवस धरणातील जलसाठ्यात घट हाेत असून, जूनअखेरपर्यंत हा जलसाठा कमालीचा घसरणार असल्याचे औराद शहाजानी येथील जलसिंचन शाखा अधिकारी एस.आर. मुळे म्हणाले.

मार्चमध्येच तीन बंधारे पडले काेरडे...

औराद शहाजानी येथील तेरणा नदीपात्रावर एकूण सात बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. गत आठवड्यात ढगाळ वातावरण हाेते. आता या वातावरणात बदल झाल्याने, पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्याला वाढणाऱ्या तापमानामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने घसरत आहे. सात बंधाऱ्यांपैकी वांजरखेडा, साेनखेड आणि लिंबाळा ही बंधारे काेरडी पडली आहेत. तर चार बंधाऱ्यांमध्ये सरासरी जलसाठा ४० ते ५० टक्क्यांच्या घरात आला आहे.

तापमानात आणखी हाेणार वाढ...

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गत चार दिवसांपासून तापमानाचा पार वाढला आहे. सध्याचे तापमान ४० अंशावर गेले आहे. परिणामी, गत आडवड्यात हाच पारा ३८ अंशावर हाेता. आता वातावरणात बदल झाला असून, तापमान वाढल्याने उकाडाही वाढला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढत हाेत असल्याने, रस्त्यावरही शुकशुकाट दिसून येत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात हाच तापमानाचा पारा ४५ अंशावर राहणार असल्याचे हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाइकवाडे यांनी सांगितले.