शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

औराद शहाजानी परिसरातील तीन उच्चस्तरीय बंधारे काेरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST

गत दोन आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा घसरला हाेता. मात्र, पुन्हा ढगाळ ...

गत दोन आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा घसरला हाेता. मात्र, पुन्हा ढगाळ वातावरण कमी झाल्यानंतर तापमानाचा पारा पुन्हा ४० अंशाच्या घरात गेला आहे. आता गत चार दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात वाढ हाेत आहे. सकाळी दहानंतर रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. सायंकाळी ५ पर्यंत वातावरणातील उकाडा कायम राहत आहे. सायंकाळी सहानंतरच नागरिक घराबाहेर पडणे पसंत करत आहेत. सध्याला वाढत्या उन्हाच्या चटक्याने शेतकरीही आपली शेतीतील उन्हाळी कामेही सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात करत आहेत. सध्याला शेत-शिवारात माेठ्या प्रमाणावर शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. रविवार, २८ मार्च राेजी औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर या परिसरातील तपामान ४० अंशावर पाेहाेचला असल्याची नाेंद आहे. गत आठवड्यात हेच तापमान ३८ अंशाच्या घरात हाेते. गत चार दिवसांपासून वाढणाऱ्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून, दुपारी रस्ते निर्मनुष्य दिसून येत आहेत. नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या सावलीचा आधार घेत आहेत. शुक्रवारी कमाल तापमान ३८ अंश, शनिवारी कमाल तापमान ३८.५ तर रविवारी कमाल तापमान ४० अंशावर गेल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. तर किमान तापमानही २४.५ पोहोचल्याने रात्री उकाडा जाणवत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घसरत आहे. बाष्पीभवनाचा दर सात मिलिमीटर इतका वर पोहोचल्याने पाणी पातळीत घट होत आहे.

बंधाऱ्यातील जलसाठा घसरला...

औराद शहाजानी जलसिंचन शाखेंतर्गत असलेल्या तेरणा नदीपात्रावर एकूण सात बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये औराद शहाजानी, वांजरखेडा, तगरखेडा, गुंजरगा, साेनखेड, मदनसुरी, लिंबाळा, किल्लारी -१ आणि किल्लारी -२ यांचा समावेश आहे. सध्याला वाढत्या तापमानामुळे या सातही बंधाऱ्यातील जलसाठ्यावर माेठा परिणाम झाला आहे. दिवसेंदिवस धरणातील जलसाठ्यात घट हाेत असून, जूनअखेरपर्यंत हा जलसाठा कमालीचा घसरणार असल्याचे औराद शहाजानी येथील जलसिंचन शाखा अधिकारी एस.आर. मुळे म्हणाले.

मार्चमध्येच तीन बंधारे पडले काेरडे...

औराद शहाजानी येथील तेरणा नदीपात्रावर एकूण सात बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. गत आठवड्यात ढगाळ वातावरण हाेते. आता या वातावरणात बदल झाल्याने, पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्याला वाढणाऱ्या तापमानामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने घसरत आहे. सात बंधाऱ्यांपैकी वांजरखेडा, साेनखेड आणि लिंबाळा ही बंधारे काेरडी पडली आहेत. तर चार बंधाऱ्यांमध्ये सरासरी जलसाठा ४० ते ५० टक्क्यांच्या घरात आला आहे.

तापमानात आणखी हाेणार वाढ...

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गत चार दिवसांपासून तापमानाचा पार वाढला आहे. सध्याचे तापमान ४० अंशावर गेले आहे. परिणामी, गत आडवड्यात हाच पारा ३८ अंशावर हाेता. आता वातावरणात बदल झाला असून, तापमान वाढल्याने उकाडाही वाढला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढत हाेत असल्याने, रस्त्यावरही शुकशुकाट दिसून येत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात हाच तापमानाचा पारा ४५ अंशावर राहणार असल्याचे हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाइकवाडे यांनी सांगितले.