शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी हजार शेतकरी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांच्या बागायती शेतीला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे वीज ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांच्या बागायती शेतीला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे वीज पुरवठ्याची समस्या मिटविण्यासाठी एक हजार शेतकरी सरसावले आहेत. ग्रामस्वराज्य संघटनेच्या पुढाकाराने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यास या शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देऊन ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील धामणगाव, कारेवाडी, बोळेगाव, नागेवाडी, दगडवाडी, जोगाळा या सहा गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी महावितरणच्या येरोळ येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरुन विद्युत पुरवठा केला जातो. परंतु, या उपकेंद्रावर प्रचंड भार असल्याने अनेक गावांतील शेतकऱ्यांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. त्यामुळे पाणी आहे, पण वीजपुरवठा सुरळीत होत नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत आहे. वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी वारंवार महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आली. परंतु, त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्वराज्य संघटनेने वीज पुरवठ्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी पुढाकार घेतला असून, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनराज पाटील धामणगावकर यांनी सहा गावांतील एक हजार शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सहा गावांसाठी नवीन ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी एक हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यास शुक्रवारी देण्यात आले.

पाणी आहे, वीज नसल्याने अडचण...

घरणी मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना बागायती शेतीसाठी फायदा झाला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पाणी आहे, पण वीज नाही अशी शेतकऱ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटत असल्याचे ग्रामस्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनराज पाटील धामणगावकर यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तीदिनी आंदोलन...

तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी महावितरण कार्यालयाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत नवीन ३३ केव्ही वीज उपकेंद्रास मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी आंदोलन करण्यात येणार असल्याचे धनराज पाटील धामणगावकर म्हणाले.