शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरमधील रुग्णांना घराकडून दिल्या जाणाऱ्या डब्याची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:17 IST

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असून, शहरात बाधितांची संख्या २५०च्या जवळपास पोहोचली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासन कठोर निर्णय ...

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असून, शहरात बाधितांची संख्या २५०च्या जवळपास पोहोचली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासन कठोर निर्णय घेणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करून तहसीलदार डॉ. बिडवे म्हणाले, राज्य शासनाने १ मेपर्यंत लॉकडाऊन लागू केले आहे. परंतु, काहीजण आजही बिनधास्त फिरत आहेत. विनाकारण रस्त्यावर दिसून येत आहे. होम आयसोलेशनमधील काही जण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढत आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये बाधितांच्या नातेवाइकांना प्रवेश नसतानाही गर्दी करीत आहेत. तेव्हा नागरिकांनी अशी गर्दी करू नये.

रस्त्यावर नाहक फिरणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना रोखण्यासाठी शहरात महसूल, पोलीस, नगरपंचायती कर्मचाऱ्यांची पथके निर्माण करून कार्यवाही केली जाणार आहे. शहरात फिरते पथक तैनात राहणार आहे. कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. गावपातळीवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांची कोरोना दक्षता समिती आहे. गाव पातळीवर त्यांनी सतर्क रहावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, असे आदेश ग्रामसेवकांना दिले आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालयात ३० खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लवकरच कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त ५० खाटांची सुविधा होणार आहे. त्यासाठीचे साहित्य मागविण्यात आले आहे, असेही तहसीलदार डॉ. बिडवे म्हणाले. यावेळी पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे उपस्थित होते.

दंडात्मक कार्यवाही केली जाणार...

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांनी सांगितले. ग्रामीण भागातून काहीजण विनाकारण शहरात येत आहेत. शहरात बेफिकीरपणे फिरणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे लागतील, असेही पो.नि. सिरसाठ म्हणाले. नगरपंचायतीचे कर्मचारी सोमवारपासून शहरात कार्यन्वित राहतील. कोविड सेंटरमधील स्वच्छता चांगल्या प्रकारे होत आहे, असे मुख्याधिकारी रणदिवे यांनी सांगितले.