शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
2
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
3
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
5
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
6
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
7
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
8
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
9
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
10
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
11
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
12
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
13
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
14
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
15
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
16
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
17
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
18
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
19
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम

गुन्हेगारीतही आले नवीन चेहरे; कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST

लातूर : मार्च २०२० पासून कोरोना महामारीने अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. अर्थचक्र ठप्प झाल्याने अनेक कुटुंब त्रस्त आहेत. ...

लातूर : मार्च २०२० पासून कोरोना महामारीने अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. अर्थचक्र ठप्प झाल्याने अनेक कुटुंब त्रस्त आहेत. हजारो नागरिकांचे रोजगारही बुडाले आहेत. याच काळात गुन्हेगारी क्षेत्रात नव्या चेहऱ्यांनी शिरकाव केला आहे. सायबर गुन्हेगारी वाढली असून, कोरोनाने पोलीस दलाची मात्र डोकेदुखी वाढविली आहे.

लातूर जिल्ह्यात गुन्हेगारीचा टक्का वाढला आहे. लॉकडाऊनच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले. मात्र व्यवहार पूर्वपदावर आल्यानंतर गुन्हेगारीने डोके वर काढले. यात दरोडा, घरफोडी जबरी चोरी, फसवणूक, शेतीचे वाद, अपघात, मटका, जुगार आणि इतर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. नव्या चेहऱ्यांनी गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला आहे. परिणामी, कोरोना काळातील गुन्हेगारीने पोलिसांची डोकेदुखी वाढविली आहे.

गुन्हेगारी क्षेत्रात आले नवे चेहरे

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लातूरच्या गुन्हेगारीचा आलेख कमी आहे. मात्र कोरोनाने गुन्हेगारीत नवे चेहरे दाखल झाले आहेत.

नव्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड आणि तपशील ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे.

गुन्हेगारीत नवीन चेहरे आल्याने पोलिसांचीही चिंता वाढली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत माहिती संकलित केली जात आहे.

जिल्ह्यात घटना घडल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाते. गुन्हेगाराला अटक करण्याची प्रक्रियाही केली जाते. यातून पुढील होणारे परिणाम रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात. तपासाची गती वाढविल्याने अनेक गुन्ह्यांतील गुन्हेगार २४ तासांच्या आत गळाला लागतात. -निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर

कोरोनाने आर्थिक गणित बिघडले आहे. यातून कुटुंबात मानसिक ताणतणाव वाढला आहे. अनेकांचा हक्काचा रोजगार गेल्याने प्रपंचाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योग आणि व्यवसायही डबघाईला आल्याने मानसिक त्रास अनेकांना सहन करावा लागतो. अशावेळी समुपदेशनासह आधाराची गरज आहे. - डॉ. ओमप्रकाश कदम

खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार

जिल्ह्यातील गुन्हेगारीचा टक्का समोर ठेवून पोलिसांना आता खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासात खबऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. यातून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते.