शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दूध भुकटी प्रकल्प निघणार भंगारात ! एकेकाळी उदगीरचे होते वैभव

By संदीप शिंदे | Updated: July 28, 2023 17:39 IST

शासनस्तरावरून आता हा प्रकल्प भंगारमध्ये काढण्याच्या हालचाली सुरू

उदगीर : एकेकाळी तालुक्याचे वैभव असलेला शासकीय दूध भुकटी प्रकल्प आता शेवटच्या घटका मोजत आहे. हा प्रकल्प मागील काही वर्षांपासून बंद असून, शासनस्तरावरून आता हा प्रकल्प भंगारमध्ये काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे शासनाने मान्यता दिल्यानंतर काही दिवसांत निविदा निघणार असून, प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने मागील १४ वर्षांत हालचाल न झाल्याने ही वेळ आली आहे. दरम्यान, प्रकल्पाची मोकळी जागा महत्त्वाची ठरणारी आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८मध्ये उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. दि. १९ जानेवारी १९७९मध्ये तो सुरू झाला. जून २००२ पर्यंत हा प्रकल्प सुरू होता. त्यानंतर या ना त्या कारणाने तो बंद पडला. नोव्हेंबर २००८ मध्ये तत्कालीन आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. मात्र, त्यानंतर पुन्हा बंद पडला तो अद्यापपर्यंत चालूच झाला नाही. नव्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी समितीने १३ कोटी खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. मात्र त्यावर कारवाईच झाली नाही.

दूध भुकटी प्रकल्पाची क्षमता दररोज १ लाख २० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची होती. प्रकल्पाच्या ६० किलोमीटर परिसरातील अंबाजोगाई, गंगाखेड, भूम, परंडा , कळंब, अहमदपूर, लोहा, निलंगा, परभणी, धाराशिव, उमरगा आदी ठिकाणचे कच्चे थंड केलेले दूध भुकटी प्रकल्पासाठी येत होते. दूध भुकटी प्रकल्पातून तयार झालेली दूध भुकटी व पांढरे लोणी देशातील अनेक भागांत विकले जात होते. यातून राज्य शासनास चांगले उत्पन्न मिळत होते. त्याकाळात ५३५ कर्मचारी काम करत होते. शासनाने १३ एकर जागेवर दोन कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प सुरू केला होता. तब्बल २४ वर्षे उत्तम प्रकारे चालला. २००२ ते २००८ या काळात हा प्रकल्प बंद पडलेला होता. या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी ५९ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. डिसेंबर २०१४ ते ७ ऑगस्ट २०१५ पर्यंत दूध भुकटी प्रकल्प सुरू होता. मात्र, ऑगस्ट २०१५ नंतर बॉयलरमध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे तो बंद झाला तो आजपर्यंत बंदच आहे.

प्रकल्पातील मशिनरीचे कंपनीकडून मुल्यांकन...सुरुवातीला या प्रकल्पात पाचशेपेक्षा जास्त कर्मचारी आज केवळ आठ कर्मचारी कामावर आहेत. आता हा प्रकल्प बंदच आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका कंपनीमार्फत या मशिनरीचे मूल्यांकन करण्यात आले असून, त्याची माहिती माहीती शासनाकडे पाठविण्यात आली असल्याचे उदगीर येथील प्रभारी दुग्धशाळा उपव्यवस्थापक नितीन फावडे यांनी सांगितले. यानंतर पुढील कारवाई काय होणार याबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरState Governmentराज्य सरकार