जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत कोरोना लसीकरण करण्यासाठी वेग वाढविण्यात आला आहे. त्यानुसार, गावागावांत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तगरखेडा येथील सरपंच केवळाबाई सूर्यवंशी, उपसरपंच मदन बिरादार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी गावात आपापल्या प्रभागामध्ये जनजागृती करत, नागरिकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन केले. काही ग्रामस्थांनी त्यांच्या घरी जाऊन लसीकरणाबद्दल जनजागृती केली. औराद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.वैभव कांबळे, तगरखेडा उपकेंद्राच्या डाॅ.सविता भारती, समशाद मुल्ला आणि त्यांच्या पथकाने पुढाकार घेत, गावात जास्तीतजास्त लसीकरणासाठी शिबिर घेतले. गावात ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती मोहीम राबवत जास्तीतजास्त लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले हाेते. सर्व गावकऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीला यश आले. गटविकास अधिकारी अमाेल ताकभाते, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रदीपकुमार जाधव, आरोग्य विभाग सतत जास्तीतजास्त लसीकरणासाठी प्रयत्नशील राहिले, तसेच काही नागरिकांना घरी जाऊन लस देण्यात आली. तगरखेडा गावाची एकूण लोकसंख्या ३ हजार ३४० आहे. गावातील १८ वर्षांवरील लोकसंख्या २ हजार २५५ आणि १०० टक्के लसीकरण झालेली संख्या २ हजार ३५३ आहे
या उपक्रमातील लसीकरण केंद्राला पंचायत समिती उपसभापती अंजली पाटील यांनी भेट दिली. यावेळी सरपंच केवळाबाई सूर्यवंशी, उपसरपंच मदन बिराजदार, औराद भाजप अध्यक्ष राजा पाटील, ग्रामविकास अधिकारी एस.एच. गिरी, डाॅ.सविता भारती, रणजीत सूर्यवंशी, ग्रा.पं. सदस्य सुभाष डावरगावे, सुरेश थेटे यांची उपस्थिती हाेती.