शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

घरावरून गेलेल्या ३२ केव्हीच्या विद्युत लाईनसाठी अभियंत्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:34 IST

गौर येथे वीस वर्षांपूर्वी ३२ केवी महावितरण कंपनीची लाईन गावातून गेली असल्यामुळे सुमारे पंचवीस कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे ...

गौर येथे वीस वर्षांपूर्वी ३२ केवी महावितरण कंपनीची लाईन गावातून गेली असल्यामुळे सुमारे पंचवीस कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे .अगदी माळवदावर खेळणाऱ्या किंवा वावरणाऱ्या नागरिकांना या लाईनचा मोठा त्रास होत असून महिलांनी आम्हाला माळवदावर कपडे वाळू घालणे, धान्य वाळवणे, पापड, कुरडया करण्यासाठी मोठा त्रास होत आहे, असे सांगितले. सदरील लाईन तात्काळ काढून घ्यावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून नागरिक महावितरण कार्यालयात खेटे घालत आहेत. मात्र कार्यालयाकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने बुधवारी गौरी येथील नागरिकांनी कार्यकारी अभियंता ढाकणे यांची भेट घेऊन निलंगा येथील कार्यालयात त्यांना घेराव घातला. यावेळी गोपाळ भोजने, बबलू भोजने, शत्रुघ्न खंदाडे, बालाजी घोडके, पांडुरंग गारकर, आनंत पवार, राम सूर्यवंशी, लहू सूर्यवंशी, प्रकाश पांचाळ, विठ्ठल पांचाळ, हबीब शेख, रानबा नोरखडे, शेषराव चव्हाण रतन कदम, अनंत घारोळ, रमेश कदम, नायक सावंत, ज्ञानोबा गायकवाड, नामदेव भोजने, विठ्ठल शिंदे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरिष्ठांना अहवाल देणार- अभियंता ढाकणे

यावेळी कार्यकारी अभियंता ढाकणे म्हणाले की, सदरील बाबीची आम्ही वरिष्ठांना लेखी स्वरूपात अहवाल सादर करून देऊ व लवकरात लवकर ग्रामस्थांची ही समस्या सोडवू असे म्हणाले. आज पर्यंत कोणताही धोका किंवा अपघात झाला नाही .मात्र यात काही नुकसान झाले किंबहुना एखाद्याचा जीव गेल्यानंतरच याची सोय करणार आहात काय असा सवाल यावेळी गोपाळ भोजणे यांनी महावितरण प्रशासनास केला.