शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

घरावरून गेलेल्या ३२ केव्हीच्या विद्युत लाईनसाठी अभियंत्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:34 IST

गौर येथे वीस वर्षांपूर्वी ३२ केवी महावितरण कंपनीची लाईन गावातून गेली असल्यामुळे सुमारे पंचवीस कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे ...

गौर येथे वीस वर्षांपूर्वी ३२ केवी महावितरण कंपनीची लाईन गावातून गेली असल्यामुळे सुमारे पंचवीस कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे .अगदी माळवदावर खेळणाऱ्या किंवा वावरणाऱ्या नागरिकांना या लाईनचा मोठा त्रास होत असून महिलांनी आम्हाला माळवदावर कपडे वाळू घालणे, धान्य वाळवणे, पापड, कुरडया करण्यासाठी मोठा त्रास होत आहे, असे सांगितले. सदरील लाईन तात्काळ काढून घ्यावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून नागरिक महावितरण कार्यालयात खेटे घालत आहेत. मात्र कार्यालयाकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने बुधवारी गौरी येथील नागरिकांनी कार्यकारी अभियंता ढाकणे यांची भेट घेऊन निलंगा येथील कार्यालयात त्यांना घेराव घातला. यावेळी गोपाळ भोजने, बबलू भोजने, शत्रुघ्न खंदाडे, बालाजी घोडके, पांडुरंग गारकर, आनंत पवार, राम सूर्यवंशी, लहू सूर्यवंशी, प्रकाश पांचाळ, विठ्ठल पांचाळ, हबीब शेख, रानबा नोरखडे, शेषराव चव्हाण रतन कदम, अनंत घारोळ, रमेश कदम, नायक सावंत, ज्ञानोबा गायकवाड, नामदेव भोजने, विठ्ठल शिंदे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरिष्ठांना अहवाल देणार- अभियंता ढाकणे

यावेळी कार्यकारी अभियंता ढाकणे म्हणाले की, सदरील बाबीची आम्ही वरिष्ठांना लेखी स्वरूपात अहवाल सादर करून देऊ व लवकरात लवकर ग्रामस्थांची ही समस्या सोडवू असे म्हणाले. आज पर्यंत कोणताही धोका किंवा अपघात झाला नाही .मात्र यात काही नुकसान झाले किंबहुना एखाद्याचा जीव गेल्यानंतरच याची सोय करणार आहात काय असा सवाल यावेळी गोपाळ भोजणे यांनी महावितरण प्रशासनास केला.