शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

माळरानावर बहरले उन्हाळी भुईमूग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST

निटूर : ७/१२ वर दोन्ही भावंडांच्या नावे एकूण ७ एकर जमीन असली तरी ती माळरान असल्याने तिथे कुठलेही पीक ...

निटूर : ७/१२ वर दोन्ही भावंडांच्या नावे एकूण ७ एकर जमीन असली तरी ती माळरान असल्याने तिथे कुठलेही पीक घेता येत नव्हते. त्यामुळे ती पडीकच होती. दरम्यान, या भावंडांनी ती कसण्यासाठी प्रयत्न सुरू केले. माळरानावर माती टाकली तसेच बोअरही घेतला. त्यास पाणी लागल्याने त्यांनी उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले आहे. सध्या हे पीक बहरले आहे.

निलंगा तालुक्यातील निटूर येथील शेतकरी ज्ञानोबा ढोबळे यांच्या नावावर ४ एकर, तर त्यांचे चुलत भाऊ शिवाजी ढोबळे यांच्या नावावर तीन एकर अशी वडिलोपार्जित शेती आहे. त्याची ७/१२ वर ही नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात ही शेती माळरान असल्याने तिथे काहीही पिकत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह अन्य कामांवर अवलंबून आहे. या दोन्ही चुलत भावंडांचे शिक्षणही कमीच आहे. मात्र, त्यांनी वडिलोपार्जित शेती फुलविण्याचा निर्धार केला.

या दोघांनी सुरुवातीस नजीकच्या तलावातून काळी माती आणून ती माळरानावर टाकली. त्यामुळे माळरान सुपीक होण्यास मदत झाली. त्यानंतर त्यांनी जमिनीची मशागत करून पाण्यासाठी बोअर घेतला. सुदैवाने त्यास पाणीही लागले. त्याच्या आधारावर त्यांनी उन्हाळी भुईमूग आणि उडदाची पेरणी केली. सध्या ही दोन्ही पिके जोमात आली असून बहरली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातही माळरान हिरवागार दिसत आहे. यातून चांगले उत्पादन मिळण्याची या शेतकऱ्यांना आशा आहे. ते वर्षभरातून तीन पिके घेतात. भाजीपाल्याचेही उत्पादन घेतात. आंबा, चिंच, कडीपत्ता, लिंबूच्या झाडांचीही लागवड केली आहे.

प्रयत्न करणे आवश्यक...

शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो; परंतु नियोजनपूर्वक शेती केल्यास ती निश्चित फायदेशीर ठरते. एखाद्या वर्षी अपेक्षित उत्पादन मिळत नाही; परंतु त्याची कसर दुसऱ्या वर्षी निघू शकते. त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करावी, असे शेतकरी ज्ञानोबा ढोबळे, शिवाजी ढोबळे यांनी सांगितले.