शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

उदगीरच्या फळबाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST

उदगीर : येथील फळबाजारात वाढत्या उन्हामुळे पाणीदार फळांची आवक माेठ्या प्रमाणावर होत आहे. शरिरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाटी नागरिक ...

उदगीर : येथील फळबाजारात वाढत्या उन्हामुळे पाणीदार फळांची आवक माेठ्या प्रमाणावर होत आहे. शरिरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाटी नागरिक खरबूज, कलिंगड, द्राक्षे, मोसंबी, संत्रा, अननस या फळांना प्राधान्य देत आहत. या फळांच्या सेवनाने नागरिक शरिरात असलेली उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

उदगीर शहरातील भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालयासमोर भरणारा बाजार, छत्रपती शाहू महाराज चौक, कॅप्टन चौक, बसस्थानक, उमा चौक येथील व्यापारी आणि इतर फेरीवाले केवळ कलिंगड, खरबूज, चिकू, द्राक्षे, काकडी याचा व्यवसाय करु लागले आहेत. उदगीरात मार्च, एप्रिल, मे महिन्यात कडक उन्हाचे चटके बसतात. या कडक उन्हाळी वातावरणात शरिरातील पाणीदेखील कमी होऊ लागते. यावर उपाय म्हणून पाणीदार फळांचे सेवन करण्यात येते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीदार फळांची आवक होत आहे. १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंतचे खरबूज बाजारात आले आहे. कलिंगड १० रुपयांपासून ते १००, द्राक्षाची ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे व्यापारी हामेद चौधरी यांनी सांगितले. तसेच मोसंबी, संत्र्याची आवकही चांगली असल्याची माहिती त्यांनी दिली. उदगीर तहसील कार्यालयासमोर शेतकरी स्वतःच्या वाहनातून कलिंगड, खरबूज आणून त्याची विक्री करत आहेत.

उदगीर तालुक्यातील तोंडार, हैबतपूर गावातून शेतकरी त्यांचा माल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. उदगीर शहरातील बसस्थानक, देगलूर रोड, शिवाजी चौक, उमा चौक, बिदर रोड आदी मार्गांवर खरबूज, कलिंगड, द्राक्षे, मोसंबी, संत्रे आणि अननस विक्रीसाठी हातगाडे लागले आहेत. फळ विक्रेत्यांकडून पाणीदार फळांची ग्राहक खरेदी करत आहेत. उन्हातून आल्यानंतर पालकही आपल्या मुलांना चविष्ट पाणीदार फळे खाण्यास देत आहेत. त्यामध्ये अननस, खरबूज, कलिंगड, मोसंबी, संत्रे आदी फळे लहान मुलांना दिली जात आहेत.

ज्यूस सेंटर, आईस्क्रीम गाड्यांवर गर्दी...

उदगीर शहरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, ज्यूस सेंटर आणि आईस्क्रीमच्या गाड्यांवर ग्राहकांची गर्दी हाेत आहे. गरिबांचा फ्रिज असलेल्या माठाचे महत्त्वही आता वाढले आहे. उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्यामुळे शरिरातील उष्णता कमी होण्याला मदत होते. शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानासमोर आणि पोलीस ठाणे, संत गाडगेबाबा चौक येथे माठ विक्रीसाठी दुकाने लागली आहेत. ५० ते १५० रुपयांपर्यंत माठ उपलब्ध आहेत. फ्रिजमधील पाणी थंड करुन पिण्यापेक्षा माठातील पाणी पिणे अधिक चांगले असल्याचे नागरिकांचे मत आहे. आता माठाला प्लास्टिकचे नळ बसविण्यात आले आहेत.