शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राहत्या घरात गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: March 14, 2017 14:57 IST

लातूर तालुक्यातील मुरुड येथे शंकरनगर परिसरात राहणा-या इयत्ता बारावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 14 - लातूर तालुक्यातील मुरुड येथे शंकरनगर परिसरात राहणा-या इयत्ता बारावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले.  या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
विजय माळी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.  मंगळवारी त्याने शंकरनगर भागातील नवीन बांधकाम झालेल्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही. परीक्षेच्या तणावातून त्यानं आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  
 
दोन दिवसांपासून विजय अस्वस्थ
विजय हा गेल्या दोन-तीन दिवसांपासून तणावाखाली असल्यामुळे तो अस्वस्थ होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.  घरीही फारसे कोणाशी बोलत नव्हता. शिवाय त्याचा इयत्ता बारावीचा मंगळवारी शेवटचा पेपर होता. त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. यातून त्याच्यावर बारावीचे पेपर अवघड गेले असावेत, असेही कुटुंबीयांनी सांगितले.
 
पंधरा दिवसात दुसरी घटना
गेल्या २८ फेब्रुवारी रोजी राहत्या खोलीवर इयत्ता ११ वीत असलेली अनुसरी झींजे या मुलीनेही गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पंधरा दिवसातील विद्यार्थी आत्महत्येची ही दुसरी घटना आहे.