शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

राहत्या घरात गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: March 14, 2017 14:57 IST

लातूर तालुक्यातील मुरुड येथे शंकरनगर परिसरात राहणा-या इयत्ता बारावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 14 - लातूर तालुक्यातील मुरुड येथे शंकरनगर परिसरात राहणा-या इयत्ता बारावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले.  या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
विजय माळी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.  मंगळवारी त्याने शंकरनगर भागातील नवीन बांधकाम झालेल्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही. परीक्षेच्या तणावातून त्यानं आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  
 
दोन दिवसांपासून विजय अस्वस्थ
विजय हा गेल्या दोन-तीन दिवसांपासून तणावाखाली असल्यामुळे तो अस्वस्थ होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.  घरीही फारसे कोणाशी बोलत नव्हता. शिवाय त्याचा इयत्ता बारावीचा मंगळवारी शेवटचा पेपर होता. त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. यातून त्याच्यावर बारावीचे पेपर अवघड गेले असावेत, असेही कुटुंबीयांनी सांगितले.
 
पंधरा दिवसात दुसरी घटना
गेल्या २८ फेब्रुवारी रोजी राहत्या खोलीवर इयत्ता ११ वीत असलेली अनुसरी झींजे या मुलीनेही गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पंधरा दिवसातील विद्यार्थी आत्महत्येची ही दुसरी घटना आहे.