शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; शिष्यवृत्तीतील शैक्षणिक शुल्क महाविद्यालयांत त्वरित करा जमा

By हणमंत गायकवाड | Updated: January 8, 2024 13:15 IST

समाजकल्याणचे आवाहन; शैक्षणिक शुल्काची रक्कम सात दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक

लातूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतील केंद्र शासनाच्या हिश्श्यातील ६० टक्के रक्कम महाडीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. यातील शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क व इतर नापरतावा विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांच्या खात्यात सात दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांवर राहणार आहे.

सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू आहे. या योजनेंतर्गत १७ मार्च २०२२ व ७ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या हिश्श्याची ६० टक्के रक्कम महाडीबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क व इतर नापरतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयांना सात दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. सन २०२१-२२ व २०२२-२३ वर्षांतील केंद्र शासनाची ६० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमाही झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली त्यांनी शैक्षणिक शुल्काची रक्कम महाविद्यालयांत जमा करावी, असे निर्देश समाजकल्याणने दिले आहेत.

६० केंद्र, तर ४० टक्के राज्य शासनाकडूनसामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू आहे. यातील ६० टक्के रक्कम केंद्र शासनाकडून, तर ४० टक्के रक्कम राज्य शासनाकडून मिळते. केंद्राची ६० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न खात्यावर जमा होते, तर राज्याकडून मिळणारी ४० टक्के रक्कम महाविद्यालयांच्या खात्यावर जमा होते. एकत्र महाविद्यालय किंवा विद्यार्थ्यांच्या खात्यावर ती जमा होत नसल्याने हा घोळ झाला आहे.

सात दिवसांच्या आत जमा करणे नियमविद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेपैकी महाविद्यालयास अनुज्ञेय असलेल्या फीची रक्कम तत्काळ महाविद्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. त्यासाठी सात दिवसांचा अवधी आहे. विद्यार्थ्यांनी ६० टक्के रक्कम जमा झाली असेल तर महाविद्यालयास अनुज्ञेय असलेली फी त्यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन समाजकल्याणचे सहायक आयुक्त एस.एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

टॅग्स :laturलातूरScholarshipशिष्यवृत्तीEducation Sectorशिक्षण क्षेत्र