शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

विद्यार्थ्यांनो... करार सेवा करा अथवा १० लाख रुपये भरून सवलत घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:19 IST

लातूर : यंदा उत्तीर्ण होणाऱ्या मेडिकल विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाँड सेवा (करार सेवा) सक्तीची करण्यात आली आहे. ही सेवा ...

लातूर : यंदा उत्तीर्ण होणाऱ्या मेडिकल विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाँड सेवा (करार सेवा) सक्तीची करण्यात आली आहे. ही सेवा करायची नसेल तर १० लाख रुपये भरून सवलत घेता येणार आहे. या सेवेसाठी २१ एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता ही बाँड सेवा करावी लागणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात दोन वर्ष सेवा करणे बंधनकारक आहे. हा निर्णय आधीपासूनच आहे. मात्र काही विद्यार्थी पैसे भरून त्यातून सवलत घेत असत. यंदा मात्र कोरोना पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सेवा बंधनकारक राहील, असे स्पष्ट केले.

कोरोना काळात वैद्यकीय सेवा वेळोवेळी मिळत नसल्याचा अनुभव अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना आला. काही ठिकाणी सुविधा आहेत, मात्र वैद्यकीय अधिकारी नाहीत. तर काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहेत, मात्र कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाने आता हातपाय पसरले आहेत. अशा स्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरांकडे धाव घेतली जात आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने यंदा एमबीबीएस उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीणमध्ये सेवा देणे बंधनकारक केले आहे.

nकोरोना बाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवर याचा भार पडत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्णांची संख्या अलिकडे झपाट्याने वाढली आहे. मात्र ग्रामीण भागात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी, यंत्रणा उपलब्ध नाही. यातूनच ग्रामीण भागातील रुग्ण शहराकडे उपचारासाठी येत आहेत.

nही परिस्थिती पाहता वैद्यकीय क्षेत्रातील काही विद्यार्थी ग्रामीण भागात जाऊन सेवा करण्याची तयारी दर्शवीत आहेत. कोरोनासारख्या महामारीच्या काळात सेवा करण्याची हीच खरी वेळ असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. ग्रामीण आणि शहरी असा सेवेबाबत दुजाभाव करता येणार नाही, असे काही विद्यार्थी म्हणाले.nकोरोना बाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवर याचा भार पडत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्णांची संख्या अलिकडे झपाट्याने वाढली आहे. मात्र ग्रामीण भागात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी, यंत्रणा उपलब्ध नाही. यातूनच ग्रामीण भागातील रुग्ण शहराकडे उपचारासाठी येत आहेत.