शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

मुख्य चौकातील सिग्नल सुरू करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST

रिंग रोड परिसरात रस्त्यावर कचरा लातूर : एमआयडीसी परिसरातील ५ नंबर चौक ते पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या समांतर रस्त्याच्या कडेला ...

रिंग रोड परिसरात रस्त्यावर कचरा

लातूर : एमआयडीसी परिसरातील ५ नंबर चौक ते पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या समांतर रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या वतीने नियमित कचरा उचलला जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. अनेक वसाहतींमधील लोकही रस्त्यावर कचरा आणून टाकत आहेत, तसेच मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

उड्डाणपुलावरील केबल काढण्याची मागणी

लातूर : शहरातील मुख्य चौकातील उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पुलावरून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. पथदिव्यांच्या पोललाही केबल गुंडाळलेले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. सदरील केबल काढण्याची मागणी होत आहे.

पोलीस प्रशासनाकडून कारवाई मोहीम

लातूर : शहरातील विविध चौकांत पोलीस प्रशासनाच्या वतीने कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर विरोधात धडक मोहीम राबविली जात आहे. गंजगोलाई, महात्मा गांधी चौक, रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, बार्शी रोड, राजीव गांधी चौक, औसा रोड आदी भागांत स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत, तसेच नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवरही दंडात्मक करवाई केली जात असल्याचे शहर वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.

बस स्थानक परिसरात सुविधांचा अभाव

लातूर : मध्यवर्ती बस स्थानक, तसेच रेणापूर नाका परिसरातील बस स्थानक परिसरात सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचाही अभाव या ठिकाणी दिसून येत आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याचे बस स्थानकातील चित्र आहे. याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

आजपासून आरटीई ऑनलाइन अर्ज

लातूर : आरटीई प्रवेशासाठी बुधवारपासून ऑनलाइन अर्ज सुरू होत आहेत. २१ मार्च अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून, जिल्ह्यात २३८ शाळांमधील १,७४० जागांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. २१ मार्चनंतर राज्यस्तरावर एकच सोडत काढली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय सेतू केंद्रावर पालकांची गर्दी दिसून येत आहे.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रीनिंग

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत जिल्ह्यातील ५ वी ते १२वीचे वर्ग सुरू झाले आहेत. शाळांच्या वतीने खबरदारी म्हणून शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे, तसेच एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जात असून, मास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात आहे.