शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

मुख्य चौकातील सिग्नल सुरू करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST

रिंग रोड परिसरात रस्त्यावर कचरा लातूर : एमआयडीसी परिसरातील ५ नंबर चौक ते पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या समांतर रस्त्याच्या कडेला ...

रिंग रोड परिसरात रस्त्यावर कचरा

लातूर : एमआयडीसी परिसरातील ५ नंबर चौक ते पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या समांतर रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या वतीने नियमित कचरा उचलला जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. अनेक वसाहतींमधील लोकही रस्त्यावर कचरा आणून टाकत आहेत, तसेच मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

उड्डाणपुलावरील केबल काढण्याची मागणी

लातूर : शहरातील मुख्य चौकातील उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पुलावरून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. पथदिव्यांच्या पोललाही केबल गुंडाळलेले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. सदरील केबल काढण्याची मागणी होत आहे.

पोलीस प्रशासनाकडून कारवाई मोहीम

लातूर : शहरातील विविध चौकांत पोलीस प्रशासनाच्या वतीने कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर विरोधात धडक मोहीम राबविली जात आहे. गंजगोलाई, महात्मा गांधी चौक, रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, बार्शी रोड, राजीव गांधी चौक, औसा रोड आदी भागांत स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत, तसेच नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवरही दंडात्मक करवाई केली जात असल्याचे शहर वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.

बस स्थानक परिसरात सुविधांचा अभाव

लातूर : मध्यवर्ती बस स्थानक, तसेच रेणापूर नाका परिसरातील बस स्थानक परिसरात सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचाही अभाव या ठिकाणी दिसून येत आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याचे बस स्थानकातील चित्र आहे. याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

आजपासून आरटीई ऑनलाइन अर्ज

लातूर : आरटीई प्रवेशासाठी बुधवारपासून ऑनलाइन अर्ज सुरू होत आहेत. २१ मार्च अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून, जिल्ह्यात २३८ शाळांमधील १,७४० जागांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. २१ मार्चनंतर राज्यस्तरावर एकच सोडत काढली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय सेतू केंद्रावर पालकांची गर्दी दिसून येत आहे.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रीनिंग

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत जिल्ह्यातील ५ वी ते १२वीचे वर्ग सुरू झाले आहेत. शाळांच्या वतीने खबरदारी म्हणून शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे, तसेच एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जात असून, मास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात आहे.