शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

शहरी भागात जाणाऱ्या एसटी सुसाट; मुक्कामी बसेस कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

ग्रामीण भागात ५० टक्के बसेस सुरू.. रक्षाबंधननिमित्त राज्य परिवहन महामंंडळाच्यावतीने ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या; मात्र आता ...

ग्रामीण भागात ५० टक्के बसेस सुरू..

रक्षाबंधननिमित्त राज्य परिवहन महामंंडळाच्यावतीने ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या; मात्र आता प्रतिसाद कमी झाला आहे, त्यातच पावसाळा सुरू असल्याने रस्त्याच्या समस्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील केवळ ५० टक्केच बसेस सुरू आहेत. प्रतिसाद वाढल्यानंतर बसेस सुरू करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे.

शहरी भागात जाणाऱ्या बसेस फुल्ल...

लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर, लातूर या पाचही आगारातून शहरासाठी बसेस सोडण्यात येत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असल्याने या बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तर ग्रामीण भागात प्रतिसाद नसल्याने काही फेऱ्या बंदच आहेत. लांब पल्ल्यांच्या बसेसमधून चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

मुक्कामी बस येत नसल्याने गैरसोय...

कॉलेजला जायला मुक्कामी बस फायदेशीर ठरायची; मात्र कोरोनाच्या प्रारंभापासून फेऱ्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. परिवहन महामंडळाने मुक्कामी बसेस सुरू केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल. - तुकाराम गंपले

पूर्वी शहराला जाण्यासाठी एसटी बसचा आधार होता. काही दिवसांपासून मुक्कामी गाडी बंद झाल्याने खासगी वाहनाने शहर गाठावे लागत आहे. ग्रामीण भागातील बसेस तर मुक्कामी गाडी सुरू केल्या. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांची सोय होईल. उद्धव काळदाते

मुक्कामी गाड्या धावतात इतर मार्गावर...

लातूर जिल्ह्यातील पाचही आगारातून जवळपास ११० हून अधिक बसेस मुक्कामी जात; मात्र कोरोनामुळे मुक्कामी बसेस बंद होत्या. आता ५० टक्के बसेस ग्रामीण भागात धावत आहेत.

प्रतिसादानुसार नियोजन...

मध्यंतरी रक्षाबंधननिमित्त बसेसच्या ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास ग्रामीण भागातील फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. डिझेलचा खर्च वाढल्याने प्रतिसाद गरजेचा आहे. - सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक