शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळताे, ना वैद्यकीय बिले मिळतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारात २ हजार ९०० हजार अधिकारी, कर्मचारीसंख्या आहे. या कर्मचाऱ्यांना महिन्याला ...

लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारात २ हजार ९०० हजार अधिकारी, कर्मचारीसंख्या आहे. या कर्मचाऱ्यांना महिन्याला जवळपास ५ काेटी रुपये वेतनासाठी लागतात. गत दीड वर्षात अनेकदा दाेन ते तीन महिने वेतन थकल्याचा अनुभव कर्मचाऱ्यांच्या पदरी आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीवर कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात आले आहे. गत महिन्यातही ५०० काेटी राज्य शासनाचे मिळाल्यानंतर जुलै महिन्याचे वेतन महमंडळाला करता आले. सध्याची परिस्थिती हलाखीची, दयनीय आहे.

वैद्यकीय बिले रखडल्याची तक्रार...

महामंडळात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले गत अनेक महिन्यांपासून रखडली आहेत. अद्यापही त्यांच्या पदरी ही बिले पडली नाहीत. आराेग्यासाठी करण्यात आलेला खर्च आणि त्यासाठी घेण्यात आलेले कर्ज, हातउसने पैशांची कशी परतफेड करायची, हा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना सतावत आहे.

फंड नसल्याने निर्माण झाली अडचण...

महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले थकली आहेत, हे वास्तव आहे. मात्र, त्यासाठी असलेला फंड आपल्याकडे सध्याला उपलब्ध नाही. सध्या आर्थिक अडचण आहे. सध्याच्या उत्पन्नात लालपरी प्रवाशांच्या सेवेत धावत आहे. जून २०२० मध्ये डिझेल प्रतिलिटर ५६ रुपये हाेते, तर सप्टेंबर २०२१ मध्ये डिझेल ९५ रुपयांच्या घरात आहे. डिझेलचा दर दुप्पट झाला आहे. अशा स्थितीत महामंडळाचा कारभार चालविणे माेठी कसरत आहे.

- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, लातूर.

दाेन महिन्यांनंतर हाेताेय पगार...

काेराेनाकाळात महामंडळाची लालपरी अनेक दिवस जाग्यावरच थांबून हाेती. टप्प्याटप्प्याने प्रवासीसेवा सुरू झाली. मात्र, आर्थिक उत्पन्नाची घडी अद्यापही विस्कटलेलीच आहे.

अशा स्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, गत दीड महिन्यात अनेकदा वेतन थकले असून, दाेन-तीन महिन्यांनंतर वेतन झाले.

अनेकांना घर चालविणेही अवघड झाले आहे. आराेग्य, शिक्षणावर तर पैसा काेठून खर्च करणार ही चिंता अनेकांच्या चेहऱ्यावर कायम आहे.

उपचारावर झालेला खर्च काेठून आणायचा...

काेराेनाकाळात घरात आई-वडील आणि मुलगा आजारी हाेता. त्यांच्या उपचारासाठी मला पाहुण्यांकडून, मित्रांकडून हातउसने पैसे घ्यावे लागले आहे. आता त्या पैशाची परतफेड मी वेळेवर करू शकत नाही. परिणामी, पत गेली आहे. उपचारावर झालेला खर्च काेठून आणायचा हा प्रश्न मला सतत सतावत आहे. - एक कर्मचारी.

काेराेनाकाळात पत्नीला काेराेनाची बाधा झाली. त्यासाठी तिच्यावर जवळपास दीड ते दाेन लाखांचा खर्च झाला. हा उपचार कर्ज काढून केला आहे. शिवाय, सध्याला हाती वेळेवर पगारही नाही. अशा स्थितीत कुटुंबातील आई-वडील, मुला-बाळांच्या उपचारावर काेठून पैसा खर्च करायचा, हीच चिंता आजही मला सतावत आहे. - एक कर्मचारी.