शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला; चक्री भुंगा, उंट, लष्करी अळीने वाढविली चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

जिल्ह्यातील शेतकरी मूग, उडिद, तूर, ज्वारी याबरोबरच सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करतात. मात्र, गतवर्षी सोयाबीनला ५ हजार रुपयांचा दर मिळाला. ...

जिल्ह्यातील शेतकरी मूग, उडिद, तूर, ज्वारी याबरोबरच सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करतात. मात्र, गतवर्षी सोयाबीनला ५ हजार रुपयांचा दर मिळाला. मागील तीन महिन्यांपूर्वी तर १० हजार रुपये दर मिळाला. त्यामुळे अनेकांनी सोयाबीन लागवडीवर भर दिला. जिल्ह्यात ४ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आहे. ऑगस्ट महिन्यात बहुतांश भागात पावसाने दडी मारल्याने पिके संकटात आली होती. पैसा, गोगलगाईने हल्ला चढविला होता. कृषी विभागाने जनजागृती केल्यानंतर शेतकऱ्यांनी उपाययोजना राबविल्या. त्यामुळे पिके तरली. पिके शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना आता चक्री भुंगा, उंट अळी, मिली बग, लष्करी अळी किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यातच काही मंडलात अतिवृष्टी झाल्याने पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने फवारणी करणे शेतकऱ्यांना जिकीरीचे ठरत आहे.

सोयाबीनचा पेरा हेक्टरमध्ये

२०१७ ३००० ३,१०,०००

२०१८ ३५०० ३,४०,५००

२०१९ ४००० ३,९५,०००

२०२० ५००० ते १०००० ४,१७,०००

२०२१ ४, २७,०००

काय आहे मिली बग?

ढेकणाप्रमाणे दिसणारी मिली बग कीड ही द्राक्षे, मूग, उडीद, तूर, सोयाबीन व इतर पिकांवर आढळून येते. ही कीड रस शोषून घेणारी आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. लातूर जिल्ह्यात सद्य:स्थितीत मिली बगचा प्रादुर्भाव नसल्याचे चित्र आहे.

पाऊस, रोगराईमुळे उत्पादनात हाेणार घट...

खरिपाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी केली. मात्र, मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने पिके कोमेजू लागली होती. आता पावसाने हजेरी लावली असली तरी अनेकांच्या पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पेरणीवर केलेला पैसा निघतो का नाही?

खरिपाची पेरणी वेळेवर केली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन करपून गेले. आता उरलेले सोयाबीन पावसामुळे जाण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे पेरणीवर केलेला पैसा निघतो की नाही, याची चिंता लागली आहे.

- विष्णू जाधव

सोयाबीन पीक जोमात होते. मात्र, पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. आता पिकांवर केलेला खर्चही निघतो की नाही याची चिंता लागली आहे. शासनाने मदत करावी.

- गजानन साळुंके

फवारणी आवश्यक...

सध्या सोयाबीनला शेंगा लागत आहेत. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करणे गरजेचे झाले आहे. सद्य:स्थितीत लष्करी अळीचा काही भागांत प्रादुर्भाव दिसून येत आहे.