शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला; चक्री भुंगा, उंट, लष्करी अळीने वाढविली चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

जिल्ह्यातील शेतकरी मूग, उडिद, तूर, ज्वारी याबरोबरच सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करतात. मात्र, गतवर्षी सोयाबीनला ५ हजार रुपयांचा दर मिळाला. ...

जिल्ह्यातील शेतकरी मूग, उडिद, तूर, ज्वारी याबरोबरच सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करतात. मात्र, गतवर्षी सोयाबीनला ५ हजार रुपयांचा दर मिळाला. मागील तीन महिन्यांपूर्वी तर १० हजार रुपये दर मिळाला. त्यामुळे अनेकांनी सोयाबीन लागवडीवर भर दिला. जिल्ह्यात ४ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आहे. ऑगस्ट महिन्यात बहुतांश भागात पावसाने दडी मारल्याने पिके संकटात आली होती. पैसा, गोगलगाईने हल्ला चढविला होता. कृषी विभागाने जनजागृती केल्यानंतर शेतकऱ्यांनी उपाययोजना राबविल्या. त्यामुळे पिके तरली. पिके शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना आता चक्री भुंगा, उंट अळी, मिली बग, लष्करी अळी किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यातच काही मंडलात अतिवृष्टी झाल्याने पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने फवारणी करणे शेतकऱ्यांना जिकीरीचे ठरत आहे.

सोयाबीनचा पेरा हेक्टरमध्ये

२०१७ ३००० ३,१०,०००

२०१८ ३५०० ३,४०,५००

२०१९ ४००० ३,९५,०००

२०२० ५००० ते १०००० ४,१७,०००

२०२१ ४, २७,०००

काय आहे मिली बग?

ढेकणाप्रमाणे दिसणारी मिली बग कीड ही द्राक्षे, मूग, उडीद, तूर, सोयाबीन व इतर पिकांवर आढळून येते. ही कीड रस शोषून घेणारी आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. लातूर जिल्ह्यात सद्य:स्थितीत मिली बगचा प्रादुर्भाव नसल्याचे चित्र आहे.

पाऊस, रोगराईमुळे उत्पादनात हाेणार घट...

खरिपाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी केली. मात्र, मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने पिके कोमेजू लागली होती. आता पावसाने हजेरी लावली असली तरी अनेकांच्या पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पेरणीवर केलेला पैसा निघतो का नाही?

खरिपाची पेरणी वेळेवर केली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन करपून गेले. आता उरलेले सोयाबीन पावसामुळे जाण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे पेरणीवर केलेला पैसा निघतो की नाही, याची चिंता लागली आहे.

- विष्णू जाधव

सोयाबीन पीक जोमात होते. मात्र, पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. आता पिकांवर केलेला खर्चही निघतो की नाही याची चिंता लागली आहे. शासनाने मदत करावी.

- गजानन साळुंके

फवारणी आवश्यक...

सध्या सोयाबीनला शेंगा लागत आहेत. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करणे गरजेचे झाले आहे. सद्य:स्थितीत लष्करी अळीचा काही भागांत प्रादुर्भाव दिसून येत आहे.