शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

डीओसीच्या आयातीमुळे सोयाबीनचे दर कोसळले- भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

लातूर : आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये सोयाबीनचा दर १० हजार २१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा ...

लातूर : आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये सोयाबीनचा दर १० हजार २१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या; मात्र, प्रत्यक्षात सोयाबीनच्या राशीस सुरुवात होऊन शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येण्यास सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या सोयाबीन डीओसीच्या आयातीच्या धोरणांमुळे राज्यातील बाजारपेठेतील दरात अडीच हजारांपेक्षा अधिक रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

देशात गेल्यावर्षीपर्यंत सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन मध्यप्रदेशात घेतले जात होते; मात्र यंदा सोयाबीनला हमीभावापेक्षा अडीचपट अधिक दर मिळाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पेरा वाढला आणि राज्यातील प्रमुख पीक बनले. सुरुवातीस निसर्गानेही साथ दिल्याने भरघोस उत्पादन होईल आणि भावही चांगला मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. गेल्या तीन आठवड्यांपासून सोयाबीनच्या राशींना सुरुवात झाली असून, शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत; परंतु राज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी असलेल्या लातूरसह अन्य बाजारपेठांत दर गडगडले आहेत. शुक्रवारी कमाल भाव ७ हजार ६५१, किमान ५ हजार ८७१ तर सर्वसाधारण दर ७ हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. सध्या लातूरच्या बाजारपेठेत १० हजार ६५० क्विंटलपर्यंत आवक होत असून, आगामी काळात ती वाढणार आहे. त्यामुळे आणखीन दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

चुकीच्यावेळी डीओसी आयात...

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येऊन जानेवारी- फेब्रुवारीत जवळपास २५ ते २८ टक्के डीओसी निर्यात करण्यात आली. त्याचा परिणाम देशात होऊन काही महिन्यांतच तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. पोल्ट्री व्यावसायिकांच्या काळजीपोटी केंद्र सरकारने १५ लाख टन जीएम सोयाबीन आयातीचे धोरण स्वीकारले आणि आयातीची वेळ चुकली. दरम्यान, याच कालावधीत देशातील सोयाबीन बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली. विदेशातून येणाऱ्या सोयाबीनला ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव असल्याने स्थानिक बाजारपेठांत सोयाबीनचे दर गडगडले आहेत, असे सोयाबीन खरेदी- विक्री करणाऱ्या तज्ज्ञ व्यापाऱ्यांनी सांगितले.

वर्ष कसे काढावे, ही चिंता...

मला १० एकर शेती असून, ७ बॅग सोयाबीनची पेरणी केली होती. मध्यंतरी पावसाचा खंड आणि त्यानंतर सततच्या पावसामुळे उतारा ५० टक्क्यांनी घटला. अशा परिस्थितीत चांगल्या दरामुळे काही तरी पदरी पडेल, अशी आशा होती; परंतु दर कोसळल्याने संकट निर्माण झाले आहे. वर्ष कसे काढावे, अशी चिंता लागली आहे.

- मधुकर बिरादार, शेतकरी, तगरखेडा.