शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
3
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
5
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
6
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
7
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
8
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
9
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
10
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
11
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
12
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
13
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
14
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
15
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
16
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
17
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
18
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
19
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
20
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

डीओसीच्या आयातीमुळे सोयाबीनचे दर कोसळले- भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

लातूर : आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये सोयाबीनचा दर १० हजार २१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा ...

लातूर : आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये सोयाबीनचा दर १० हजार २१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या; मात्र, प्रत्यक्षात सोयाबीनच्या राशीस सुरुवात होऊन शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येण्यास सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या सोयाबीन डीओसीच्या आयातीच्या धोरणांमुळे राज्यातील बाजारपेठेतील दरात अडीच हजारांपेक्षा अधिक रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

देशात गेल्यावर्षीपर्यंत सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन मध्यप्रदेशात घेतले जात होते; मात्र यंदा सोयाबीनला हमीभावापेक्षा अडीचपट अधिक दर मिळाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पेरा वाढला आणि राज्यातील प्रमुख पीक बनले. सुरुवातीस निसर्गानेही साथ दिल्याने भरघोस उत्पादन होईल आणि भावही चांगला मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. गेल्या तीन आठवड्यांपासून सोयाबीनच्या राशींना सुरुवात झाली असून, शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत; परंतु राज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी असलेल्या लातूरसह अन्य बाजारपेठांत दर गडगडले आहेत. शुक्रवारी कमाल भाव ७ हजार ६५१, किमान ५ हजार ८७१ तर सर्वसाधारण दर ७ हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. सध्या लातूरच्या बाजारपेठेत १० हजार ६५० क्विंटलपर्यंत आवक होत असून, आगामी काळात ती वाढणार आहे. त्यामुळे आणखीन दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

चुकीच्यावेळी डीओसी आयात...

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येऊन जानेवारी- फेब्रुवारीत जवळपास २५ ते २८ टक्के डीओसी निर्यात करण्यात आली. त्याचा परिणाम देशात होऊन काही महिन्यांतच तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. पोल्ट्री व्यावसायिकांच्या काळजीपोटी केंद्र सरकारने १५ लाख टन जीएम सोयाबीन आयातीचे धोरण स्वीकारले आणि आयातीची वेळ चुकली. दरम्यान, याच कालावधीत देशातील सोयाबीन बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली. विदेशातून येणाऱ्या सोयाबीनला ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव असल्याने स्थानिक बाजारपेठांत सोयाबीनचे दर गडगडले आहेत, असे सोयाबीन खरेदी- विक्री करणाऱ्या तज्ज्ञ व्यापाऱ्यांनी सांगितले.

वर्ष कसे काढावे, ही चिंता...

मला १० एकर शेती असून, ७ बॅग सोयाबीनची पेरणी केली होती. मध्यंतरी पावसाचा खंड आणि त्यानंतर सततच्या पावसामुळे उतारा ५० टक्क्यांनी घटला. अशा परिस्थितीत चांगल्या दरामुळे काही तरी पदरी पडेल, अशी आशा होती; परंतु दर कोसळल्याने संकट निर्माण झाले आहे. वर्ष कसे काढावे, अशी चिंता लागली आहे.

- मधुकर बिरादार, शेतकरी, तगरखेडा.