शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

डीओसीच्या आयातीमुळे सोयाबीनचे दर कोसळले- भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

लातूर : आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये सोयाबीनचा दर १० हजार २१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा ...

लातूर : आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये सोयाबीनचा दर १० हजार २१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या; मात्र, प्रत्यक्षात सोयाबीनच्या राशीस सुरुवात होऊन शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येण्यास सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या सोयाबीन डीओसीच्या आयातीच्या धोरणांमुळे राज्यातील बाजारपेठेतील दरात अडीच हजारांपेक्षा अधिक रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

देशात गेल्यावर्षीपर्यंत सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन मध्यप्रदेशात घेतले जात होते; मात्र यंदा सोयाबीनला हमीभावापेक्षा अडीचपट अधिक दर मिळाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पेरा वाढला आणि राज्यातील प्रमुख पीक बनले. सुरुवातीस निसर्गानेही साथ दिल्याने भरघोस उत्पादन होईल आणि भावही चांगला मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. गेल्या तीन आठवड्यांपासून सोयाबीनच्या राशींना सुरुवात झाली असून, शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत; परंतु राज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी असलेल्या लातूरसह अन्य बाजारपेठांत दर गडगडले आहेत. शुक्रवारी कमाल भाव ७ हजार ६५१, किमान ५ हजार ८७१ तर सर्वसाधारण दर ७ हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. सध्या लातूरच्या बाजारपेठेत १० हजार ६५० क्विंटलपर्यंत आवक होत असून, आगामी काळात ती वाढणार आहे. त्यामुळे आणखीन दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

चुकीच्यावेळी डीओसी आयात...

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येऊन जानेवारी- फेब्रुवारीत जवळपास २५ ते २८ टक्के डीओसी निर्यात करण्यात आली. त्याचा परिणाम देशात होऊन काही महिन्यांतच तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. पोल्ट्री व्यावसायिकांच्या काळजीपोटी केंद्र सरकारने १५ लाख टन जीएम सोयाबीन आयातीचे धोरण स्वीकारले आणि आयातीची वेळ चुकली. दरम्यान, याच कालावधीत देशातील सोयाबीन बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली. विदेशातून येणाऱ्या सोयाबीनला ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव असल्याने स्थानिक बाजारपेठांत सोयाबीनचे दर गडगडले आहेत, असे सोयाबीन खरेदी- विक्री करणाऱ्या तज्ज्ञ व्यापाऱ्यांनी सांगितले.

वर्ष कसे काढावे, ही चिंता...

मला १० एकर शेती असून, ७ बॅग सोयाबीनची पेरणी केली होती. मध्यंतरी पावसाचा खंड आणि त्यानंतर सततच्या पावसामुळे उतारा ५० टक्क्यांनी घटला. अशा परिस्थितीत चांगल्या दरामुळे काही तरी पदरी पडेल, अशी आशा होती; परंतु दर कोसळल्याने संकट निर्माण झाले आहे. वर्ष कसे काढावे, अशी चिंता लागली आहे.

- मधुकर बिरादार, शेतकरी, तगरखेडा.