शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

सुगंधी तंबाखूची चोरट्या मार्गाने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:20 IST

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान लातूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे ...

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

लातूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, चार तालुक्यांत वीसहून अधिक जनावरे वीज पडल्याने मृत्युमुखी पडली आहेत. निलंगा, औराद शहाजानी, जळकोट, चाकूर, अहमदपूर, आदी तालुक्यांत अवकाळी पाऊस बरसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.

शहरातील बाजारपेठेत संचारबंदीमुळे शुकशुकाट

लातूर : लातूर शहरात ८ ते १३ मे दरम्यान संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, गंजगोलाई, रेणापूर नाका, पाच नंबर चौक, आदी भागांत पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

खरीप हंगामासाठी कृषी विभागातर्फे मार्गदर्शन

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्या वतीने पेरणी क्षेत्र तसेच बी-बियाणांचे नियोजन केले जात आहे. यंदा शेतकऱ्यांनी घरगुती बियाणांचा वापर करावा, यासाठी गावस्तरावर कृषी विभागाच्या वतीने ऑनलाईन कार्यशाळा घेतल्या जात आहेत. तसेच बियाणे आणि खतावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

श्री. हेमरेड्डी मलम्मा यांची जयंती साजरी

लातूर : प. पू. श्री. हेमरेड्डी मलम्मा यांची जयंती राज्य यलम समाज कर्मचारी सेवा संघाच्या वतीने साजरी करण्यात आली. राज्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सत्यवान माचपल्ले, विजयकुमार पिनाटे, अंगद चामवाड, प्रकाश बंडापल्ले, निरंजन रेड्डी, गोविंद माडे, पांडुरंग वलमपल्ले, सुरेखा गुरमे, गोपिका बुड्डे, महानंदा बंडापल्ले, आदींसह महाराष्ट्र राज्य यलम समाज कर्मचारी सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा मदतीसाठी पुढाकार

लातूर : शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी एनसीसीचे विद्यार्थी सरसावले आहेत. शहरातील पोलीस पथकांसमवेत एनसीसीचे विद्यार्थी संचारबंदीचे पालन करण्यासाठी नागरिकांना आवाहन करीत आहे. शहरातील दयानंद गेट परिसर, पाच नंबर चौक, एक नंबर चौक, महात्मा गांधी चौक, रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, आदी ठिकाणी एनसीसीचे विद्यार्थी आपली सेवा बजावीत आहेत. दरम्यान, एनसीसी विद्यार्थी पोलिसांच्या मदतीसाठी सरसावले असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

ग्रामीण भागात अधिग्रहणाची मागणी

लातूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून, जवळपास ८१ हून अधिक गावांनी अधिग्रहणाची मागणी पंचायत समिती स्तरावर केली आहे. तसेच या प्रस्तावांची तहसील स्तरावरून पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर उपाययोजना राबविण्याबाबत निर्णय होणार आहे. टंचाई निवारणाची कामे प्रगतिपथावर असून, ज्या गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत, त्यांना तत्काळ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.