शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कारेपूर पाटी ते खंलग्री रस्त्याची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST

किनगाव ते खलंग्रीपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र, खलंग्री ते कारेपूर पाटीपर्यंतच्या ८ किमी रस्त्यावर खड्डे बुजविण्यात आले ...

किनगाव ते खलंग्रीपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र, खलंग्री ते कारेपूर पाटीपर्यंतच्या ८ किमी रस्त्यावर खड्डे बुजविण्यात आले नाहीत. परिणामी, रस्त्याची चाळणी झाल्याने प्रवास करणे अवघड झाले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रेणापूर तालुक्यातील खलंग्री ते कारेपूर पाटी या आठ किलोमीटरचा रस्ता जागोजागी उखडल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय, गिट्टी उघडी पडली आहे. या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या अवजड वाहनांमुळे खड्ड्याचा आकारमान दिवसागणिक वाढत आहे. गुत्तेदाराने तीन महिन्यांपूर्वी अर्धा कि.मी.चे काम थातूरमातूर केले आहे. खड्डे बजविण्याचे अर्धवट काम साेडून गेल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. परिणामी, या रस्त्यामुळे मोटारसायकल चालकांना खडी उडून लागत आहे. अनेक चारचाकी वाहनाचे चेंबर फुटण्याच्या घटना घडत आहेत. यातून वाहनांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेत आहे. हा रस्ता लातूरला जाण्यासाठी पर्यायी जवळचा मार्ग आहे. यासाठी अहमदपूर -किनगाव-कारेपूर-रेणापूर-लातूरमार्गे वाहनांची मोठी संख्या आहे. रस्त्यात आठ किलोमीटर अंतरामध्ये जवळपास असेच लहान-मोठे खड्डे पडले आहेत.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना, प्रवाशांना मणक्यांचा त्रास वाढला आहे. संबंधित विभागाने लक्ष देत रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्रस्त प्रवासी, वाहनधारकांतून होत आहे.

रस्ता दुरुस्तीसाठी प्रक्रिया सुरू...

रेणापूर उपविभागीय सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे उपविभागीय अभियंता ओमप्रकाश सारडा यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, हा रस्ता खराब झाला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी प्रक्रिया सुरू आहे. येत्या तीन-चार दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. यातून वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांची गैरसाेय टळणार आहे.