शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

कारेपूर पाटी ते खंलग्री रस्त्याची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST

किनगाव ते खलंग्रीपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र, खलंग्री ते कारेपूर पाटीपर्यंतच्या ८ किमी रस्त्यावर खड्डे बुजविण्यात आले ...

किनगाव ते खलंग्रीपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र, खलंग्री ते कारेपूर पाटीपर्यंतच्या ८ किमी रस्त्यावर खड्डे बुजविण्यात आले नाहीत. परिणामी, रस्त्याची चाळणी झाल्याने प्रवास करणे अवघड झाले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रेणापूर तालुक्यातील खलंग्री ते कारेपूर पाटी या आठ किलोमीटरचा रस्ता जागोजागी उखडल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय, गिट्टी उघडी पडली आहे. या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या अवजड वाहनांमुळे खड्ड्याचा आकारमान दिवसागणिक वाढत आहे. गुत्तेदाराने तीन महिन्यांपूर्वी अर्धा कि.मी.चे काम थातूरमातूर केले आहे. खड्डे बजविण्याचे अर्धवट काम साेडून गेल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. परिणामी, या रस्त्यामुळे मोटारसायकल चालकांना खडी उडून लागत आहे. अनेक चारचाकी वाहनाचे चेंबर फुटण्याच्या घटना घडत आहेत. यातून वाहनांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेत आहे. हा रस्ता लातूरला जाण्यासाठी पर्यायी जवळचा मार्ग आहे. यासाठी अहमदपूर -किनगाव-कारेपूर-रेणापूर-लातूरमार्गे वाहनांची मोठी संख्या आहे. रस्त्यात आठ किलोमीटर अंतरामध्ये जवळपास असेच लहान-मोठे खड्डे पडले आहेत.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना, प्रवाशांना मणक्यांचा त्रास वाढला आहे. संबंधित विभागाने लक्ष देत रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्रस्त प्रवासी, वाहनधारकांतून होत आहे.

रस्ता दुरुस्तीसाठी प्रक्रिया सुरू...

रेणापूर उपविभागीय सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे उपविभागीय अभियंता ओमप्रकाश सारडा यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, हा रस्ता खराब झाला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी प्रक्रिया सुरू आहे. येत्या तीन-चार दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. यातून वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांची गैरसाेय टळणार आहे.