शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

संमेलनाध्यक्षपदाच्या अनुभवांवर लवकरच येणार श्रीपाल सबनीस यांचे पुस्तक !

By admin | Updated: October 14, 2016 17:54 IST

श्रीपाल सबनीस हे संमेलनाच्या निवडणुकीपासून ते अध्यक्षपदावरील एक वर्षाच्या अनुभवांवर पुस्तक लिहीत आहेत.

ऑनलाइन लोकमत 
लातूर, दि. १४ -  ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे संमेलनाच्या निवडणुकीपासून ते अध्यक्षपदावरील एक वर्षाच्या अनुभवांवर पुस्तक लिहीत आहेत. संमेलनाध्यक्ष झाल्यापासून विविध वादात सापडलेल्या सबनिस यांच्या  साहित्य संमेलनातील अनुभवांच्या गाठोड्यांच्या या पुस्तकात आता काय काय बाहेर येणार ? याची उत्सुकता मराठी वाचकांना लागली आहे. 
लातूर येथे कार्यक्रमानिमित्त आले असता श्रीपाल सबनीस यांनी याबाबत ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली.  ते म्हणाले की, माझा अध्यक्षपदाचा आठ महिन्याचा काळ लोटला. अनेक बरेवाईट अनुभव या आठ आणि त्याआधीच्या दोन महिन्याच्या निवडणूक प्रक्रियेने दिले. हे सारे संचित शब्दबध्द व्हावी, ही माझी भावना होती. परंतु आत्ता इतक्यात त्यावर लिहावे हे काही डोक्यात नव्हते. मात्र पुण्याच्या चेतन बुक्सने या अनुभवांचे पुस्तक लवकर प्रकाशित करण्याचे ठरविले. खरेतर ही कल्पनासुध्दा त्यांनीच माझ्या पुढ्यात ठेवली आणि मला ती ऐकता क्षणी आवडली. त्यामुळे मी पुस्तकावर वेगाने काम सुरु केले आहे. 
भरपूर अनुभव पाठीशी असल्यामुळे पुस्तकात काय आणि किती लिहावे ? इतके मला झाले आहे. हे सरते वर्षे माझ्या संपूर्ण आयुष्यातील सर्वाधिक वादळी आहे. मान, सन्मान आणि अपमान या तीनही छटा मी वर्षात पुरेपूर अनुभवलेल्या आहेत. निवडणुकीतील माझ्या अध्यक्ष म्हणून निवडीपर्यंतचा रोचक प्रवास, निवडूण आल्यानंतरचे वादविवाद, संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर एकाच वेळी वाट्याला आलेला मान आणि अपमान, हे वर्षभर पोलिस संरक्षणात भाषण करणे, कोणत्याही शहरात गेल्यानंतर आधी पोलिसांचा, मग ‘दोन्ही प्रकार’च्या कार्यकर्त्यांचा पडणारा गराडा,  काही झालेले आणि न झालेले राडे, आलेले चित्रविचित्र अनुभव हे पुस्तकात येतील, असे ते म्हणाले. 
 
आठ महिन्यात २८६ कार्यक्रम केले ! 
एखादा अपवाद सोडला तर संमेलनाध्यक्ष म्हणून मी महाराष्टÑाच्या प्रत्येक जिल्ह्यात गेलो आहे. एक नव्हे.. दोन नव्हे.. तर तब्बल २८६ कार्यक्रमांना मी पाहुणा म्हणून गेल्या आठ महिन्यात हजेरी लावली आहे. प्रत्येक कार्यक्रमाला सहकुटुंब गेलो. प्राध्यापकीतून निवृत्त झाल्यानंतर साठीनंतर चांद्यापासून बांद्यापर्यंतचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. आतापर्यंतच्या इतिहासात एका वर्षात कोणताही अध्यक्ष इतका फिरला नसेल, तितका मराठी साहित्याची कावड घेऊन मी फिरलो. गदीमांच्या माडगूळ गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पाहुणा होतो. आधीच गाव छोटेसे, त्यात भीमनगर एकदम छोटेसे. परंतु कार्यकर्त्यांनी बळ दिले.  ‘श्रीपाल सबनीस यांचा विजय असो’च्या घोषणा देत स्वागत केले. हे माझ्यासाठी खुप प्रेरणादायी आहे. जे काही अपमानाचे प्रसंग आले आहेत ते ही खुप काही शिकविणारे असल्याचेही ते म्हणाले.