शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST

लातूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे निर्बंध उठवताना शासन खबरदारी घेत असून, लाट रोखण्यासाठी ...

लातूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे निर्बंध उठवताना शासन खबरदारी घेत असून, लाट रोखण्यासाठी जपून पावले उचलत आहे. शासनाचे निर्णय जनतेच्या हिताचे आहेत. त्यामुळेच मंदिरे उघडण्याची घाई केली जात नाही. शासन योग्य ती भूमिका घेत असल्याचे मत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले तर भारतीय जनता पक्षाने सर्वच निर्बंध उठवले आहेत मग मंदिरेच बंद का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मंदिरे उघडायला हवीत काय? यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली असता, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या भूमिकेचे समर्थन केले. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनाचे संकट असल्यामुळे जगच हैराण आहे. मग मंदिरांचे राजकारण कशासाठी, असा प्रश्न काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी केला. भाजप शहर जिल्हाध्यक्षांनी मंदिरे उघडण्याची भूमिका लावून धरली. सगळेच निर्बंध उठवले आहेत मग मंदिरे बंद कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कोरोनानंतरच मंदिरे उघडावीत...

कोरोना अद्याप गेलेला नाही. संसर्ग सुरूच आहे. तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवली जात आहे. राज्य शासन योग्य ती भूमिका घेत आहे. त्यामुळे घाई करू नये. शासनाला जनतेची काळजी आहे.

ॲड. श्रीशैल्य उटगे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

मंदिरांवरून राजकारण करू नये

राज्य शासनाने कोरोनाची परिस्थिती अत्यंत ताकतीने हाताळली आहे. भाजप जातीयवाद निर्माण करण्यासाठी मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद करत आहे. त्यांना जनतेच्या आरोग्याची काळजी नाही. म्हणूनच त्यांच्याकडून शंखनाद होत आहे.

मकरंद सावे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कोरोना गेल्यानंतरच मंदिरे उघडावीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले निर्णय घेत आहे. कोरोना थोडा कमी झाल्यानंतर काही निर्बंध उठविण्यात आले आहेत. अत्यावश्यक असणाऱ्या सर्व बाबी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मंदिरे उघडण्याची घाई नको. कोरोना गेलेला नाही.

संतोष सोमवंशी, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना

नियमांचे पालन करून परवानगी मिळावी...

कोरोना नियमांचे पालन करून मंदिरे उघडण्यास परवानगी दिली पाहिजे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. भाविकांना मंदिरात देवापुढे नतमस्तक झाल्यानंतर थोडे समाधान मिळेल. शिवाय कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडता येईल. मंदिर परिसरात पूजाअर्चा साहित्य विक्रीचे स्टॉल असतात. त्यांचाही व्यवसाय बंद झालेला आहे. अनेकांची उपजीविका मंदिर परिसरातील उलाढालीवर असते. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून मंदिरे उघडण्यास परवानगी मिळावी, अशी अपेक्षा काही विश्वस्तांनी व्यक्त केली.