शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

अहमदपुरात वाजली शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST

काेरोनामुळे गतवर्षीच्या २७ फेब्रुवारीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थीसंख्या कमी होती. बहुतांश पालकांनी विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी अनास्था दाखविली. ...

काेरोनामुळे गतवर्षीच्या २७ फेब्रुवारीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थीसंख्या कमी होती. बहुतांश पालकांनी विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी अनास्था दाखविली. तसेच संमतीपत्र भरून घेणे, शाळेमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था याची चाचपणी पालक करीत होते. तसेच दररोज शाळा स्वच्छ करून घेणे, विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे असे विविध नियम लागू करण्यात आले आहेत.

तालुक्यात एकूण २११ शाळा असून, त्यात १०३ जिल्हा परिषदेच्या, तर खासगी १०८ शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळांत ४ हजार ११२, तर खासगी शाळांत १७ हजार २३२ विद्यार्थी आहेत. एकूण २१ हजार ३४४ विद्यार्थी आहेत. तसेच जिल्हा परिषदेत १४१, तर खासगी शाळांत ३४९ शिक्षक आहेत. पहिल्या दिवशी केवळ दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली होती.

ग्रामीण भागात जनजागृती...

शाळेच्या पहिल्या दिवशी केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यात शहरातील शाळांमध्ये उपस्थिती चांगली होती. मात्र, ग्रामीण भागात उपस्थिती कमी होती. त्यामुळे जनजागृती करण्यात येणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी नानासाहेब बिडवे यांनी सांगितले.

महिनाभरापासून इयत्ता ९वी ते १२वीपर्यंतचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास झाला नाही. बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी ४० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी करून वर्गात सोडण्यात आले, असे यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एम. बिराजदार यांनी सांगितले.