शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST

संदीप शिंदे लातूर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, तर पहिली ते ...

संदीप शिंदे

लातूर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, तर पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. एकीकडे शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या नियमांचे पालन करीत होणार असून, इतर वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा होऊ शकते, शाळेची परीक्षा रद्द करण्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने तरी घ्यावी, अशी मागणी पालक, विद्यार्थ्यांमधून होत आहे.

जिल्ह्यात पहिली ते आठवी आणि नववी, अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख १८ हजार ९९४ आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्गांतील विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे, तर दुसरीकडे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करत आहेत. मात्र, शिक्षण विभागाने परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांतून ऑनलाइन परीक्षा घेण्याचा सूर उमटत आहे. जिल्ह्यात पहिलीचे ४७ हजार ७७८, दुसरी ४६ हजार ६६१, तिसरी ४६ हजार ६२१, चौथी ४६ हजार २२, पाचवी ४७ हजार ६९९, सहावी ४८ हजार ४८८, सातवी ४९ हजार ६३७, आठवी ४९ हजार २९३, नववी ४८ हजार ४६५ तर अकरावीची ३४ हजार ३५२ विद्यार्थी संख्या आहे. परीक्षा न घेता या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. काही पालकांतून या निर्णयाचे स्वागत होत असून, काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिक्षणतज्ज्ञ म्हणतात...

इयत्ता १ ते ८ वीचे विद्यार्थी सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आरटीई २००९ नुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमान करून वर्गन्नती करणे व जी मुले अभ्यासात मागे आहेत, त्यांना पुन्हा अध्यापन करून इतर मुलांसोबत आणणे अपेक्षित आहे. इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही एकूण संख्येच्या प्रमाणात अत्यल्प असते. त्यामुळे कोविड १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून शिष्यवृत्ती परीक्षा प्रत्यक्ष घेण्यास काहीही हरकत नाही. - सतीश सातपुते

परीक्षा घेण्यामागचा मूळ उद्देश हा विद्यार्थ्यांनी त्या शैक्षणिक वर्षातील अपेक्षित क्षमता कितपत अवगत केल्या आहेत हे जाणून घेणे हा होय. परीक्षा झाल्या किंवा नाही हे महत्त्वाचे नाही तर सध्याची भयंकर अशी कोरोनाची परिस्थिती पाहता व जवळपास वर्षभर शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी हा कोणत्या स्तरावर आहे व परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर कोणते अध्ययन अनुभव त्यांना आवश्यक आहे हे ठरविण्यासाठी कमीत कमी ऑनलाइन पद्धतीने तरी परीक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढची अध्ययनाची नीती ठरविण्यास शिक्षकांना मदत होईल. नागेश लोहारे

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परीक्षा ही केवळ ज्ञान व आकलनावर आधारित असतात. पण इतर अनेक कौशल्ये असे आहेत की, परीक्षेशिवाय तपासता येतात. क्रिएटिव्हिटी, संप्रेषण, सहकार्य, आत्मविश्वास, उपयोजन, कौशल्य या बाबी विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण असतात. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मोजकेच विद्यार्थी असतात. त्यामुळे इतर वर्गाची आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तुलना करणे योग्य नाही. - प्रभाकर हिप्परगे

पालक म्हणतात...

गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन अभ्यास सुरू असला तरी सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. या काळात मुलांना परीक्षेसाठी पाठविणे धोकादायक आहे. त्यामुळे पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय योग्य असून, या निर्णयाचे मी स्वागत करतो. मुलांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास हरकत नाही. माधव रासुरे, पालक

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे, तर दुसरीकडे इतर वर्गाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्याय आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर ऑनलाइन वर्गाला उपस्थिती दर्शविली आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेच्या पर्यायाचा विचार करायला हवा.

-विजय सोनवणे, पालक

वर्ग विद्यार्थी संख्या

पहिली ४७,७७८

दुसरी ४६,६६१

तिसरी ४६,६२१

चौथी ४६,०२२

पाचवी ४७,६९९

सहावी ४८,४८८

सातवी ४९,६३७

आठवी ४९,२९३

नववी ४८,४६५

अकरावी ३४,३५२