शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संततधार; रेणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार आहे. सर्वच महसूल मंडळात दमदार पाऊस झाला असून ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. मांजरा ...

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार आहे. सर्वच महसूल मंडळात दमदार पाऊस झाला असून ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. मांजरा नदीवरील टाकळगाव बॅरेजमध्ये ७७,वांजरखेडा ८५, वांगदरी ८९, कारसा-पोहरेगाव ९०, नागझरी ९५, बिंदगीहाळ ८५, डोंगरगाव ८७,आणि होसुर बॅरेजेस १०० टक्के भरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे मांजरा नदीपात्रात १८५ किलोमीटर पर्यंत पाणी स्थिरावले आहे. जिल्ह्यातील लातूर,अहमदपूर, उदगीर, औसा,निलंगा,चाकूर,रेणापूर, देवणी, जळकोट आणि शि.आनंतपाळ तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात पाऊस झाल्याने पाण्याचा संचय मोठ्या प्रमाणात झाला आहे. सोमवारी रात्रभर पावसाची रिपरिप जिल्ह्यात सुरू होती. मंगळवारीही दिवसभर संततधार असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून रीना मध्यम प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. रेणापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यातील एक दोन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याचेही महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. रविवारी रात्री आणि सोमवारी तसेच मंगळवारी झालेल्या पावसात रेणापूर तालुक्यामध्ये अनेक खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील अनेक गावांच्या शिवारातील ऊस आडवा झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे.

मांजरा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ...

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातही झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरण ६१.२ टक्के भरले असून त्यात ५०.६४ टक्के उपयुक्त साठा आहे. धरण क्षेत्रात कालपासून पाऊस होत असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. सध्या धरणात एकूण साठा १३६.७५२ दलघमी इतका झाला आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा ८९.६५२ दलघमी आहे. तर पाणी पातळी ६३९.९० मीटरवर आली आहे.

पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली...

लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब, मुरुड, लातूर एमआयडीसी आणि औसा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात १३६.७५२ दलघमी पाणीसाठा झाला असून, पाणी पातळी ६३९.९० मीटरवर आली आहे. एकूण पाणीसाठा ६१.२ टक्के झाला असून, उपयुक्त पाणीसाठा ५०.६४ टक्के झाला आहे. याशिवाय, मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा नदीवरील सर्वच बॅरेजेस भरले आहेत. यामुळे लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.