शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

जिल्ह्यात संततधार; रेणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार आहे. सर्वच महसूल मंडळात दमदार पाऊस झाला असून ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. मांजरा ...

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार आहे. सर्वच महसूल मंडळात दमदार पाऊस झाला असून ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. मांजरा नदीवरील टाकळगाव बॅरेजमध्ये ७७,वांजरखेडा ८५, वांगदरी ८९, कारसा-पोहरेगाव ९०, नागझरी ९५, बिंदगीहाळ ८५, डोंगरगाव ८७,आणि होसुर बॅरेजेस १०० टक्के भरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे मांजरा नदीपात्रात १८५ किलोमीटर पर्यंत पाणी स्थिरावले आहे. जिल्ह्यातील लातूर,अहमदपूर, उदगीर, औसा,निलंगा,चाकूर,रेणापूर, देवणी, जळकोट आणि शि.आनंतपाळ तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात पाऊस झाल्याने पाण्याचा संचय मोठ्या प्रमाणात झाला आहे. सोमवारी रात्रभर पावसाची रिपरिप जिल्ह्यात सुरू होती. मंगळवारीही दिवसभर संततधार असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून रीना मध्यम प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. रेणापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यातील एक दोन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याचेही महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. रविवारी रात्री आणि सोमवारी तसेच मंगळवारी झालेल्या पावसात रेणापूर तालुक्यामध्ये अनेक खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील अनेक गावांच्या शिवारातील ऊस आडवा झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे.

मांजरा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ...

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातही झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरण ६१.२ टक्के भरले असून त्यात ५०.६४ टक्के उपयुक्त साठा आहे. धरण क्षेत्रात कालपासून पाऊस होत असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. सध्या धरणात एकूण साठा १३६.७५२ दलघमी इतका झाला आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा ८९.६५२ दलघमी आहे. तर पाणी पातळी ६३९.९० मीटरवर आली आहे.

पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली...

लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब, मुरुड, लातूर एमआयडीसी आणि औसा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात १३६.७५२ दलघमी पाणीसाठा झाला असून, पाणी पातळी ६३९.९० मीटरवर आली आहे. एकूण पाणीसाठा ६१.२ टक्के झाला असून, उपयुक्त पाणीसाठा ५०.६४ टक्के झाला आहे. याशिवाय, मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा नदीवरील सर्वच बॅरेजेस भरले आहेत. यामुळे लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.