शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

शेतीमालाचे नमुने, मातेरे घेणे बंद, शेतक-यांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST

महाराष्ट्राच्या सीमेवरील उदगीरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मराठवाड्यातील मोठी बाजारपेठ आहे. येथील बाजारात शेजारील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच नांदेड ...

महाराष्ट्राच्या सीमेवरील उदगीरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मराठवाड्यातील मोठी बाजारपेठ आहे. येथील बाजारात शेजारील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक होत असते. मागील काही वर्षांपासून बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालातून खरेदीदार व्यापारी हे नमुन्याच्या नावाखाली धान्य घेऊन जात असत. तसेच हमालांना शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वजन झाल्यानंतर मातरेच्या नावाखाली धान्य द्यावे लागत होते. ही प्रथा बंद करण्यात यावी, म्हणून बाजार समितीकडे विविध सामाजिक संघटना व शेतक-यांनी वेळोवेळी मागणी केली होती.

दरम्यान, १७ फेब्रुवारीपासून मार्केट यार्डातील हमालांनी व्यापारी लेव्ही भरत नसल्याच्या कारणावरुन काम बंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे हमाल व व्यापा-यांत संघर्ष सुरू झाला. त्यातच व्यापाऱ्यांनी हमालांना मातरे देणार नाही, अशी भूमिका घेतली. परिणामी, येथील बाजार सलग पाच दिवस बंद राहिला.

रविवारी बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, संचालक सुभाष धनुरे, गौतम पिंपरे, हमाल गाडीवान संघटनेचे प्रतिनिधी उत्तम भालेराव, शरणाप्पा सूर्यवंशी, श्रीरंग कांबळे, आडत असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी घोगरे व त्यांचे पदाधिकारी, दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष सुदर्शन मुंढे, लक्ष्मीकांत चिकटवार व त्यांच्या सहका-यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. बाजारपेठेत येणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून शेतक-यांच्या शेतमालातून व्यापाऱ्यांनी नमुना घेऊ नये तसेच हमालांना मातरेच्या स्वरूपात धान्य देऊ नये. त्याऐवजी रोखीने मोबदला देण्यावर एकमत झाले. त्यानंतर दुपारी ३ वा. बाजार सुरू झाला.

शेतक-यांचा फायदा होणार...

अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतमालातून नमुना व मातरे घेण्याची प्रथा होती. ती आजपासून बंद झाली. हा निर्णय घेण्यासाठी व्यापारी व हमालांनी दिलेल्या सहकार्यामुळे शेतक-यांचा फायदा होणार आहे.

- सिध्देश्वर पाटील, सभापती, बाजार समिती.

शेतकरी हिताचा निर्णय...

शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वजन झाल्यानंतर मातरे देण्यावेळी बऱ्याचदा शेतकरी व आमच्यात वाद होत होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

- संभाजी घोगरे, अध्यक्ष, आडत असो.

व्यवहारासाठी निर्णय...

मातरे बंद करण्याचा निर्णय काही हमालांना पटणारा नसला तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी व बाजार सुरळीत होण्यासाठी हमालांनी तो मान्य केला आहे.

- गौतम पिंपरे.

योग्य निर्णय झाला...

अनेक वर्षांपासून चालू असलेला धान्य देण्याचा प्रकार आजपासून बंद झाल्याने ही पद्धत अवलंबण्यासाठी आमच्या हमाल बांधवांना वेळ लागेल. परंतु, हा निर्णय योग्य आहे. आमचा त्यास पाठिंबा कायम राहिल.

- उत्तम भालेराव, अध्यक्ष, हमाल मापाडी संघटना.