शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

एस. टी. प्रवाशांची तीच ती कारणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:15 IST

लातूर : अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना ये-जा करता यावी म्हणून राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू ठेवली आहे. मात्र, ज्यांच्याकडे पास ...

लातूर : अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना ये-जा करता यावी म्हणून राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू ठेवली आहे. मात्र, ज्यांच्याकडे पास नाही, त्या व्यक्ती दवाखान्यात नातेवाईकाला भेटण्यासाठी, डबा देण्यासाठी जायचे असल्याची कारणे सांगून प्रवास करत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात पाच आगार आहेत. या आगारांमधून सध्या ३० ते ३५ गाड्या दररोज धावत आहेत. लातूर आगाराच्या १६ बसेस सुरू आहेत. ही सेवा अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच दिली जात आहे. त्यानुसार उदगीर, अहमदपूर, मुरुड, निलंगा, औसा, नांदेड, उस्मानाबाद या मार्गांवर महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या काही बसेस सुरू आहेत. साडेचारशे ते पाचशे प्रवासी या सेवेचा दिवसाला लाभ घेत असल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले.

वाहकांसोबत वादाच्या घटना

लातूर - उदगीर या मार्गावर जास्त प्रवासी आहेत. त्या खालोखाल अहमदपूर - लातूर या मार्गावर आणि त्यानंतर लातूर - निलंगा या मार्गावर प्रवासी अधिक आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळून काही व्यक्तीही प्रवासासाठी येतात. दवाखान्याची, शाळेच्या कामाची कारणे त्यांच्याकडून सांगितली जातात. यावेळी खात्री न पटल्यामुळे वाहकाने त्यांना गाडीत घेण्यास विरोध केला तर हे प्रवासी वाद घालतात. दरम्यान, अशा घटना या मार्गांवर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, प्रवाशांची कारणे पटण्यासारखी असतील तरच प्रवासाला मुभा दिली जाते.

लातूर आगारातून १५ ते १६ बसेस सुरू आहेत. उदगीरला ८, अहमदपूरला ४, निलंग्याला ४, औसा २ अशा गाड्या धावतात. केवळ आणि केवळ अत्यावश्यक सेवेतीलच लोकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेला अडथळा होऊ नये, म्हणून ही सेवा सुरू आहे. उदगीर, अहमदपूर, नांदेड, उस्मानाबाद, निलंगा, औसा, मुरुड आदी मार्गांवर या बसेस धावत आहेत. कोविड नियमांचे पालन करून सेवा मर्यादित स्वरूपात सुरु आहे.

- जाफर कुरेशी, आगार व्यवस्थापक