शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

संधिवातीचा विळखा वाढतोय; महिलांमध्ये प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 19:19 IST

यावर नियंत्रणासाठी सकस आहार आणि व्यायाम आवश्यक असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे़ 

ठळक मुद्देआहारात प्रोटिनची कमतरता भासत असल्याने जवळपास १५ ते २० टक्के लोकांना संधी वातीचा त्रास आहे़ संधिवातीचे अनेक प्रकार आहेत़ ती कोणत्याही वयात होऊ शकते़

- आशपाक पठाण  

लातूर : आहारात कार्बोहायड्रेटचे अधिक प्रमाण , खाली बसून जेवणाची पध्दत, व्यायामाचा अभाव आदी कारणामुळे संधिवातीचा त्रास लवकर सुरू होतो़ आहारात प्रोटिनची कमतरता भासत असल्याने जवळपास १५ ते २० टक्के लोकांना संधी वातीचा त्रास आहे़ यावर नियंत्रणासाठी सकस आहार आणि व्यायाम आवश्यक असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे़ 

१२ आॅक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिवस म्हणून साजरा केला जातो़ भारतात रक्तातील वातीचे प्रमाण १३ ते २० टक्के आहे तर वयोमानानुसार होणा-या वातीचे प्रमाण जवळपास ५० टक्के आहे़ हा आजार बरा होत नाही, अशा अनेक गैरसमजुती आहेत़ परंतु अद्ययावत उपचार पध्दती व नवनवीन औषधींचा शोध लागल्याने याला आळा घालता येणे शक्य आहे़

औषधी महागडी असली तरी रूग्णांना दिलासा मिळतो़ संधिवातीचे अनेक प्रकार आहेत़ ती कोणत्याही वयात होऊ शकते़ याचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असून अनेक रूग्णांमध्ये संधिवातीचे ठोस कारणही सापडत नाही़ काहींना हा आजार अनुवंशिक किंवा जनुकीय बदलामुळे होत असल्याचे समोर आले आहे़ विशिष्ट जंतूसंसर्ग किंवा विषाणूमुळे संधिवात होते़ धुम्रपान, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव यातून आजाराला बळ मिळत आहे, असे संधिवात तज्ज्ञ डॉ़ सूरज धूत, डॉ़ अशोक पोदार यांनी सांगितले़  

योग्य वेळी उपचार आवश्यक़़नेहमी सांधे किंवा मांसपेशी दुखणे, सांधे आकडे, सूज येणे, शरीरावर वारंवार पुरळ येणे, वारंवार गर्भपात, थकवा जाणवणे, त्वचा जड पडणे, थंडीमुळे सांधे दुखणे, त्वचा कोरडी पडणे आदी लक्षणे ही संधिवातीची आहेत़ त्यामुळे रूग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घेणे आवश्यक आहे़ संधिवातीवर उपचार करण्यासाठी संशोधन करून औषधी निर्माण करण्यात येत आहे़ या औषधांमुळे रूग्णांना दिलासा मिळतो, असे डॉ़ सूरज धूत यांनी सांगितले़ 

थंडीपासून बचाव महत्वाचा़ वातीचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे़ उपचारात नवीन तंत्रज्ञान आले आहे़ औषधी महागडी असून यातून रूग्णांना लवकर दिलासा मिळतो़ वातावरणातील बदलाचा परिणाम संधिवातीच्या रूग्णांवर होतो़ हिवाळ्यात अशा रूग्णांना जास्त त्रास होतो़ त्यामुळे रूग्णांनी बचावासाठी उबदार कपडे परिधान करावेत़ नवीन तंत्रज्ञानामुळे रोगनिदान सोपे झाले आहे़ रूग्णांनी योग्य वेळी उपचार घेणे महत्वाचे आहे, असे डॉ़ अशोक पोदार यांनी सांगितले़

टॅग्स :laturलातूरmedicineऔषधंhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर