शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या तुरुंगातील पतीला सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:44 IST

गेल्या २० वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात छळ सोसणाºया माझ्या पतीला सोडवा, असा आर्त टाहोे फोडत जम्मू-काश्मीरमधील विष्णूदेवींनी लातुरात आपल्या व्यथा मांडल्या.

ठळक मुद्दे विष्णूदेवींचा दोन दशकांचा लढा लातुरात मांडल्या व्यथा

लातूर : गेल्या २० वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात छळ सोसणाºया माझ्या पतीला सोडवा, असा आर्त टाहोे फोडत जम्मू-काश्मीरमधील विष्णूदेवींनी लातुरात आपल्या व्यथा मांडल्या. त्यांच्यासमवेत पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या आरोपात जेल भोगलेल्या १५ जणांनी सांगितलेले अनुभवही अंगावर शहारे आणणारे होते.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या पुढाकारातून पाकिस्तानात जेल भोगून आलेल्या भारतीय नागरिकांचा सन्मान सोहळा लातूरमध्ये आयोजिण्यात आला होता. तद्नंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या जम्मू-काश्मीर, पंजाब व राजस्थानमधील १५ पीडित व त्यांच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन आपल्या वेदना सांगितल्या.जेल भोगून आलेले पंकजकुमार, सुनील, रामलाल, बाबुराम, डॅनियल तसेच ज्यांचे वडील जेल भोगून पाकिस्तानातच मृत्युमुखी झाले त्यांचा मुलगा सुरेंद्र यांच्या व्यथा मन सुन्न करणाºया होत्या.आम्ही का व कसे पाकिस्तानात गेलो हे सरकारने शोधावे, असे आव्हान देत पंकजकुमार म्हणाला, मी पाकिस्तानची जेल भोगली.  आमच्यावरील अन्यायाचा छडा लावावा. आम्हाला व आमच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. मदत करावी, असेही ते म्हणाले. माझे पती पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत म्हणून माझ्या जावयाने मुलीला छळले. तिचे नांदणेही उठले. अजून किती डागण्या सोसणार, असेही विष्णूदेवी म्हणाल्या.मानवाधिकार कार्यकर्ते प्रदीप पाटील खंडापूरकर म्हणाले, हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये शेकडो भारतीय छळ सोसत आहेत. ५६० जणांनी शिक्षा भोगली आहे. अनेक जण आमच्यासोबत आहेत. त्यांच्या वेदना कागदावर घ्या, त्यांना मदत करा व ज्यांचे नातलग आजही तुरुंगामध्ये खितपत आहेत, त्यांना सोडविण्यासाठी पुढाकार घ्या, अशी आमची मागणी आहे. २२ राज्यांत मोर्चे काढले, जंतरमंतरवर १७ वेळा आंदोलन केली. तरी न्याय मिळत नसेल, तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असेही खंडापूरकर म्हणाले.हमारे मन की बात सूनों...टिष्ट्वटला उत्तर देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ साºया देशाला सांगतात. कधी तरी हमारे मन की बात सूनों, अशी वेदना मांडत विष्णूदेवी म्हणाल्या, पाकिस्तान म्हणते माझ्या पतीने हेरगिरी केली. भारत सरकारकडे त्याची नोंद नाही. मग माझे पती कोठे गेले? पूर्वी मला त्यांचे पाकिस्तानमधून पत्र येत होते. गेल्या वर्षभरात तेही येत नाहीत. मुलांना मी कसे तरी सांभाळले, आता तरी माझी मदत करा.