शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

पाकिस्तानच्या तुरुंगातील पतीला सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:44 IST

गेल्या २० वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात छळ सोसणाºया माझ्या पतीला सोडवा, असा आर्त टाहोे फोडत जम्मू-काश्मीरमधील विष्णूदेवींनी लातुरात आपल्या व्यथा मांडल्या.

ठळक मुद्दे विष्णूदेवींचा दोन दशकांचा लढा लातुरात मांडल्या व्यथा

लातूर : गेल्या २० वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात छळ सोसणाºया माझ्या पतीला सोडवा, असा आर्त टाहोे फोडत जम्मू-काश्मीरमधील विष्णूदेवींनी लातुरात आपल्या व्यथा मांडल्या. त्यांच्यासमवेत पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या आरोपात जेल भोगलेल्या १५ जणांनी सांगितलेले अनुभवही अंगावर शहारे आणणारे होते.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या पुढाकारातून पाकिस्तानात जेल भोगून आलेल्या भारतीय नागरिकांचा सन्मान सोहळा लातूरमध्ये आयोजिण्यात आला होता. तद्नंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या जम्मू-काश्मीर, पंजाब व राजस्थानमधील १५ पीडित व त्यांच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन आपल्या वेदना सांगितल्या.जेल भोगून आलेले पंकजकुमार, सुनील, रामलाल, बाबुराम, डॅनियल तसेच ज्यांचे वडील जेल भोगून पाकिस्तानातच मृत्युमुखी झाले त्यांचा मुलगा सुरेंद्र यांच्या व्यथा मन सुन्न करणाºया होत्या.आम्ही का व कसे पाकिस्तानात गेलो हे सरकारने शोधावे, असे आव्हान देत पंकजकुमार म्हणाला, मी पाकिस्तानची जेल भोगली.  आमच्यावरील अन्यायाचा छडा लावावा. आम्हाला व आमच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. मदत करावी, असेही ते म्हणाले. माझे पती पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत म्हणून माझ्या जावयाने मुलीला छळले. तिचे नांदणेही उठले. अजून किती डागण्या सोसणार, असेही विष्णूदेवी म्हणाल्या.मानवाधिकार कार्यकर्ते प्रदीप पाटील खंडापूरकर म्हणाले, हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये शेकडो भारतीय छळ सोसत आहेत. ५६० जणांनी शिक्षा भोगली आहे. अनेक जण आमच्यासोबत आहेत. त्यांच्या वेदना कागदावर घ्या, त्यांना मदत करा व ज्यांचे नातलग आजही तुरुंगामध्ये खितपत आहेत, त्यांना सोडविण्यासाठी पुढाकार घ्या, अशी आमची मागणी आहे. २२ राज्यांत मोर्चे काढले, जंतरमंतरवर १७ वेळा आंदोलन केली. तरी न्याय मिळत नसेल, तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असेही खंडापूरकर म्हणाले.हमारे मन की बात सूनों...टिष्ट्वटला उत्तर देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ साºया देशाला सांगतात. कधी तरी हमारे मन की बात सूनों, अशी वेदना मांडत विष्णूदेवी म्हणाल्या, पाकिस्तान म्हणते माझ्या पतीने हेरगिरी केली. भारत सरकारकडे त्याची नोंद नाही. मग माझे पती कोठे गेले? पूर्वी मला त्यांचे पाकिस्तानमधून पत्र येत होते. गेल्या वर्षभरात तेही येत नाहीत. मुलांना मी कसे तरी सांभाळले, आता तरी माझी मदत करा.