शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

रहिवास एका प्रभागात, मतदार यादीत नाव दुसऱ्या प्रभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. २०११ ची जनगणना आधारभूत मानून लोकसंख्येनुसार आरक्षण ...

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. २०११ ची जनगणना आधारभूत मानून लोकसंख्येनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रभाग २ व ३ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहेत. प्रभाग रचनेनुसार प्रारूप मतदार यादी तयार होणे अपेक्षित असताना तलाठ्याने स्थानिक राजकीय मंडळींच्या सोयीप्रमाणे प्रभागनिहाय मतदार यादी तयार केल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेनुसार मतदार ज्या प्रभागात वास्तव्यास आहेत, त्या प्रभागात त्यांची मतदार म्हणून नोंद झाली नाही. साधारणतः ६५४ मतदारांसाठी एक प्रतिनिधी निवडून द्यावयाचा आहे. त्याप्रमाणे तीन प्रतिनिधी निवडून द्यावयाच्या प्रभागांमध्ये कमाल १ हजार ९६२ आणि दोन प्रतिनिधी निवडून द्यावयाच्या प्रभागांमध्ये कमाल १ हजार ३०८ मतदार असणे गरजेचे आहे; परंतु अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या प्रभाग-२ मध्ये तीन प्रतिनिधी निवडून द्यावयाचे असताना तेथे २ हजार २४२ एवढ्या मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तसेच प्रभाग-३ मध्ये दोन प्रतिनिधी निवडून द्यावयाचे असताना तिथे १ हजार ६५२ एवढ्या मतदारांची नोंद करण्यात आली आहे. याउलट सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या प्रभाग-६ मध्ये तीन उमेदवार निवडून द्यावयाचे असतानाही केवळ १ हजार ५४२ मतदारांची नोंद तिथे करण्यात आली आहे. मतदारांच्या मतदार यादीतील प्रभाग बदलामुळे प्रभाग २ व ३ येथील सर्वसाधारण लोकसंख्येचे व मतदारांचे प्रमाण जाणीवपूर्वक वाढविण्यात आले आहे. तसेच या आरक्षित प्रभागातील मतदारांचे विभाजन करून त्या प्रभाग-२ व ३ मध्ये अधिकच्या ६५० मतदारांची नोंदही केलेली आहे.

तलाठ्याने मनमानी केली आहे. तसेच प्रभाग रचनेप्रमाणे मतदार याद्या तयार न केल्यामुळे प्रत्येक प्रभागातील मतदारांची सरमिसळ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील ५०० ते ६०० मतदारांची नोंद प्रभाग रचनेनुसार त्यांच्या प्रभागात झालेली नाही.

त्यावर औराद शहाजानीतील प्रदीप पाटील, विश्वास थेटे, राजा पाटील, अमाेल ढाेरसिंगे, विशाल ओहाेळ, सुधाकर शेटगार आदी नागरिकांनी तहसीलदारांकडे आक्षेप नोंदविला आहे.

सोमवारी अंतिम मतदारयादी...

याप्रकरणी चाैकशी करून तलाठ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी घेऊन तहसीलदारांनी ग्रामस्थांची हरकत अंशतः मान्य करण्यात आली आहे, असे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे साेमवारी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीकडे औरादकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. औराद शहाजानी येथील सरपंच पदाला विशेष महत्त्व आहे. या निवडणुकीसाठी सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे चुरस निर्माण हाेणार आहे.