शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बेकायदा बांधकामे नियमितीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : लातूर शहर महागरपालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामे नियमितीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेने सर्वसामान्य शहरवासीयांत घबराट निर्माण झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : लातूर शहर महागरपालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामे नियमितीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेने सर्वसामान्य शहरवासीयांत घबराट निर्माण झाली असून, काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी महापौरांना निवेदन देऊन याकामी सुसूत्रता साधली जावी, अशी मागणी केल्याची माहिती स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी दिली.

मनपा प्रशासनाने सध्या शहरातील मंजूर नकाशापेक्षा जास्त बांधलेल्या इमारतीचे नियमितीकरण करण्यासाठी आदेश काढले आहेत. त्याबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. बेकायदा बांधकाम नियमित होण्यास आमचा विरोध नाही. पण प्रशासनाने सुरु केलेल्या चुकीच्या पद्धतीला विरोध आहे. नागरिकांमधून होणार विरोध हा रेडिरेकनरच्या दराबाबत आहे. त्यावरच बांधकाम परवाना फी व प्रीमियम रेट अवलंबून आहेत. त्यामध्ये फार मोठी तफावत असून, त्यासाठी प्रत्येकाच्या जागेचे मुद्रांक शुल्क कार्यालयाकडून प्रमाणपत्र घेऊन प्रकरण सुरु केल्यास नागरिकांमधील रोष काहीसा कमी होईल. कोणत्या वर्षाच्या पुढील इमारती ह्या बेकायदा ठरवाव्यात, हे एकदा कट ऑफ इअर ठरवावे व त्यापुढील बांधकामांची चौकशी करावी. शासनाच्या नवीन बांधकाम नियमावलीप्रमाणे रोडच्या रुंदीवर एफएसआय ठरत आहे. तो तीनपट होऊ शकतो. त्यासाठी रोड रुंदीचा चार्ट तयार करावा. प्रशासनाने दोन पटीपेक्षा जास्त एफएसआय दिलेला नाही, त्यामुळे अनेक इमारती बेकायदा ठरत आहेत, हा चार्ट मनपाकडे आहे. शहरातील सर्व मालमत्तांचे नुकतेच कर मूल्यांकन करताना प्रत्यक्ष मोजमाप घेतले आहे. त्यावर नागरिकांनी कर भरणा केला आहे. तो नकाशा मनपाकडे असून, तो ग्राह्य धरल्यास पुन्हा मोजमाप करण्याची आवश्यकता पडणार नाही. प्रशासनाची सर्वात मोठी चूक हे आहे की, प्रत्यक्ष बांधलेली सध्याची इमारत पूर्णतः बेकायदा ठरवत दर आकारला जात आहे. त्याऐवजी पूर्वी मनपाने दिलेल्या बांधकाम परवानगीचा एफएसआय हा सध्याच्या बांधकामातून वजा करून उर्वरित किती स्क्वेअर फूट बेकायदा बांधकाम होते, तेवढाच एफएसआय नियमितीकरणाची प्रक्रिया करावी, म्हणजे लोकांना आकडे भरमसाठ वाटणार नाहीत. नागरिकांना तूर्तास स्वयंनिर्धारण तत्वावर कागदपत्रांसह प्रकरण दाखल करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्यावी. त्याची पुढील काळात कार्यवाही करून विद्यमान दराने नियमितीकरण करावे व त्या मुदतीनंतर जी प्रकरणे येतील किंवा मनपा कर्मचारी शोधून काढतील त्यांना नियमाप्रमाणे युडीसीआरच्या दराप्रमाणे प्रीमियम घेऊन प्रकरण निकाली काढण्यात यावे, असे या निवेदनात अशोक गोविंदपूरकर यांनी म्हटले आहे. निवेदनावर अहमदखान पठाण, विजयकुमार साबदे, रवीशंकर जाधव, इम्रान सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.