शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

वीज बिल न देताच महावितरणची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST

जिल्ह्यात महावितरणचे १५ उपविभाग आहेत. यामध्ये १ लाख २६ हजार ५३ कृषिपंपधारक आहेत. त्यापैकी १ लाख २५ हजार ९४६ ...

जिल्ह्यात महावितरणचे १५ उपविभाग आहेत. यामध्ये १ लाख २६ हजार ५३ कृषिपंपधारक आहेत. त्यापैकी १ लाख २५ हजार ९४६ ग्राहकांकडे १ हजार २७८ कोटींची थकबाकी आहे. वीज बिल वसुलीसाठी नियमित बिल देणे आवश्यक असताना वर्षानुवर्षे बिल न देता सध्या महावितरणची वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे. बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया....

गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल मिळालेले नाही. आता न सांगताच वीज कनेक्शन कट केले आहे. त्यामुळे पिकांना पाणी कसे देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज बिल भरण्यास सवलत देण्याची गरज आहे. - शेतकरी

महावितरणच्यावतीने वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. वेळेवर बिल दिले जात नाही. एकदाच बिलाची मोठी रक्कम आली असल्याने बिल भरण्यास अडचण येत आहे. - शेतकरी

आतापर्यंत एकदाही महावितरणच्यावतीने रीडिंग घेतलेले नाही; पण बिल अवाच्या सव्वा दिले आहे. खरीप आणि रब्बी हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे बिलासाठी पैसे कुठून आणणार. शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यास मुदत द्यावी. - शेतकरी

थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम राबविली जात आहे. महावितरणच्यावतीने सवलत दिली जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन थकीत वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे. महावितरण लातूर विभाग

जिल्ह्यातील कृषीपंपधारक शेतकरी - १,२६,०५३

वीज बिल थकबाकी रक्कम - १२७८ कोटी

उपविभागनिहाय कृषिपंपचालक

लातूर ग्रामीण - ११५९९

लातूर उत्तर - ३५२

लातूर दक्षिण - ३६९

मुरुड ग्रामीण - १३३७२

रेणापूर - ११२६९

औसा - १७८११

किल्लारी - ७०६७

निलंगा - १८७३०

शिरूर अ. ४९६७

अहमदपूर - ७८४८

चाकूर - १०६६४

देवणी - ५०७५

शिरूर ताजबंद - ८७८६

उदगीर ग्रामीण - ७४४३

उदगीर शहर -७२१