शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंद विद्यालय येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST

लातूर रेल्वेस्थानक परिसरात वृक्षारोपण लातूर : शिवसेना जिल्हा शाखा लातूर व वृक्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी लातूर ...

लातूर रेल्वेस्थानक परिसरात वृक्षारोपण

लातूर : शिवसेना जिल्हा शाखा लातूर व वृक्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी लातूर रेल्वेस्थानक परिसरात १०१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यालय प्रमुख दिनेश बोरा, रेल्वेस्थानक प्रबंधक तिवारी, संदीप जाधव, लातूर वृक्ष प्रतिष्ठानच्या सुनंदा जगताप, चंद्रकांत शिंदे, प्रा. गरड, पी. विवेकानंद, महेश सलगर, बालाजी चामे, आदित्य सूर्यवंशी, शुभम पाटील, अनिता देशपांडे, अरिहंत किवंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली, तसेच संगोपन करण्याची शपथ देण्यात आली.

खोपेगाव येथे वृक्षलागवडीची केली पाहणी

लातूर : तालुक्यातील जि. प. प्रशाला खोपेगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी भेट देऊन मियावॉकीअंतर्गत वृक्षलागवडीची पाहणी केली, तसेच सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, गटशिक्षणाधिकारी धनंजय गिते, केंद्र प्रमुख मेनगुले, मुख्याध्यापक अन्वर पटेल, लक्ष्मण मोरे, रवि मोरे, अमोल घायाळ, दीपक मोरे आदींसह शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या परिसरात ९ हजार ७०० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. आता पुन्हा ८५०० वृक्षलागवड केली जाणार असून, पूर्वतयारीची सीईओ गोयल यांनी पाहणी केली.

वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण मोहीम

लातूर : शहरातील वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने ट्री गार्डसह अकरा वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, नूतन अध्यक्ष ॲड. अजित चिखलीकर, अजय सिंगनाथ, अमोल कुलकर्णी, विशाल वळसणे, प्रवीण कुंभार, अजय वळसणे, ऋषिकेश मेकले, रोहित कांबळे, निखिल वळसणे, गजानन दमदरे, डॉ. शिवकुमार इजारे, प्रशांत शिंदे, रोहित चवळे, गणेश पांचाळ, सचिन शिंदे, प्रीतम ढगे, करणसिंग टाक, ओमकार पोलदासे, गोविंद गौड, सूरज इगवे, सौदागर इजारे आदींची उपस्थिती होती.

मुख्य चौकातील खड्ड्यांमुळे गैरसोय

लातूर : शहरातील राजीव गांधी चौक परिसरात मुख्य चौकात रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. खड्डे चुकविताना अपघाताचा धोका असल्याने संबंधित विभागाने तत्काळ खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे. याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त

लातूर : शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दुपार आणि सायंकाळच्या वेळी अचानक वीज गुल होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, नियमित बिल भरूनही महावितरणच्या दुर्लक्षामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही विजेचा लपंडाव सुरूच आहे. याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.