शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

पाण्याची सोय नसल्याने रास्तारोको आंदोलन, वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:24 IST

रेणापूर तालुक्यातील हणमंतवाडी तांड्यास गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे तांड्यावरील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...

रेणापूर तालुक्यातील हणमंतवाडी तांड्यास गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे तांड्यावरील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तांड्यास पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी वारंवार नगरपंचायतीच्या मुख्याधिका-यांकडे मागणी करण्यात येऊन पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, अद्यापही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सातत्याने निवेदन देऊनही पाण्याचा प्रश्न सुटत नाही. घागरभर पाण्यासाठी शेतक-यांच्या शेतात जावे लागत आहे. त्यामुळे दिवसभराची कामे बाजूला ठेऊन अबालवृध्दांना पाण्यासाठी फिरावे लागत आहे.

पाण्याची समस्या सोडविण्यात यावी म्हणून गोर सेनेना व हणमंतवाडी तांड्यावरील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु, लोकप्रतिनिधींसह नगरपंचायत प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी सकाळी ११ वा. हणमंतवाडी तांड्यावरील महिला, मुले, नागरिक व गोरसेनेच्या वतीने रेणापूर- पानगाव- खरोळा रस्त्यावरील पानगाव फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले.

मुख्याधिका-यांचे लेखी आश्वासन...

नगरपंचायत मुख्याधिका-यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थ व गोर सेनेने आपले आंदोलन मागे घेतले. रेणापूर नगरपंचायतीने आगामी काळात या परिसरात आणि तांड्यावर मुलभूत सुविधांकडे उपलब्ध न केल्यास अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात येईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष बबलू जाधव, शरद राठोड, सचिव दया नायक राठोड, रवी चव्हाण, बालाजी राठोड, बाळू चव्हाण आदी उपस्थित होते. आंदोलनाला संभाजी सेना, भीम आर्मी, प्रहार जनशक्ती पक्षाने पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला आहे.