शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

नवीन धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST

लातूर : केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल करणारे असून, हे धोरण विकसित ...

लातूर : केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल करणारे असून, हे धोरण विकसित करणे गरजेचे आहे. संपूर्ण राज्यातील सर्व शाळांना प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन विद्याभारती या संस्थेचे पश्चिम क्षेत्र मंत्री शेषाद्री डांगे यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणारा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांना नुकताच राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते देण्यात आला. यानिमित्त केशवराज संकुलात तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲड. मिलिंद पाटील यांच्या हस्ते नितीन शेटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, यावेळी डांगे बोलत होते. यावेळी स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह जितेश चापसी, समितीचे अध्यक्ष यशवंतराव देशपांडे तावशीकर, वर्षा नितीन शेटे यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शंकरराव लासुणे, केंद्रीय विद्यासभेचे अध्यक्ष किरण भावठाणकर, केशवराज शैक्षणिक संकुलाचे पालक विवेक अयाचित, मुख्याध्यापक संजय विभुते, कमलाकर पाटील, ॲड. विश्वनाथराव जाधव, डॉ. मनोज शिरुरे यांची उपस्थिती होती.

शेषाद्री डांगे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणावर प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने एक प्रशिक्षण केंद्र चालू करावे, त्यातून राज्यातील सर्व शाळांना प्रशिक्षण देण्याची सर्व व्यवस्था संस्थेने उभी करावी.

नितीन शेटे म्हणाले, वंचित समाजातील छोट्या-छोट्या कामासाठी मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे. गत दहा वर्षांपासून आपण समाजातील वंचित व उपेक्षितांसाठी काम निष्ठेने केले व यापुढेही करत राहू. प्रास्ताविक धनंजय कुलकर्णी तुंगीकर यांनी केले. पर्यवेक्षक संजय कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन राजश्री कुलकर्णी यांनी केले.