शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरकारी दवाखान्यांची गुणवत्ता वाढली; लातूर जिल्ह्यातील १५५ आरोग्य संस्थांचा गौरव

By हरी मोकाशे | Updated: March 13, 2024 16:56 IST

कायाकल्प योजना : राज्यात सर्वाधिक पारितोषिक लातूर जिल्ह्यास

लातूर : सरकारी रुग्णालयातील स्वच्छता व इतर पूरक बाबींसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत घेण्यात आलेल्या कायाकल्प उपक्रमात जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र, १११ उपकेंद्र तसेच स्त्री रुग्णालय, उदगीरचे सामान्य, निलंग्याचे उपजिल्हा आणि ९ ग्रामीण रुग्णांनी पारितोषिके मिळविली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांची सेवा गुणवत्ता वाढल्याचे दिसून येत आहे. विशेषत: राज्यात सर्वाधिक पारितोषिक मिळविणारा लातूर जिल्हा ठरला आहे.

राज्य शासन आणि स्वच्छ रुग्णालयांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कायाकल्प स्पर्धा घेतली जातेे. या उपक्रमात सहभागी सरकारी रुग्णालयांची अंतर्गत स्वच्छता, प्रसाधनगृहांची स्थिती, इमारतींची स्थिती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णालय परिसर स्वच्छता, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, नोंदी, शस्त्रक्रियागृह, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागातील सोयी- सुविधा आदी मुद्द्यांवर परीक्षण केले जाते. दरम्यान, शासनाने नियुक्त केलेल्या पथकाकडून जिल्ह्यातील सरकारी आरोग्य संस्थांची तपासणी करण्यात आली होती.

कासार बालकुंदा आरोग्य केंद्र प्रथम...जिल्ह्यात कासार बालकुंदा आरोग्य प्रथम आले असून २ लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. निटूर, हंडरगुळी, हलगरा, हडोळती, शिरुर ताजबंद, लामजना, वांजरवाडा, देवर्जन, हेर, गुडसूर, अतनूर, जवळा बु., नळेगाव, नळगीर, अंधोरी, पानचिंचोली, चिंचोली ब., जवळगा, बोरी, निवळी, तांदुळजा, गंगापूर, उजनी, चापोली, खरोळा, कारेपूर, भातांगळी, चिखुर्डा, मातोळा, भादा, बिटरगाव अशा ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

किनी यल्लादेवी उपकेंद्र प्रथम...उदगीर तालुक्यातील किनी यल्लादेवी आरोग्य उपकेंद्र हे जिल्ह्यात प्रथम आले असून एक लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे. काजळ हिप्परग्यास ५० हजार, घोणसी उपकेंद्रास ३५ हजार तर उर्वरित १०८ उपकेंद्रांना प्रत्येकी २५ हजारांचे बक्षीस मिळणार आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदअंतर्गतच्या जिल्हा गुणवत्ता समन्वयक डॉ. पल्लवी रेड्डी, जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी पाठपुरावा केला.

स्त्री रुग्णालयाने मिळविले यश...कायाकल्प उपक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गतच्या लातुरातील स्त्री रुग्णालय, उदगीरचे सामान्य आणि निलंग्याचे उपजिल्हा तसेच अहमदपूर, रेणापूर, देवणी, किल्लारी, उदगीर, चाकूर, बाभळगाव, मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयांनी यश मिळविले आहे.

आरोग्य संस्था अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न...राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गतच्या कायाकल्प उपक्रमात लातूर जिल्ह्याने चांगले यश संपादन केले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे आणि सहकार्यामुळे हे यश मिळाले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सरकारी आरोग्य संस्था आणखीन अद्ययावत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी.

सेवेचा दर्जा कायम टिकविण्यासाठी प्रयत्न...कायाकल्पमध्ये जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गतच्या रुग्णालयांनी आपला लौकिक केला आहे. गुणवत्तापूर्ण सेवा देण्याबरोबर संस्थेचा दर्जा वाढविण्यासाठी उपक्रमातून प्रयत्न करण्यात आले. तो टिकविण्यासाठी कायम प्रयत्न राहणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरhospitalहॉस्पिटल